शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

महापालिका निवडणुकीत शिंदे गटाला भवितव्याची चिंता; समर्थकांत एकच संभ्रम

By नारायण जाधव | Updated: April 12, 2023 19:15 IST

गणेश नाईक/मंदा म्हात्रे जागा सोडतील का? शिंदे समर्थकांत संभ्रम असून ही चिंता जागोजागी व्यक्त करताना दिसत आहेत.

नवी मुंबई : राज्यात एकनाथ शिंदेच्या बंडखोरीनंतर शिवसेनेची दोन शकले झाली आहेत. यात शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाले असले तरी पक्षाने भाजपसोबत घरोबा केला आहे. मात्र, असे असले तरी राज्यातील एक महत्त्वाची आणि श्रीमंत महापालिका असलेल्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपच्या ताकदीसमोर आपले भवितव्य काय याची चिंता शिंदेसोबत गेलेल्या माजी नगरसेवकांसह पदाधिकार्यांना सतावू लागली आहे. कारण नवी मुंबईत गणेश नाईक यांचे गेल्या २५ वर्षांपासून एकहाती वर्चस्व आहे.

पक्ष कोणताही असला तरी नाईक यांनी महापालिकेवरील पकड सैल होऊ दिलेली नाही. आता ते भाजपात आहेत, सोबत बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रेंचा गटही आहे. यामुळे भाजप आपल्याला किती जागा देईल, याबाबत शिंदे गटात संभ्रम आहे. नवी मुंबईत २०१५ व्या निवडणुकीत नाईक गटाचे मोठे संख्याबळ होते तर शिवसेना ४४ जागावंर थबकली होती. आता विजय चौगुले आणि उपनेते विजय नाहटांसोबत काही नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत. या दोन्ही नेत्यांसोबत नाईक यांचे फारसे सौख्य नाही. तसेच विजय चौगुले सोडले आणि काही प्रमाणात किशोर पाटकर, सुरेश कुलकर्णी आणि शिवराम पाटील सोडले तर शिंदे सोबत गेलेल्या एकही माजी नगरसेवक निवडून येईल काय याची शाश्वती कुणालाही नाही.

चौगुले स्वत:च्या बळावर ऐरोलीत आणखी दोन-तीन जागा आणू शकतात. यापुढे शिंदे गटाची मजल नाही. त्यातच कट्टर शिवसैनिकांची सहानुभूती उद्धव ठाकरेंसोबत आहे. मुस्लिम समाजाची सहानुभूतीही ठाकरे गटाला आहे. याशिवाय गणेश नाईक यांनी तीन वर्षांपासून स्वबळावर भाजपचे कमळ नवी मुंबई महापालिकेवर फुलविण्याची तयारी केली आहे. तसा ‘शब्द’ही त्यांनी आपले नेते देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. त्यानुसार केवळ गणेश नाईकच नव्हे तर त्यांचे पुत्र संजीव आणि संदीप नाईक यांनीही शहर पिंजून काढले आहे.

प्रत्येक वॉर्डातील समस्या सोडविण्यासाठी नेतेपदाची शाल काढून ते दर पंधरवड्याला महापालिका आयुक्तांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडत आल्या आहेत तर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलपासून स्मार्ट व्हिलेज, जलवाहतूक, प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा मालमत्ताकर, जेट्टींचे विषय, महापालिकेतील नोकऱ्यांचा विषय, महाराष्ट्र भवन, वृद्धाश्रम, सिडको इमारतींचा पुनर्विकास,असे अनेक विषय सतत लावून शहरांत भाजपची ताकत वाढविण्यासाठी प्रयत्न केलेले आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही या नेत्यांना दोन्ही नेत्यांना सातत्याने बळ दिले आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते आणि भाजपचे श्रेष्ठी आपल्या गटाला किती जागा सोडतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासाठी किती प्रयत्न करतील, याबाबत शिंदे समर्थकांत संभ्रम असून ही चिंता जागोजागी व्यक्त करताना दिसत आहेत.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाGanesh Naikगणेश नाईक