शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

विकासकामांमध्ये पोलिसांचा अडथळा, पदपथांची कामेही अडविली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 5:12 AM

वाहतुकीला शिस्त लावण्यास अपयशी ठरलेल्या वाहतूक पोलिसांनी शहरातील विकासकामांना अडथळा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : वाहतुकीला शिस्त लावण्यास अपयशी ठरलेल्या वाहतूक पोलिसांनी शहरातील विकासकामांना अडथळा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. पदपथांची कामेही बंद पाडायला सुरुवात केली आहे. आयुक्त रामास्वामी एन. यांनी याविषयी आयुक्त व उपआयुक्तांकडे नाराजी व्यक्त केली आहे. अशीच स्थिती राहिली तर अडवणूक करणाऱ्या अधिकाºयांची थेट गृहमंत्रालयाकडे तक्रार केली जाणार आहे.नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अनेक ठिकाणी पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वाहतूककोंडी वाढू लागली आहे. रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा, अवैध प्रवासी वाहतूक व इतर समस्या सोडविण्यास पोलिसांना अपयश येऊ लागले आहे. वाहतुकीला शिस्त लावण्याचे सोडून पोलिसांनी महानगरपालिकेच्या कामांमध्ये अडथळे निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपासून शहरात सुरू असलेली पदपथ दुरुस्ती व इतर कामे अडविली जात आहेत. सानपाडा सेक्टर-३० रेल्वेस्थानकासमोरील पदपथ व गटार दुरुस्तीचे काम तीन वेळा बंद करण्यात आले. ठेकेदाराचे साहित्यही उचलून नेण्यात आले आहे. वाशी, तुर्भे व इतर विभागांमध्येही पदपथांची कामे वाहतूक पोलिसांनी थांबविल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे शहरातील विकासकामे ठप्प झाली आहेत. ज्या कामांमुळे वाहतूककोंडी होत नाही. वाहतुकीवर कोणताही परिणाम होत नाही ती कामे अडविण्याचा अधिकार पोलिसांना दिला कोणी? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पोलिसांच्या मनमानीविषयी नागरिक, ठेकेदार, लोकप्रतिनिधी व पालिकेच्या अधिकाºयांनीही नाराजी व्यक्त केली आहे.बुधवारी आयुक्त रामास्वामी एन. यांनी आढावा बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्येही अभियांत्रिकी विभागाने वाहतूक पोलिसांच्या मनमानीमुळे विकासकामांवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. आयुक्तांनीही याविषयी आश्चर्य व्यक्त केले. ज्या ठिकाणी वाहतुकीमध्ये बदल करायचा आहे. रस्ता बंद करून कामे करायची असल्यास पोलिसांना त्याची माहिती देणे आवश्यक आहे; परंतु पदपथ व गटारांच्या कामासाठी त्यांना माहिती देण्याची आवश्यकता नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. वाहतूक पोलीस उपआयुक्त व पोलीस आयुक्तांशीही फोनवरून याविषयी चर्चा केली आहे. महानगरपालिकेच्या कामामध्ये विनाकारण अडथळा होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पोलीस आयुक्त मनमानी करणाºयांवर काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महा पालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जर वाहतूक पोलिसांनी पदपथ व गटारांची कामे अडविली, तर थेट गृहमंत्रालयाकडे संबंधितांची तक्रार केली जाणार आहे.सद्यस्थितीत३६३४ कामे सुरूमहानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये सद्यस्थितीमध्ये ३६३४ कामे सुरू आहेत. यामध्ये २५ लाखांपेक्षा जास्त रकमेची १६३ कामे, ५ ते २५ लाख रुपयांपर्यंतची ३१० कामे, ५ लाखांपेक्षा कमी रकमेची २६४६ व एक लाखपेक्षा कमी रकमेची ५१५ कामे सुरू आहेत. डिसेंबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये ३२२ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. स्थायी समितीमध्ये प्रत्येक आठवड्याला कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली जात आहे. सर्व कामे पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक आहे. पोलिसांनी अडथळे निर्माण केल्यास कामे वेळेत पूर्ण होणार नाहीत.मनमानीविषयी नाराजीविकासकामांना अडथळा करून मनमानी करणाºया वाहतूक पोलिसांविषयी नाराजी वाढू लागली आहे. सानपाडा रेल्वेस्थानकासमोर ओला-उबेर टॅक्सीच्या अनधिकृत पार्किंगवर तक्रारी करून कारवाई केली जात नाही. दत्तमंदिर रोडवर चुकीच्या दिशेला लावलेले नो पार्किंगचे बोर्ड हलविले जात नाहीत. तुर्भे इंदिरानगर रोडवरील डम्पर पार्किंगविरोधात कारवाई न करणारे पोलीस पदपथ व गटारांची कामे अडवून नक्की काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत.वाहतूक पोलिसांनी पदपथ व गटारांची कामे अडविल्याचे काही अधिकाºयांनी बैठकीमध्ये निदर्शनास आणून दिले आहे. पदपथ, गटारांची कामे करताना वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होत नाही. यामुळे पोलिसांनी विनाकारण अडवणूक करू नये. यासाठी पोलीस आयुक्त व उपआयुक्तांशी चर्चा केली आहे.- डॉ. रामास्वामी एन.,आयुक्त, महानगरपालिका 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई