शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

कांदा-बटाटा मार्केट धोकादायक, एपीएमसीने दिली १ जूनची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 06:14 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा-बटाटा मार्केट महापालिकेने धोकादायक घोषित केले आहे. दीड दशकापासून पुनर्बांधणीचा प्रश्न रखडला आहे.

नामदेव मोरेनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा-बटाटा मार्केट महापालिकेने धोकादायक घोषित केले आहे. दीड दशकापासून पुनर्बांधणीचा प्रश्न रखडला आहे. एखादी दुर्घटना होऊ नये, यासाठी प्रशासनाने १ जूनपासून मार्केटमधील व्यवहार थांबविण्याच्या नोटीस दिल्या आहेत. मार्केट स्थलांतर करण्याचे नियोजन सुरू केले आहे; परंतु प्रशासनाकडे पुरेसे नियोजन नसल्याचे कारण देऊन व्यापाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. रखडलेली पुनर्बांधणी व स्थलांतराचे आव्हान यामुळे मार्केटचे अस्तित्वच धोक्यात आले असून, यामधून मार्ग काढण्यासाठी शासन व प्रशासनाची कसोटी लागली आहे.

मुंबईचे धान्य कोठार व आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या बाजार समितीमधील समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. मुंबईमध्ये शेकडो वर्षांपासून सुरू असलेला होलसेलचा व्यापार कायद्याच्या कक्षेत यावा, यासाठी शासनाने १९७७ मध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना केली. वास्तविक यानंतर कृषी मालाच्या व्यापारास चालना मिळणे अपेक्षित होते; परंतु तेव्हापासूनच देशाच्या आर्थिक राजधानीमधील व्यापाराला घरघर लागली.

मुंबईमधील वाहतूककोंडी सोडविण्याच्या नावाखाली होलसेल व्यापार नवी मुंबईमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. याला सर्वच व्यापाºयांनी विरोध दर्शविला. नवी मुंबईचा विकास झालेला नसल्याने तेथे जाऊन व्यापार ठप्प होईल ही भीती सर्वांना वाटत होती. सरकारच्या आवाहनाला सर्वप्रथम प्रतिसाद दिला तो कांदा, बटाटा व लसूण व्यापाºयांनी. शासनाने १९८१ मध्ये मार्केट नवी मुंबईमध्ये स्थलांतरित केले. येथे व्यापारासाठी सुसज्ज मार्केट उभारण्यात आले. व्यापाºयांना २४२ गाळे, लिलावगृह व इतर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या; परंतु मार्केटचे बांधकाम चांगले झाले नसल्यामुळे २० वर्षांमध्ये बांधकाम खिळखिळे होण्यास सुरुवात झाली. काही ठिकाणी छताचा भाग कोसळू लागला. धक्के तुटले, धक्यांच्या वरील भागातील प्लॅस्टर कोसळू लागले. इमारतीला व पिलरलाही तडे जाण्यास सुरुवात झाली.

महापालिकेने २००३ मध्ये मार्केटमधील काही विंग धोकादायक घोषित केल्या, तेव्हापासून मार्केटच्या पुनर्बांधणीसाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले. व्यापाºयांनीही याविषयी न्यायालयात धाव घेतली. अखेर न्यायालयानेही पुनर्बांधणी करण्याचे आदेश देऊन त्याविषयी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या; परंतु न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पुनर्बांधणी करण्यात अद्याप यश आलेले नाही. मुंबईमधील रेल्वेचा पूल कोसळल्यानंतर त्याला संबंधित अधिकाºयांना जबाबदार धरण्यात आले. यामुळे धोकादायक मार्केटचा वापर बंद करण्याचा निर्णय घेऊन व्यापाऱ्यांना नोटीस दिल्या आहेत. १ जूनपासून मार्केटमध्ये व्यवहार करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. व्यापाºयांना लिलावगृह व मॅफ्को मार्केटजवळील भूखंडावर हलविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे; परंतु स्थलांतरित ठिकाणी जागा कमी नसल्यामुळे व्यापाऱ्यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली आहे.

कांदा-बटाटा मार्केटचा तपशील पुढीलप्रमाणे7-92 हेक्टर क्षेत्रफळ242 एकूण गाळे

प्रशासनाने मार्केटचा वापर थांबवून लिलावगृहासह मॅफ्कोजवळील भूखंडावर व्यापार स्थलांतरित करण्यासाठीच्या नोटीस दिल्या आहेत; परंतु स्थलांतरित ठिकाणची जागा अपुरी असून सुविधांचे नियोजन नाही. मार्केट पुनर्बांधणीविषयीही स्पष्टता नसून, आम्ही याविषयी न्यायालयात धाव घेतली आहे. - राजेंद्र शेळके, अध्यक्ष, कांदा-बटाटा अडत व्यापारी संघ संपूर्ण मार्केट एकाच वेळी स्थलांतर करण्याऐवजी पुनर्बांधणीचा प्रश्न मार्गी लावावा. विंगवाईज मार्केटची बांधणी करून टप्प्याटप्प्याने स्थलांतर करण्यात यावे. सर्वांना विश्वासात घेऊन योग्य तोडगा काढण्यात यावा. - सुरेश शिंदे, बिगरगाळाधारक व्यापारी प्रतिनिधीमहानगरपालिकेने मार्केट धोकादायक घोषित केले आहे. भविष्यात मार्केट कोसळून जीवित व वित्तहानी होऊ नये, यासाठी वापर थांबविण्याविषयी व्यापाºयांना नोटीस दिल्या आहेत. व्यापारासाठी लिलावगृह व मॅफ्कोजवळील भूखंडावर पर्यायी व्यवस्था करण्याचे नियोजन केले आहे; परंतु सद्यस्थितीमध्ये हा विषय न्यायप्रविष्ठ आहे. - सतीश सोनी, प्रशासक, मुंबई बाजार समिती

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीonionकांदाMarketबाजार