शहरं
Join us  
Trending Stories
1
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
“या अधिवेशनात...”; विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी
3
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
4
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
5
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
6
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बंगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
7
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
8
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
9
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
10
मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
11
John Cena Last Match: अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
12
HDFC Bank UPI Downtime: HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस ४ तासांसाठी राहणार बंद, पाहा कधी आणि कोणत्या वेळी राहणार बंद
13
T20 Cricket: टी-२० क्रिकेटमध्ये भारताने कोणत्या संघाविरुद्ध गमावले सर्वाधिक सामने? वाचा
14
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
15
"फेमस व्हायचंय..."; एडल्ट स्टार होण्याचं भलतंच वेड, व्हायरल केला पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ
16
Travel : मनालीपासून २० किलोमीटरवर आहे स्वर्गासारखे सुंदर दिसणारे 'हे' ठिकाण! हिमवृष्टी बघून प्रेमात पडाल
17
“कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, GR काढून ३ महिने झाले, पण…”; मनोज जरांगे सरकारवर नाराज
18
SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO)
19
व्हिडीओ कॉल केला आणि तिने कपडे काढून फेकले, मुंबईतील ५० वर्षाचा उद्योजक अडकला 
20
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
Daily Top 2Weekly Top 5

कांदा-बटाटा मार्केटची इमारत धोकादायक; व्यापारी, माथाडी कामगारांचा जीव मुठीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 00:33 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही मार्केट मुंबईवरून नवी मुंबईमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय शासनाने ऐंशीच्या दशकात घेतला.

- नामदेव मोरेनवी मुंबई : शहरातील अतिधोकादायक इमारतींमध्ये एपीएमसीमधील कांदा-बटाटा मार्केटचाही समावेश आहे. पुनर्बांधणी रखडल्यामुळे येथील व्यापारी, माथाडी कामगार व इतर घटकांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. पावसाळ्यात अपघाताची शक्यता वाढली असून, मुंबईसारखी एखादी दुर्घटना घडली, तर जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही मार्केट मुंबईवरून नवी मुंबईमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय शासनाने ऐंशीच्या दशकात घेतला. १८८१ मध्ये सर्वप्रथम कांदा-बटाटा मार्केट स्थलांतरित करण्यात आले. ७.९२ हेक्टर जमिनीवर २४३ गाळे उभारण्यात आले, परंतु वीस वर्षांत मार्केटमधील अनेक गाळ्यांचे प्लास्टर कोसळू लागले. नवी मुंबई महानगरपालिकेने सर्वप्रथम काही विंग व नंतर संपूर्ण मार्केटच धोकादायक घोषित केले आहे.

मार्केटचा वापर थांबविण्याच्या सूचना बाजार समिती प्रशासन व व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. प्रशासनाने मार्केटची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने ही पुनर्बांधणी करण्यास परवानगी दिली आहे, परंतु विविध कारणांमुळे पुनर्बांधणीचे काम रखडत गेले व धोकादायक इमारतींमध्येच व्यापार सुरू ठेवण्यात आला. गतवर्षी मार्केट खाली करण्याच्या नोटीस प्रशासनाने दिल्या होत्या.

मॅफ्को मार्केटजवळील मोकळ्या भूखंडावर तात्पुरते शेड उभारून, व्यापार तेथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु तेथे जागा अपुरी असल्याने व्यापाऱ्यांनी शासनाकडे विनंती केली व पुन्हा आहे तेथेच व्यापार सुरू करण्यात आला. यामुळे या धोकादायक इमारतीत काम करताना कामगार, व्यापारी हे जीव मुठीत घेऊनच वावरत असल्याचे दिसून येत आहे.दररोज पाच हजारांपेक्षा जास्त नागरिकांची ये-जासद्यस्थितीमध्ये कांदा-बटाटा मार्केटमध्ये व्यापारी, माथाडी कामगार, ग्राहक, वाहतूकदार व इतर सर्व मिळून दररोज पाच हजारांपेक्षा जास्त नागरिकांची ये-जा सुरू असते.मार्केटचा काही भाग कोसळला, तर अनेकांचा जीव जाण्याची शक्यता आहे. मार्केटची स्थिती गंभीर झाली आहे. अनेक ठिकाणी टेकू लावण्यात आले आहेत. प्लास्टरच्या आतील लोखंड बाहेर दिसू लागले आहे. अनेक ठिकाणी पिलर्सला तडे गेले आहेत.मालाची चढ-उतार करणाºया धक्क्याची दुरवस्था झाली आहे. गटारांमधून पाण्याचा निचरा होत नाही. अनेक ठिकाणी पाणी साचून डबकी तयार झाली आहेत. कोणत्याही क्षणी बांधकाम कोसळेल, अशी परिस्थिती असून, शासन व प्रशासनाने ठोस भूमिका घेतली नाही, तर दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कांदा-बटाटा मार्केटमधील इमारती महानगरपालिकेने धोकादायक घोषित केल्या आहेत. गेल्या वर्षी मार्केट मोकळे करण्यात येणार होते, परंतु शासनाने त्यास स्थगिती दिलेली आहे. पुनर्बांधणीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही प्रयत्न सुरू आहेत. धोकादायक ठिकाणी व्यापाºयांनी तात्पुरती दुरुस्तीही केली आहे.- अनिल चव्हाण,सचिव, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई