शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
4
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
5
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
6
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
7
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
8
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
9
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
10
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
11
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
12
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
13
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
14
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
15
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
16
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
17
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
18
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

शहरात पोलिसांना ना ड्युटीची वेळ, ना पगाराचा मेळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 3:02 AM

पदरी निराशाच; संसाराचा गाडा हाकण्याची चिंता, घर मिळालेलेही अडचणींमुळे त्रस्त

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : शासकीय नोकरी असूनही पदरी निराशा अशी अवस्था पोलिसांच्या कुटुंबीयांची झाली आहे. कामाची कसलीही वेळ निश्चित नसल्याने कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नसल्याची मोठी खंत आहे, तर अनेकांपुढे संसाराचा गाडा हाकायचा तरी कसा, याचीही चिंता आहे.शासकीय नोकरीच्या हव्यासापोटी पोलीस दलात भरती झालेल्या अनेकांची काही वर्षांतच नोकरी नको अशी अवस्था झाली आहे. त्याला कामाची अनिश्चित वेळ व राहायची सोय नसणे ही मुख्य कारणे ठरत आहेत.नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात ४ हजार ८०४ अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यापैकी ४६५ जणांना शासकीय घरात राहण्याची संधी मिळाली आहे. उर्वरित अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी निम्म्याहून अधिकांपुढे हक्काच्या घराचा प्रश्न कायम आहे. पूर्वीपासून नवी मुंबईत स्थायिक असलेल्या बहुतेक जणांचे स्वतःचे घर आहे. मात्र, भरती झाल्यानंतर नवी मुंबईत स्थायिक झालेल्यांना भाड्याच्या घराचा आसरा घ्यावा लागत आहे, तर स्वतःचे हक्काचे घर नसल्याने ते होईपर्यंत नव्याने भरती झालेल्यांपैकी अनेकांनी अद्याप हात पिवळे केलेले नाहीत. ज्यांना पोलीस कॉलनीत घर मिळाले आहे, ते तिथल्या समस्यांनी त्रस्त आहेत. जे कर्तव्य बजावत संसाराचा गाडा हाकत आहेत, त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ड्युटीवर हजर झाल्यानंतर परत घरी जाण्याची वेळ निश्चित नसल्याने कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नाही. यामुळे मुलांच्या संगोपनाकडे काहीसे दुर्लक्ष होते, तर काम संपवून घरी गेल्यानंतर दिवसभरातल्या कामाचा ताण व तपासाचा वैचारिक भाग घरी सोबतच घेऊन जावा लागतो. या वाढत्या ताणामुळे अनेक जण नशेच्या आहारी जात आहेत. यातूनच काही अंशी पोलिसांची प्रतिमा मलीन होण्याचे प्रकार घडत आहेत.ड्युटी किती तासांची?आठ तासांची ड्युटी कागदावरच असल्याने, ठाण्यातले कामकाज व तपास, यामुळे सर्वाधिक वेळ कर्तव्यावरच जात आहे.कुटुंबासाठी पुरेसा वेळ नाहीकामाचीच वेळ निश्चित नसल्याने अधिकारी किंवा कर्मचारी यांना कुटुंबासाठी पुरेसा वेळ देता येत नाही.मुलांचे शिक्षण कसे करणार?ठरावीक अधिकारी वगळता बहुतांश कर्मचाऱ्यांची मुले ही मध्यम दर्जाच्या खासगी शाळांमध्ये शिकत आहेत.ज्या नोकरीमुळे कुटुंबीयांनी सोयरीक जुळविली, तीच नोकरी कौटुंबिक सुखाच्या आड येऊ लागली आहे. पतीची कामाची वेळ निश्चित नाही. त्यामुळे घरच्या बाबींकडे, शिवाय मुलांच्या गरजांकडे पुरेसे लक्ष देता येत नाही, तर कामाच्या वाढत्या ताणाचा परिणाम पतीच्या प्रकृतीवर होतो आहे.- रेखा जाधव, पोलीस पत्नी (बदललेले नाव)