शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

महापालिका निवडणुकीत शिंदे गटाला भवितव्याची चिंता; समर्थकांत एकच संभ्रम

By नारायण जाधव | Updated: April 12, 2023 19:15 IST

गणेश नाईक/मंदा म्हात्रे जागा सोडतील का? शिंदे समर्थकांत संभ्रम असून ही चिंता जागोजागी व्यक्त करताना दिसत आहेत.

नवी मुंबई : राज्यात एकनाथ शिंदेच्या बंडखोरीनंतर शिवसेनेची दोन शकले झाली आहेत. यात शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाले असले तरी पक्षाने भाजपसोबत घरोबा केला आहे. मात्र, असे असले तरी राज्यातील एक महत्त्वाची आणि श्रीमंत महापालिका असलेल्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपच्या ताकदीसमोर आपले भवितव्य काय याची चिंता शिंदेसोबत गेलेल्या माजी नगरसेवकांसह पदाधिकार्यांना सतावू लागली आहे. कारण नवी मुंबईत गणेश नाईक यांचे गेल्या २५ वर्षांपासून एकहाती वर्चस्व आहे.

पक्ष कोणताही असला तरी नाईक यांनी महापालिकेवरील पकड सैल होऊ दिलेली नाही. आता ते भाजपात आहेत, सोबत बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रेंचा गटही आहे. यामुळे भाजप आपल्याला किती जागा देईल, याबाबत शिंदे गटात संभ्रम आहे. नवी मुंबईत २०१५ व्या निवडणुकीत नाईक गटाचे मोठे संख्याबळ होते तर शिवसेना ४४ जागावंर थबकली होती. आता विजय चौगुले आणि उपनेते विजय नाहटांसोबत काही नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत. या दोन्ही नेत्यांसोबत नाईक यांचे फारसे सौख्य नाही. तसेच विजय चौगुले सोडले आणि काही प्रमाणात किशोर पाटकर, सुरेश कुलकर्णी आणि शिवराम पाटील सोडले तर शिंदे सोबत गेलेल्या एकही माजी नगरसेवक निवडून येईल काय याची शाश्वती कुणालाही नाही.

चौगुले स्वत:च्या बळावर ऐरोलीत आणखी दोन-तीन जागा आणू शकतात. यापुढे शिंदे गटाची मजल नाही. त्यातच कट्टर शिवसैनिकांची सहानुभूती उद्धव ठाकरेंसोबत आहे. मुस्लिम समाजाची सहानुभूतीही ठाकरे गटाला आहे. याशिवाय गणेश नाईक यांनी तीन वर्षांपासून स्वबळावर भाजपचे कमळ नवी मुंबई महापालिकेवर फुलविण्याची तयारी केली आहे. तसा ‘शब्द’ही त्यांनी आपले नेते देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. त्यानुसार केवळ गणेश नाईकच नव्हे तर त्यांचे पुत्र संजीव आणि संदीप नाईक यांनीही शहर पिंजून काढले आहे.

प्रत्येक वॉर्डातील समस्या सोडविण्यासाठी नेतेपदाची शाल काढून ते दर पंधरवड्याला महापालिका आयुक्तांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडत आल्या आहेत तर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलपासून स्मार्ट व्हिलेज, जलवाहतूक, प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा मालमत्ताकर, जेट्टींचे विषय, महापालिकेतील नोकऱ्यांचा विषय, महाराष्ट्र भवन, वृद्धाश्रम, सिडको इमारतींचा पुनर्विकास,असे अनेक विषय सतत लावून शहरांत भाजपची ताकत वाढविण्यासाठी प्रयत्न केलेले आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही या नेत्यांना दोन्ही नेत्यांना सातत्याने बळ दिले आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते आणि भाजपचे श्रेष्ठी आपल्या गटाला किती जागा सोडतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासाठी किती प्रयत्न करतील, याबाबत शिंदे समर्थकांत संभ्रम असून ही चिंता जागोजागी व्यक्त करताना दिसत आहेत.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाGanesh Naikगणेश नाईक