शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

नवी मुंबईतील आरोग्य केंद्रात रेबीज लसीचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 3:43 AM

 दिवसेंदिवस रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून श्वानदंशानंतर महापालिकेच्या वतीने विनाशुल्क रेबीज लसीकरण केले जाते.

नवी मुंबई - दिवसेंदिवस रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून श्वानदंशानंतर महापालिकेच्या वतीने विनाशुल्क रेबीज लसीकरण केले जाते. मात्र महापालिकेच्या दिघा, ऐरोली,घणसोली, कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, नेरूळ आणि बेलापूर या आठ विभागातील प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रात लसीकरणाची सुविधा नसल्यामुळे शेकडो श्वानदंश झालेल्या रु ग्णांची गैरसोय होत आहे.एप्रिल २०१७- ते मार्च २०१८ या अकरा महिन्यांच्या कालावधीत नवी मुंबईतून एकूण ४१६३ भटकी कुत्री पकडण्यात आली. त्यापैकी ३२२४ कुत्र्यांवर निर्बीजीकरण करण्यात आले. तर उर्वरित जखमी, चावरी आणि रोगी कुत्र्यांवर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले. शहरात श्वानदंश होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. श्वानदंश झालेल्या रूग्णांवर महापालिकेच्या रूग्णालयात उपचार केले जातात. परंतु अनेक नागरी आरोग्य केंद्रांमध्ये सद्यस्थितीमध्ये लस उपलब्ध होत नाही. महापालिकेच्या रूग्णालयाव्यतिरिक्त नागरी आरोग्य केंद्रात रेबीजची लस मिळत नसल्यामुळे श्वानदंश झालेल्या रुग्णाची परवड होत आहे. प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करण्याची मागणी घणसोली येथील काँग्रेसचे माजी नगरसेवक दीपक दगडू पाटील यांनी महापालिका आयुक्त रामास्वामी एन.यांच्याकडे केली आहे.सद्यस्थितीमध्ये महापालिकेच्या बेलापूर, वाशी, ऐरोली आणि नेरूळ येथील रु ग्णालयात जावून रेबीजची लस टोचून घेण्यासाठी जावे लागत आहे. यासाठी पालिकेने श्वानदंश झालेल्या रुग्णांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रात ही सुविधा उपलब्ध करावी, असे पाटील यांनी आयुक्तांना दिलेल्या लेखी तक्र ारीत म्हटले आहे.नागरिकांचीही नाराजीश्वानदंश झालेल्या रुग्णांवर वेळेत उपचार मिळणे आवश्यक आहे. तुटवड्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण व स्थायी समितीमध्येही औषध खरेदी व आरोग्य विभागाच्या प्रत्येक कामाला तत्काळ मंजुरी दिली जाते. प्रशासनानेही दक्षता ठेवून औषधांची कमतरता भासू देवू नये अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.रेबीज लसीकरणाचा डोस एका वेळी आठ तासांच्या आत पाच रु ग्णांना द्यायचा असतो. नागरी आरोग्य केंद्रात श्वानदंश झालेले रु ग्ण कमी येत असल्यामुळे महापालिकेच्या हे रेबीज इंजेक्शनची सुविधा सर्व नागरी आरोग्य केंद्रात ठेवता येत नाही. त्यासाठी महापालिकेच्या वाशी, नेरूळ, बेलापूर आणि ऐरोली या चार रु ग्णालयात रेबीज लसीकरणाची सुविधा करण्यात आलेली आहे.- डॉ. दयानंद कटके,वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईHealthआरोग्य