शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

ठरावीक कालावधीतील गुन्ह्यांमुळे पोलीस संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 03:22 IST

पॉक्सो प्रकरण : जून ते सप्टेंबरमधील गुन्हे

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : पॉक्सोच्या १५ गुन्ह्यांत अटकेत असलेल्या रेहान कुरेशीने जून ते सप्टेंबर या महिन्यांतच गुन्हे केल्याचे समोर आले आहे. तीनही वर्षातील याच महिन्यांत त्याने केलेले गुन्हे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहेत; परंतु तो सराईत गुन्हेगार असल्याने सतत चुकीची माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करत असल्याने अशा अनेक बाबींचा उलगडा करण्याचे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.

नवी मुंबईसह मुंबई, ठाणे ग्रामीण व ठाणे शहर, तसेच पालघर परिसरातील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना मागील तीन वर्षांपासून घडत होत्या; परंतु चारही आयुक्तालयाच्या पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असतानाही तो हाती लागत नव्हता. सीसीटीव्ही व्यतिरिक्त त्याचा कसलाही ठोस पुरावा नसल्याने त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांची दमछाक झाली होती. अखेर नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा पोलिसांनी शिताफीने मीरारोड येथून त्याला अटक केली. चौकशीत त्याने १५ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यात २०१६ मध्ये त्याने मुंबईच्या भोईवाडा, तसेच ठाण्याच्या नवघर परिसरात गुन्हे केल्याचे समोर आले आहे.२३ जानेवारी २०१५ मध्ये तळोजा येथेही त्याच्यावर पॉक्सोचा पहिला गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्यात जामिनावर सुटल्यानंतर त्याने हे तीनही गुन्हे केल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर नवी मुंबई, ठाणे व पालघर परिसरात अल्पवयीन मुलींवर पाळत ठेवून त्यांच्यावर अतिप्रसंग केले आहेत. काही मुलींनी धाडसाने त्याच्यापासून स्वत:ची सुटकादेखील करून घेतली होती. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात पॉक्सोचे गुन्हे दाखल आहेत.रेहानच्या चौकशीसाठी आयुक्त व उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक नेमण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त अजय कदम हे त्या पथकाचे प्रमुख असून, गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक जगदीश कुलकर्णी, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक आनंद चव्हाण, उपनिरीक्षक ज्योती सूर्यवंशी, जगदीश पाटील व इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.च्रेहानवर दाखल असलेले दोन गुन्हे वगळता इतर सर्व गुन्हे जून ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीतील आहेत.च्केवळ २०१७ व १८ मध्ये एप्रिल महिन्यात प्रत्येकी एक गुन्हा आहे. याव्यतिरिक्त त्याच्यावर २०१६ मध्ये ३, २०१७ मध्ये ४ तर २०१८ मध्ये ५ गुन्हे दाखल असून त्याची कबुलीही त्याने दिलेली आहे. इतरही गुन्हे त्याने केल्याची शक्यता असून पोलीस त्याचा तपास करत आहेत. मात्र, समोर आलेले गुन्हे जून ते सप्टेंबर महिन्यांतच का केले? असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामागे काही ठोस कारण आहे का की निव्वळ योगायोग, याचाही उलगडा पोलिसांना करावा लागणार आहे. तो सतत चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत असल्याने पोलिसांपुढे तपासाचे आव्हान वाढले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी