शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

एप्रिलमध्ये 26,930 रुग्ण वाढले, मृत्युदर रोखण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 00:28 IST

नवी मुंबईची एक लाख रुग्णसंख्येकडे वाटचाल : मृत्युदर रोखण्याचे आव्हान

नामदेव मोरे

नवी मुंबई : एप्रिल महिना नवी मुंबईकरांसाठी सर्वाधिक धोकादायक ठरला आहे. एक महिन्यात तब्बल २६,९३० रुग्ण वाढले असून १९४ जणांचा मृत्यू झाला आहे. एक लाख रुग्णसंख्येच्या दिशेने शहराची वाटचाल सुरू झाली आहे. रुग्णवाढीपेक्षा मृत्यूचा वाढणारा आकडा चिंताजनक असून मृत्युदर रोखणे हेच आरोग्य यंत्रणेसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे.

नवी मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. तेव्हापासून या संकटाशी यंत्रणा लढा देत आहे. मार्च ते सप्टेंबर दरम्यान रुग्णसंख्या झपाट्याने वाढत राहिली. जुलैमध्ये सर्वाधिक १४,९६७ रुग्ण वाढले व २०७ जणांचा मृत्यू झाला होता. ऑगस्ट व सप्टेंबरमध्येही १० हजारपेक्षा जास्त रुग्ण वाढले. पहिल्या लाटेमध्येही शहरात बेडची कमतरता निर्माण झाली होती. महानगरपालिकेने वाशीमध्ये १२०० बेडचे रुग्णालय सुरू केले. खासगी रुग्णालयांची मदत घेतली. बेडची संख्या वाढविली. ब्रेक द चेन अभियानही प्रभावीपणे राबविल्यामुळे ऑक्टोबरपासून पहिली लाट ओसरण्यास सुरुवात झाली. ऑक्टोबर ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत पाच महिने सातत्याने रुग्णसंख्या कमी होत होती. शहरात आयसीयू व व्हेंटिलेटर्स बेडची कमतरता निर्माण झाली. 

वेळेत आयसीयू सुविधा मिळत नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढू लागले.  

नोव्हेंबरपासून मार्चपर्यंत मृत्युदर नियंत्रणात होता. पाच महिने सरासरी शंभरपेक्षा कमी मृत्यू होत होते. एप्रिलमध्ये मृत्युदरानेही उसळी घेतली व एका महिन्यात १९४ जणांचा मृत्यू झाला. पहिली लाट ओसरल्यानंतर पुन्हा रुग्ण वाढतील याचा अंदाज आरोग्य विभागास आला नाही. पहिल्या लाटेचा अनुभव असतानाही व्हेंटिलेटर्स व आयसीयू बेड वाढविण्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. यामुळे दुसरी लाट धोकादायक ठरली. आरोग्य यंत्रणा कोलमडून गेली. रण एप्रिलमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढू लागल्यामुळे शहरवासीयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर मनपाने पुन्हा गाफील राहू नये. आरोग्य विभागातील उणिवा भरून काढाव्या. शहरात आयसीयू व व्हेंटिलेटर्स बेडची क्षमता वाढवून ऐरोली व नेरूळ रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालवावे, अशी मागणी होऊ लागली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई