शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

निराधारांच्या योजनांना आँनलाइन आधार

By admin | Updated: December 13, 2014 22:46 IST

निराधार व्यक्ती, वृद्ध, त्याचबरोबर अपंगांना साहाय्य देणा:या ज्या पाच शासकीय योजना आहेत,

प्रशांत शेडगे ल्ल पनवेल
निराधार व्यक्ती, वृद्ध, त्याचबरोबर अपंगांना साहाय्य देणा:या ज्या पाच शासकीय योजना आहेत, त्यांची सेवा ई डिस्ट्रिक्ट प्रकल्पांतर्गत ऑनलाइन करण्याचा निर्णय सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने घेतला आहे. त्यामुळे योजनेच्या अंमलबाजावणीचा लाभ होऊन या कामात पारदर्शकता येणार आहेच; शिवाय लाभार्थीचा त्रस वाचणार असून त्याचा फायदा होणार आहे. 
समाजात निराधार, अपंग, वृध्द व्यक्तींची संख्या कमी नाही. अनेकांना शारीरिक व्यंग, वृद्धापकाळ, त्याचबरोबर वैधव्य आल्याने जगण्याचा आधार मिळत नाही. त्यापैकी काहींकडे तर उदरनिर्वाह करण्याची शारीरिक व आर्थिक क्षमताही नसत़े त्यांना आधार देण्याकरिता शासनाने संजय गांधी निराधार अनुदान, श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन या योजना सुरू केल्या. या योजनांतून मिळणा:या मदतीतून अनेक लाभार्थी आपला उदरनिर्वाह करतात, असे असले तरी अनेक जण या योजनेपासून वंचित आहेत. तहसील कार्यालयातून या योजनेचा लाभ मिळतो, मात्र अपुरे मनुष्यबळ, त्याचबरोबर साधनांमुळे काही प्रस्ताव सादर करण्यास दिरंगाई होते. कित्येकदा कागदपत्रं गहाळ होतात. या सर्व गोष्टींचा विचार करून सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने या योजनांमध्ये अधिक पारदर्शकता आणण्याकरिता ई डिस्ट्रिक्ट प्रकल्पांतर्गत ऑनलाइन सेवा पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय घेतला. 
1 सप्टेंबर 2क्14 पासून रत्नागिरीतील खेड व नांदेड जिल्ह्यातील नांदेड या तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू केली. त्याचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने इतर जिल्ह्यांतही राबविले जाणार आहे. पनवेल तालुक्यात सुमारे आठ लाख लोकसंख्या आहे.
 
महा ई-सेवा केंद्र व सेतूत अर्ज भरण्याची सोय
पाच योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थीना महा ई-सेवा केंद्र, सेतू किंवा सीएसीमध्ये ऑनलाइन अर्ज भरण्याची सोय मिळेल. अर्ज स्वीकारणो, त्याचबरोबर ते तहसील कार्यालयाला पाठविण्याकरिता त्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. यासाठी अर्जदाराला फक्त 22 रुपये 47 पैसे इतका खर्च येणार आहे. त्यापेक्षा जास्त पैसे केंद्रांना घेता येणार नाहीत. संबंधित ऑनलाइन अर्ज व कागदपत्रे फोटोसह स्कॅन करून अपलोड केली जातील व तहसील कार्यालयाकडे पाठवली जातील.
 
तहसील कार्यालयातही यंत्रणा
तहसील कार्यालयात अर्ज मिळाल्यानंतर संबंधित तलाठय़ाकडे गृह तपासणीसाठी पाठविण्यात येईल. तलाठय़ाचा अहवाल मिळाल्यानंतर तो संगणक प्रणालीवर अपलोड केला जाईल. अर्ज आणि कागदपत्रंच्या तपासणीनंतर तहसीलदारही त्याची ऑनलाइन पडताळणी करून मान्यतेकरिता सादर करतील.
 
मंजुरी संगणक प्रणालीवरच 
समितीची मान्यता मिळाल्यानंतर अथवा अर्ज नामंजूर केल्यास त्याची नोंदही संगणक प्रणालीवर ऑनलाइन करण्याची सिस्टीम विकसित करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी अर्ज भरला त्या ठिकाणी लाभाथ्र्याना अर्ज मंजूर किंवा नामंजुरीचा आदेश मिळू शकेल, असे अधिका:यांनी सांगितले.