शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
3
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
5
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
6
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
7
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
8
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
9
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
10
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
11
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
13
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
15
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
16
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
17
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
18
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
19
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
20
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले

झाडांच्या वेदनांकडे शहरवासीयांचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 02:40 IST

पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नवी मुंबईसह पनवेलमध्ये प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली जात आहे.

- नामदेव मोरे नवी मुंबई : पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नवी मुंबईसह पनवेलमध्ये प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली जात आहे. परंतु उपलब्ध वृृक्षांचे संवर्धन व त्यांच्यावर होणारे आघात थांबविण्यासाठी काहीही यंत्रणा उपलब्ध नाही. वृक्षांना खिळे ठोकून त्यावर बॅनर लावले जातात. मॉल्स, दुकानांसमोरील वृक्ष जाणीवपूर्वक हटविले जात आहेत. झाडांच्या वेदनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून स्मार्ट सिटीमध्येही खिळेमुक्त झाड अभियान राबविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.कोपरखैरणेमधील पंचरत्न हॉटेलजवळ झाडाला लागून लोखंडी पोल रोवण्यात आले होते. वृक्षाची वाढ झाल्यामुळे तो पोल वृक्षाच्या बुंध्यामध्ये गेला असून गंजलेल्या पोलमुळे वृक्षाच्या आयुर्मानामध्ये फरक पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यापूर्वी वाशीमधील काही मोठ्या दुकानांसमोरील वृक्ष अचानक सुकले. सानपाडामधील एक शाळेच्या समोरही अशीच घटना घडली होती. एखादे दुकान, शोरूम किंवा मोठ्या आस्थापनांच्या प्रवेशद्वारासमोरील वृक्षच कसे सुकतात याकडे कधीच कोणी लक्ष देत नाही. झाडांवर विषप्रयोग केल्याचे आरोपही होतात, परंतु त्याकडेही दुर्लक्ष केले जाते. शहरातील हजारो झाडांवर नागरिकांनी त्यांच्या फायद्यासाठी खिळे ठोकले आहेत. अनेकांनी होर्डिंग, दुकानांचे नामफलक, विद्युत रोषणाई व इतर कामांसाठी मोठ्या प्रमाणात खिळे ठोकले आहेत. काही ठिकाणी वृक्ष लागवड केल्यानंतर सुरक्षेसाठी तारेचे कुंपण लावले जाते. परंतु वृक्षाची वाढ सुरू झाल्यानंतर ते कुंपण काढले जात नाही व ते पुढे मुळांमध्ये जाते. खिळे गंजले की त्याचे विष झाडांमध्ये उतरते व अनेक वेळा पावसाळ्यात किंवा सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये वृक्ष कोसळून जातात किंवा सुकतात. नवी मुंबई व पनवेलमध्ये अनेक ठिकाणी झाडांना वेदना सहन कराव्या लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.पुणे शहरामध्ये आंघोळीची गोळी या सामाजिक संस्थेने खिळेमुक्त झाड ही चळवळ सुरू केली आहे. पनवेलमधील कामोठेमध्ये एकता सामाजिक संस्थेने हा उपक्रम राबविण्यास सुरवात केली आहे. परंतु नवी मुंबईमध्ये मात्र अद्याप पर्यावरणप्रेमी व वृक्षपे्रमींनी अशाप्रकारचा उपक्रम सुरू केलेला नाही. पर्यावरण रक्षणासाठी फक्त वृक्षलागवड करून उपयोग नाही. उपलब्ध वृक्षांचे रक्षण करण्याची जबाबदारीही राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी व सर्वच नागरिकांनी घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. दोन्ही महापालिका क्षेत्रामध्ये ही चळवळ उभी राहिली व वृक्ष संवर्धनासाठी जनजागृती झाल्यास प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.>दहा शहरांमध्ये चळवळपुण्यामधील माधव पाटील यांनी आंघोळीची गोळी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून खिळेमुक्त अभियान सुरू केले. चार ते पाच तरूणांनी सुरू केलेल्या या अभियानामध्ये अल्पावधीमध्ये शेकडो स्वयंसेवक झाले. प्रत्येक रविवारी विभागामधील झाडांमधील खिळे काढण्यास सुरवात झाली. पाहता पाहता शेकडो झाडे खिळेमुक्त झाली. ही चळवळ मुंबईसह राज्यातील दहापेक्षा जास्त शहरांमध्ये सुरू झाली आहे.>कामोठेमध्येही खिळेमुक्तीचे कामआंघोळीची गोळी या संस्थेपासून प्रेरणा घेऊन पनवेलमधील एकता सामाजिक संस्थेने कामोठे परिसरामध्ये खिळेमुक्त झाड अभियान राबविण्यास सुरवात केली आहे. संस्थेचे अध्यक्ष अमोल शितोळे यांनी सांगितले की, झाडांच्या वेदनाकडे दुर्लक्ष केले जाते. झाडांवर खिळे ठोकल्यामुळे त्यांचे आयुर्मान कमी होते. वृक्ष कोसळण्याची शक्यता वाढते. यामुळे आम्ही झाडांना ठोकलेले खिळे काढण्यास सुरवात केली असून या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे.>कारवाईची गरजनवी मुंबई महानगरपालिका शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करत असते. परंतु दुकान मालक व इतर नागरिक त्यांच्या फायद्यासाठी वृक्षांमध्ये खिळे ठोकत असतात. वृक्षांना मोठ्या प्रमाणात इजा पोहचविली जाते. चुकीच्या पद्धतीने वृक्षांचे नुकसान करणाºयांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. शहरातील हॉटेल व बारच्या बाहेरही झाडांवर रोषणाई केली जाते. त्यासाठीही खिळे ठोकले जातात. संबंधित हॉटेल मालकांवरही कारवाई करण्याची गरज आहे.