शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
2
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
4
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
5
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
6
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
7
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
8
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
9
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
10
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
11
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
12
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
13
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
14
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
15
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
16
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
17
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
18
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
19
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
20
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा

महामार्गावर रामनगर भागात गतिरोधक टाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 1:28 AM

नागरिकांची मागणी

नागोठणे : रामनगर तसेच जोगेश्वरीनगर भागात जाण्यासाठी महामार्ग ओलांडावा लागत असतो. मात्र, येथे गतिरोधक टाकले नसल्याने दोन्ही बाजूंनी भरधाव वाहने जात असल्याने पादचाऱ्यांना अनेकदा अपघाताला सामोरे जावे लागत असते. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्णच होत नसल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या ठिकाणी गतिरोधक उभारावेत, अशी मागणी या प्रभागाचे स्थानिक ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे यांनी केली आहे.

येथील खडकआळी आणि आंगरआळी परिसरात मुंबई-गोवा महामार्गाच्या पलीकडे पूर्व बाजूला रामनगर आणि जोगेश्वरीनगर या नागरी वसाहती असून या ठिकाणी शेकडो घरे आहेत. बाजारहाट किंवा इतर कोणत्याही कामासाठी येथील नागरिकांना महामार्ग ओलांडून नागोठणे शहरात यावे लागत असते. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षे उलटूनही पूर्णच होत नसल्याने जुन्या महामार्गावरूनच दोन्ही बाजूंनी वाहतूक चालू आहे.वाहने भरधाव असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडावा लागत असतो. यामुळे पादचाऱ्यांना ठोकर बसून अनेकदा अपघात होत आहेत. असाच एक अपघात मागील आठवड्यात झाला असल्याचे ज्ञानेश्वर साळुंखे यांनी सांगितले. याच भागाचे पुढे १००-१५० मीटर अंतरावर गतिरोधक बसविले आहेत. मात्र, वर्दळ असलेल्या खडकआळी आणि आंगरआळी भागातील महामार्गावर गतिरोधक बसविण्यासाठी महामार्ग प्राधिकारणाचा दुजाभाव कशासाठी, असा साळुंखे यांचा सवाल आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई