शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत शिवसेना दोन वर्षांपासून नेतृत्वाच्या शोधात

By admin | Updated: March 22, 2017 01:40 IST

शिवसेनेमधील गटबाजी थांबविण्यासाठी मातोश्रीवर पक्षप्रमुखांना बैठक आयोजित करावी लागली. बैठकीनंतर मतभेद संपल्याचे जाहीर केले असले

नवी मुंबई : शिवसेनेमधील गटबाजी थांबविण्यासाठी मातोश्रीवर पक्षप्रमुखांना बैठक आयोजित करावी लागली. बैठकीनंतर मतभेद संपल्याचे जाहीर केले असले, तरी दुभंगलेली मने व संघटनेतील ज्येष्ठत्वाची स्पर्धा, यामुळे सुरू झालेली भांडणे सहजासहजी संपणार नाहीत. डिसेंबर २०१४ पासून जिल्हा प्रमुखपद नेमता आलेले नसून, सद्यस्थितीमध्ये स्वयंघोषित नेत्यांची संख्या वाढल्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांची नाराजी व्यक्त होण्यास सुरुवात झाली आहे. नवी मुंबई शिवसेनेतील वाद विकोपाला गेले आहेत. आता सर्वांसमोर आलेल्या गटबाजीला लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या राजन विचारे यांना ऐरोली मतदार संघातून ९३,६१० व त्यांचे प्रतिस्पर्धी संजीव नाईक यांना ७३,१७६ मते पडली. बेलापूर मतदार संघात विचारे यांना ९०,९८६ व नाईक यांना ६५,२०२ मते पडली. नाईकांच्या बालेकिल्ल्याला सेनेने खिंडार पाडले व शिवसैनिकांचा उत्साह प्रचंड वाढला. आता विधानसभा व महापालिकेत भगवा फडकणारच, अशा वल्गना सुरू झाल्या. विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही मतदार संघात उमेदवारीवरून भांडणे झाली. अखेर या भांडणाची फलनिष्पत्ती पराभवामध्ये झाली. पराभवामुळे विजय नाहटा व विजय चौगुले यांच्यातील वाद विकोपाला गेले व वडार भवनमध्ये दोघांनी एकमेकांवर उघडपणे तोंडसुख घेतले. यानंतर डिसेंबर २०१४मध्ये चौगुले यांच्यावर बलात्काराचा आरोप झाला व पक्षाने त्यांना जिल्हाप्रमुख पदावरून दूर केले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पाडून अनेकांच्या हातामध्ये भगवा देण्यात आला. यामुळे निवडणुकीमध्ये नगरसेवकांची संख्या वाढली; पण वाढलेल्या संख्येला नियंत्रणात ठेवण्यासाठी नेतृत्वच शिल्लक राहिले नाही. तब्बल २ वर्षे ३ महिने नवी मुंबईमध्ये जिल्हा प्रमुखपदाची नियुक्ती केलेली नाही. पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार राजन विचारे यांची सर्व नगरसेवकांवर पकड नाही. विजय नाहटा हे पाहुणे कलाकार बनले आहेत. एम. के. मढवी, शिवराम पाटील, नामदेव भगत यांच्यासारखे दिग्गज नगरसेवक पक्षात असल्याने पूर्वीसारखे चौगुले यांचे एकहाती वर्चस्व राहिलेले नाही. पक्षाने नव्याने आलेल्यांचा विश्वास संपादन करण्यापेक्षा त्यांच्याशी वाद वाढविण्याकडेच जास्त वेळ चौगुले व त्यांच्या समर्थकांचा गेला. हे वाद वाढविण्याऐवजी त्यात भर टाकण्याचे काम इतरांनी केले आहे. शिवसेनेमध्ये सगळा सावळा गोंधळ निर्माण झाला असून फूट पडण्याच्या भीतीने कार्यकारिणीच जाहीर केली जात नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.