शहरं
Join us  
Trending Stories
1
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
2
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
3
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
5
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
6
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
7
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
8
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
10
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
13
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
14
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
15
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
16
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
17
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
18
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
19
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
20
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे पनवेल तालुक्यातील २०० हेक्टरवरील भातपीक वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 01:40 IST

पंचनाम्यांना सुरुवात : हातचे पीक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल; लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्याची मागणी

मयुर तांबडे

पनवेल : तालुक्यात परतीच्या पावसामुळे विविध भागात भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पनवेल कृषी अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन पिकांचे नुकसानीचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील जवळपास २०० हेक्टर पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

आॅक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे पनवेल तालुक्यात भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आल्याची माहिती तहसीलदार अमित सानप यांनी दिली आहे.आठवडाभरात हे पंचनामे पूर्ण होऊन शासनाला त्यासंबंधीचा अहवाल पाठविण्यात येईल. त्यानंतर शासनाच्या आदेशानुसार शेतकºयांना नुकसानभरपाई मिळेल, अशी माहिती तहसीलदार सानप यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकºयांनी संबंधित तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सानप यांनी केले आहे.शेतकºयाला हेक्टरी ६ हजार ८०० रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. हातचे पिक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.पनवेल तालुक्यात एकूण ८हजार १५० हेक्टर शेतीचे पीक घेतले जाते. यापैकी पावसामुळे काहीशेती पाण्यात गेली आहे. शेतातपाणी साचल्याने पिक कुजलेआहे. काही ठिकाणी भातालाकोंब फुटले आहेत. जुलै २०१९मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने एक हजार दोनशे हेक्टर शेतीचे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे शासनाला जमा करण्यात आलेले आहेत.आॅक्टोबरमध्ये जवळपास २०० हेक्टर भातपिकाचे नुकसान झालेले आहे. तालुक्यातील ७ शेतकरयानी पीक विमा उतरवला होता. त्यांनी पंचनामे करून विमा कंपनीकडे सादर करण्यात आलेले आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRainपाऊस