शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

By admin | Updated: June 28, 2017 03:34 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू आहे. पहिल्याच पावसामध्ये रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू आहे. पहिल्याच पावसामध्ये रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, रोज वाहतूककोंडी होऊ लागली आहे. खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून, वाहतूककोंडीमुळे प्रवाशांसह वाहतूकदारांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे. सायन-पनवेलप्रमाणेच मुंबई-गोवा महामार्गाची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व केरळ राज्यांशी हा महामार्ग जोडला जातो. महाराष्ट्राच्या कार्यक्षेत्रामध्ये ४८२ किलोमीटरचा समावेश आहे. हे काम करण्यासाठी शासनाने ११ हजार ७४७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा पूर्ण मार्ग हरित महामार्ग म्हणून विकसित करण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला आहे. सद्यस्थितीमध्ये पनवेलपासून पुढे महामार्गाचे काम सुरू आहे; परंतु ठेकेदाराकडून अपेक्षित वेगाने कामे केली जात नाहीत. वाहतूक सुरळीत होईल, याचीही काळजी घेतली जात नाही. पहिल्याच पावसामध्ये आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या शिरढोण गावापासून तारा येथील युसुफ मेहरअली सेंटरपर्यंतच्या रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांची व प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. मोठ्या खड्ड्यांमुळे मोटारसायकलचे वारंवार अपघात होऊ लागले आहेत. अपघातामुळे नियमितपणे वाहतूककोंडी होत असून, मुंबईकडे येणाऱ्या व येथून जाणाऱ्या प्रवाशांना एकाच ठिकाणी अडकून राहावे लागत आहे. मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणच्या विकासाचा महामार्ग होणार असल्याचे बोलले जात आहे. २०१९पर्यंत या मार्गाचे काम पूर्ण करण्याचा संकल्प शासनाने जाहीर केला आहे; परंतु पहिल्याच टप्प्याचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. यावर्षी पावसामध्ये पूर्ण महामार्ग खड्डेमय झाला असून, पुढील तीन महिने येथून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. शासनाने ठेकेदाराला सूचना देऊन खड्डे तत्काळ दुरुस्त करण्याचे आदेश द्यावेत, याशिवाय महामार्गावर वाहतूककोंडी होणार नाही. अपघात होणार नाहीत, याची काळजी घेण्याच्या सूचना देण्याची मागणीही होऊ लागली आहे. पावसाळ्यात महामार्गाचे काम धिम्या गतीने झाले तरी चालेल; पण खड्ड्यांमुळे वाहतुकीवर परिणाम होऊ नये अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.