शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

उरणमधील वाहतूककोंडीची समस्या कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 12:06 AM

उरणकरांच्या वाहतूककोंडीची समस्या सोडविण्याचे आश्वासन सर्वच राजकीय पक्षांची प्रचारादरम्यान दिले आहे.

उरण : उरणकरांच्या वाहतूककोंडीची समस्या सोडविण्याचे आश्वासन सर्वच राजकीय पक्षांची प्रचारादरम्यान दिले आहे. मात्र, अनेक वर्षांपासून जनतेला भेडसावणाऱ्या या समस्येकडे लोकप्रतिनिधी आणि संबंधित शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष झाले आहे.

उरण-जेएनपीटी-आम्रमार्ग, उरण-पनवेल आणि गव्हाणफाटा-चिरनेर मार्गावर दररोज प्रवास करणाºया हजारो प्रवाशांना वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. वाढती रहदारी आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूककोंडीची समस्या नित्याचीच झाली आहे. वाहतूककोंडीच्या समस्येविरोधात मागील काही वर्षांत अनेक आंदोलनेही झाली आहेत. मात्र, अद्याप ही समस्या जैसे थे आहे.उरण परिसरातील वाहतूककोंडीची अनेक कारणे आहेत.

जेएनपीटीने एनएचआयच्या माध्यमातून तीन हजार कोटींची सुरू असलेले सात उड्डाणपूल, सहा-आठ लेनच्या रस्त्यांचीच कामे मुदतीनंतर अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहेत. बेशिस्त कंटेनर वाहतूक आणि रस्तोरस्ती अवैधरीत्या पार्किंग करण्यात येत असलेल्या वाहनांवर पोलिसांचे नियंत्रण नाही. रस्तोरस्ती पडलेले मोठमोठे खड्डेही वाहतूककोंडीस कारणीभूत ठरत आहेत. येथील वाहतूकदार संघटनांवर जेएनपीटीचा कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही. वाहतूकदारांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न केल्यास संघटित वाहतूकदार संपाचे हत्यार उपसतात.

परिसरातील अवैध कंटेनर यार्डमधून कंटेनर मालाची देशभरात वाहतूक केली जाते. अशा मालवाहू कंटेनरसाठी रस्तोरस्ती कट देण्यात आले आहेत. मात्र, यामुळे उरण-जेएनपीटी-आम्रमार्ग, गव्हाणफाटा-चिरनेर मार्गावर वाहतूककोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवते.जनतेला भेडसावत आलेली वाहतूककोंडीची समस्या आणि खड्डेमय रस्त्यांपासून विद्यार्थी, कामगारांची सुटका व्हावी, यासाठी काही दिवसांपूर्वी उरणमधील युवकांनीही पुढाकार घेऊन लक्षवेधी आंदोलन केले होते.

करळ फाटा येथील आंदोलनानंतर युवकांनी जेएनपीटी अधिकाऱ्यांशी भेट घेऊन शेकडो स्वाक्षºया असलेले निवेदनही दिले होते. याची दखल घेत प्रशासनाने अध्यादेश जारी करीत दोन्ही मार्गावरील वाहतूक सकाळी ८ ते ११ तर संध्याकाळी ५ ते ८ दरम्यान दररोज सहा तास अवजड वाहतूक बंद करण्यात आल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यानंतरही वाहतूककोंडीची समस्या सुटल्याचे दिसत नाही.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी