शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

अधिकारी निवडणुकीच्या कामात तर फेरीवाले जोमात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 11:25 PM

कारवाई करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

योगेश पिंगळे।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे शहरातील फेरीवाल्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. रेल्वे स्टेशन व महत्त्वाच्या ठिकाणी रोडसह पदपथावर फेरीवाल्यांनी ठाण मांडले असून, त्यामुळे रहदारीसही अडथळे निर्माण झाले आहेत.नवी मुंबई शहरातील नेरु ळ, सानपाडा, वाशी आदी ठिकाणच्या वर्दळ असलेल्या ठिकाणचे पदपथ फेरीवाल्यांनी काबीज केले आहेत. त्यामुळे नागरिकांना पदपथावरून चालणे जिकिरीचे झाले आहे. रेल्वे स्थानकांजवळील पदपथावर खाद्यपदार्थ, फळे, भाजी, कापडविक्रे त्यांनी जागा अडविण्यास सुरुवात केली आहे. फेरीवाल्यांनी पदपथावर थाटलेल्या व्यवसायामुळे रेल्वे स्थानकांबाहेरील परिसरात वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहे. नेरु ळ रेल्वेस्थानकाच्या बाहेरील पदपथावर फेरीवाले बेकायदेशीरपणे व्यवसाय करतात. तसेच याच पदपथासमोर रस्त्याच्या कडेला हातगाड्यांवरही फेरीवाले व्यवसाय करीत आहेत. यामुळे रस्त्याचा बराचसा भाग व्यापला जात असून, वाहने ये-जा करताना अडथळा निर्माण होऊन संध्याकाळी वाहतूककोंडी होत आहे. महापालिकेच्या माध्यमातून कारवाई केल्या जातात; परंतु गेल्या काही दिवसांपासून कारवाईकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले असून, यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.कोपरखैरणे सेक्टर १५ व १८ च्या मधील रोडवर दोन्ही बाजूला फेरीवाले बसत आहेत. सायंकाळी हा रोड वाहतुकीला जवळपास बंद केला जात आहे. रोडवरून पायी जाणेही अशक्य होऊ लागले आहे.नागरिकांमध्ये नाराजीनेरुळ, सानपाडा रेल्वेस्टेशन व शहरातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी रोडसह पदपथ फेरीवाल्यांनी अडविले आहेत. पदपथावरून चालणेही अशक्य होऊ लागले आहे. वाहतूककोंडीही होत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. कारवाई होत नसल्यामुळे पालिकेविषयी असंतोष निर्माण होऊ लागला आहे.फेरीवाल्यांना अभयमहापालिका प्रशासन कधीच गांभीर्याने अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत नाही. आयुक्तपदावर तुकाराम मुंडे असताना शहरातील फेरीवाले गायब झाले होते. रोड व पदपथ मोकळे झाले होते; परंतु त्यांच्या बदलीनंतर पुन्हा जैसे थे स्थिती झाली आहे. विभाग कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांकडून अभय मिळू लागले आहे.शहराबाहेरून येत आहेत विक्रेतेनवी मुंबईच्या बाहेरून मानखुर्द, गोवंडी व इतर ठिकाणावरून फेरीवाले नवी मुंबईमध्ये येऊ लागले आहेत. मोक्याच्या ठिकाणी जागा अडविल्या जात आहेत. निवडणुकीमध्ये अधिकारी व कर्मचारी व्यस्त असल्याने कारवाई होत नाही. याचा गैरफायदा घेऊन शहरात कायमस्वरूपी बस्तान मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे.