शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामात अडथळा; शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 11:53 PM

अगोदर पुनर्वसन करा, मगच विद्युत वाहिन्या भूमिगत करा, अशी मागणी करीत प्रकल्पग्रस्तांनी काम बंद पाडल्याने सिडकोसमोर पेच निर्माण झाला आहे.

नवी मुंबई : विमानतळ प्रकल्पासाठी उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत कराव्या लागणार आहेत. त्यानुसार सिडकोने कार्यवाहीसुद्धा सुरू केली आहे; परंतु या विद्युत वाहिनीखालील जमिनी कसणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी पुनर्वसनाच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतल्याने या कामात मोठा अडथळा निर्माण होताना दिसत आहे. अगोदर पुनर्वसन करा, मगच विद्युत वाहिन्या भूमिगत करा, अशी मागणी करीत प्रकल्पग्रस्तांनी काम बंद पाडल्याने सिडकोसमोर पेच निर्माण झाला आहे.विमानतळाच्या गाभा क्षेत्रातून टाटा पॉवर कंपनीची अतिउच्चदाबाची ओव्हरहेड लाइन गेली आहे. विमानतळाच्या कामात या विद्युत लाइनचा मोठा अडथळा निर्माण झाल्याने त्या भूमिगत करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, या विद्युत वाहिनीखालील जमीन कुळ असलेल्या ११४ शेतकऱ्यांच्या ताब्यात आहेत. १९३० पासून आपण ही जमीन कसत असल्याचा दावा या शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याअगोदर त्याखालील जमिनीच्या संपादनापोटी मोबदला मिळावा, अशी मागणी पारगाव, पारगाव डुंगी व कोल्ही येथील ग्रामस्थांनी केली आहे. त्यासाठी येथील ग्रामस्थांनी थेट राज्य सरकार, सिडको, कोकण विभागीय आयुक्त, महसूल विभाग आदीकडे लेखी निवेदन दिले आहे.शेतकºयांच्या या मागणीची दखल घेत, राज्य सरकारने टाटा पॉवर लाइनखालील जमीन कसणाºया शेतकºयांना अनुदान देण्याचे निर्देश सिडकोला दिले होते. या पार्श्वभूमीवर सिडकोने २०१४ मध्ये कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. त्यानुसार कोकण विभागीय आयुक्तांनी पनवेलचे प्रांत अधिकारी यांना अहवाल तयार करून सादर करण्याचे आदेश दिले आहेत; परंतु आजतागायत प्रांत किंवा कोकण विभागीय आयुक्तांनी याबाबत कोणताही अहवाल सिडकोला दिला नसल्याचे पारगावचे शेतकरी व दहा गाव प्रकल्पबाधित समितीचे सदस्य नंदकुमार भोईर यांनी स्पष्ट केले आहे.सिडकोने विमानतळबाधित दहा गावांतील प्रकल्पग्रस्तांचे साडेबावीस टक्के भूखंड देऊन पुनर्वसन केले त्याच धर्तीवर टाटा पॉवर लाइनखालील जमीन कसणाºया शेतकºयांचेदेखील सिडकोने पुनर्वसन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तुटपुंजे अनुदान देऊन प्रकल्पग्रस्तांची बोळवण करण्याचा प्रयत्न सिडकोच्या अधिकाºयांनी केला, तर विमानतळ प्रकल्प होऊ देणार नसल्याचा इशारा येथील ११४ प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.पूर्वीचा मोबदला अत्यल्पमुंबईला विद्युत पुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या टाटा इलेक्ट्रिक कंपनीच्या टॉवरसाठी येथील शेतकºयांच्या १९३० मध्ये जमिनी संपादित करण्यात आल्या. संपादित केलेल्या शेतकºयाच्या सुमारे १७.५ हेक्टर जमिनीचा मोबदला अल्प प्रमाणात देण्यात आला; परंतु या विद्युत वाहिन्यांखालील जमीन आजतागायत येथील शेतकºयांच्या ताब्यात असून, त्यावर ते भातशेती करीत आहेत. आता ही जमीन विमानतळ प्रकल्पासाठी संपादित केली जाणार आहे, त्यामुळे अन्य विमानतळ प्रकल्पाासाठी संपादित करण्यात आलेल्या अन्य जमिनीप्रमाणेच आम्हालाही पुनर्वसनाचा लाभ मिळावा, अशी येथील ११४ शेतकºयांची मागणी आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई