शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीला खिंडार : नवी मुंबईमध्ये राजकीय भूकंप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 02:06 IST

सर्वपक्षीयांची समीकरणे बदलणार; महापालिकेमध्येही होणार सत्तांतर

नामदेव मोरे 

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते गणेश नाईक भाजपमध्ये जाणार असल्याचे निश्चित झाल्याने नवी मुंबईत राजकीय भूकंप होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील राष्ट्रवादीचे अस्तित्व धुसर होणार आहे. शिवसेनेसह सर्वच पक्षांची राजकीय समीकरणे बदलणार असून महापालिकेमध्येही सत्तांतर अटळ समजले जात आहे.

ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक भारतीय जनता पक्षामध्ये जाणार अशी चर्चा पाच वर्षांपासून सुरू होती. पक्षातीलनगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या आग्रहानंतर नाईकांनीही पक्षांतर करण्यावर जवळपास शिक्कामोर्तब केले आहे.महापौर बंगल्यावर झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीला जवळपास ५० जणांनी हजेरी लावली होती. सर्वांनीच पक्षांतराचा आग्रह धरला आहे. नाईकांनी पक्षांतर केले तर महानगरपालिकेमधील राष्ट्रवादी व काँगे्रस आघाडीची सत्ताही संपुष्टात येणार आहे.आतापर्यंत महापालिकेमध्ये अस्तित्वासाठी झगडणाºया भाजपच्या ताब्यात ही महानगरपालिका येणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या मताधिक्यामुळे काँगे्रस, राष्ट्रवादीमधील अनेक नगरसेवक शिवसेनेमध्ये जाण्यासाठी इच्छूक होते. त्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्नही सुरू केले होते; परंतु नाईकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास शिवसेनेची ही स्वप्नेही धुळीस मिळणार आहेत.महापालिकेमध्ये दहा नगरसेवक असूनही काँगे्रसला उपमहापौरपद मिळाले असून सत्ता गेल्यामुळे त्यांचे पदही धोक्यात येण्याची शक्यता आहे. पाच वर्षांपूर्वी नवी मुंबई राष्ट्रवादी काँगे्रसचा बालेकिल्ला होता; परंतु २०१४ मध्ये मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांच्याकडून सन्मानजनक वागणूक मिळत नसल्यामुळे पक्ष सोडला. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनीही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रथम भाजप व नंतर शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे नाईकांनी पक्ष सोडल्यास राष्ट्रवादीचे अस्तित्व धुसर होणार आहे. शिवसेना व भारतीय जनता पक्षातील अनेकांनी ऐरोली व बेलापूर मतदारसंघातून विधानसभेसाठी तयारी सुरू केली होती.संघटनात्मक बांधणीही सुरू केली होती; पण नाईक भाजपमध्ये गेल्यास सर्वांच्या मनसुब्यावर पाणी फिरणार आहे.महानगरपालिकेमध्येही परिवर्तननवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेपासून भारतीय जनता पक्षाला प्रभाव पाडता आला नाही. २००५ च्या निवडणुकीमध्ये भाजपचा एकच नगरसेवक निवडून आला होता. यानंतर २०१० मध्ये झालेल्या निवडणुकीमध्येही पक्षाचा एकच नगरसेवक निवडून आला. २०१५ च्या निवडणुकीमध्ये भाजपचे सहा नगरसेवक निवडून आले होते. गणेश नाईक यांनी पक्षांतर केल्यास प्रथमच पालिकेवर भाजपची सत्ता येईल. सद्यस्थितीमध्ये राष्ट्रवादीचे ५२ नगरसेवक आहेत. पाच अपक्ष नगरसेवकांचा त्यांना पाठिंबा असून भाजपचे सहा नगरसेवक असल्याने त्यांचे संख्याबळ ६३ होणार असून या बळावर पालिकेमधील सत्ता टिकविणे शक्य होणार आहे.संपूर्ण परिवाराचे पुनर्वसन कसे होणारनाईक परिवार भाजपमध्ये गेल्यामुळे ऐरोली मतदारसंघात संदीप नाईक यांना त्याचा सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता आहे. संदीप नाईक यांचे पुनर्वसन होणार असले तरी माजी खासदार संजीव नाईक व माजी महापौर सागर नाईक यांचे पुनर्वसन कसे होणार हा प्रश्न कायम आहे. भाजप एकाच परिवारातील किती जणांना पदाचा लाभ देणार याकडे लक्ष लागले आहे.विधानसभेचा पेच कायमनाईक परिवाराने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही विधानसभा निवडणुकीमध्ये बेलापूर मतदारसंघातील पेच कायम राहणार आहे. या ठिकाणी भाजपच्या मंदा म्हात्रे आमदार असून, पाच वर्षांत त्यांनी चांगले काम केले आहे. युती झाल्यास या मतदारसंघावर शिवसेना दावा करणार आहे. पक्षाचे उपनेते विजय नाहटा यांनी मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामुळे या मतदारसंघातून गणेश नाईक यांना उमदेवारी मिळणार का? याविषयी साशंकता आहे.राष्ट्रवादीमध्ये कोण थांबणार?राष्ट्रवादी काँगे्रसच्या सर्व नगरसेवकांनी भाजपमध्ये जाण्याचा आग्रह धरला आहे. महापौर बंगल्यावर झालेल्या मिटिंगमध्ये सर्वांनी त्या विषयीची भूमिका मांडली असली तरी बेलापूर मतदारसंघातील एक ज्येष्ठ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार असल्याची चर्चा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नगरसेवकांना राष्ट्रवादीमध्ये थांबण्याचा आग्रह धरला जात असून त्याविषयी एक मिटिंग सोमवारी कोपरखैरणेमध्ये झाल्याचे वृत्त आहे.जनाधार घसरल्यानेच पक्षांतरमाजी मंत्री गणेश नाईक यांचा जनाधार पाच वर्षांपासून सातत्याने घसरू लागला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ठाणे मतदारसंघातून संजीव नाईक यांचा पराभव झाला. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बेलापूर मतदारसंघातून गणेश नाईक यांचा पराभव झाला. महानगरपालिका निवडणुकीमध्येही पूर्ण बहुमत मिळविता आले नाही. काँगे्रसबरोबर आघाडी करून सत्ता टिकवावी लागली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ऐरोलीतून शिवसेनेला ४४ हजार मतांची आघाडी मिळाली व बेलापूर मधून ३९ हजार ७२४ मतांची आघाडी मिळाली. हे मताधिक्य कमी करून विजय मिळविणे गणेश नाईक व संदीप नाईक यांच्यासाठी आव्हानात्मक होते. लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नगरसेवकांच्या प्रभागामधूनही शिवसेनेला आघाडी मिळाली होती. जनाधार घसरल्यामुळेच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नाईक कुटुंबीय पक्षांतर करत असल्याची टीका त्यांचे विरोधक करू लागले आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईGanesh Naikगणेश नाईकNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा