शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

नवी मुंबईत शिवसेना दोन वर्षांपासून नेतृत्वाच्या शोधात

By admin | Updated: March 22, 2017 01:40 IST

शिवसेनेमधील गटबाजी थांबविण्यासाठी मातोश्रीवर पक्षप्रमुखांना बैठक आयोजित करावी लागली. बैठकीनंतर मतभेद संपल्याचे जाहीर केले असले

नवी मुंबई : शिवसेनेमधील गटबाजी थांबविण्यासाठी मातोश्रीवर पक्षप्रमुखांना बैठक आयोजित करावी लागली. बैठकीनंतर मतभेद संपल्याचे जाहीर केले असले, तरी दुभंगलेली मने व संघटनेतील ज्येष्ठत्वाची स्पर्धा, यामुळे सुरू झालेली भांडणे सहजासहजी संपणार नाहीत. डिसेंबर २०१४ पासून जिल्हा प्रमुखपद नेमता आलेले नसून, सद्यस्थितीमध्ये स्वयंघोषित नेत्यांची संख्या वाढल्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांची नाराजी व्यक्त होण्यास सुरुवात झाली आहे. नवी मुंबई शिवसेनेतील वाद विकोपाला गेले आहेत. आता सर्वांसमोर आलेल्या गटबाजीला लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या राजन विचारे यांना ऐरोली मतदार संघातून ९३,६१० व त्यांचे प्रतिस्पर्धी संजीव नाईक यांना ७३,१७६ मते पडली. बेलापूर मतदार संघात विचारे यांना ९०,९८६ व नाईक यांना ६५,२०२ मते पडली. नाईकांच्या बालेकिल्ल्याला सेनेने खिंडार पाडले व शिवसैनिकांचा उत्साह प्रचंड वाढला. आता विधानसभा व महापालिकेत भगवा फडकणारच, अशा वल्गना सुरू झाल्या. विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही मतदार संघात उमेदवारीवरून भांडणे झाली. अखेर या भांडणाची फलनिष्पत्ती पराभवामध्ये झाली. पराभवामुळे विजय नाहटा व विजय चौगुले यांच्यातील वाद विकोपाला गेले व वडार भवनमध्ये दोघांनी एकमेकांवर उघडपणे तोंडसुख घेतले. यानंतर डिसेंबर २०१४मध्ये चौगुले यांच्यावर बलात्काराचा आरोप झाला व पक्षाने त्यांना जिल्हाप्रमुख पदावरून दूर केले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पाडून अनेकांच्या हातामध्ये भगवा देण्यात आला. यामुळे निवडणुकीमध्ये नगरसेवकांची संख्या वाढली; पण वाढलेल्या संख्येला नियंत्रणात ठेवण्यासाठी नेतृत्वच शिल्लक राहिले नाही. तब्बल २ वर्षे ३ महिने नवी मुंबईमध्ये जिल्हा प्रमुखपदाची नियुक्ती केलेली नाही. पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार राजन विचारे यांची सर्व नगरसेवकांवर पकड नाही. विजय नाहटा हे पाहुणे कलाकार बनले आहेत. एम. के. मढवी, शिवराम पाटील, नामदेव भगत यांच्यासारखे दिग्गज नगरसेवक पक्षात असल्याने पूर्वीसारखे चौगुले यांचे एकहाती वर्चस्व राहिलेले नाही. पक्षाने नव्याने आलेल्यांचा विश्वास संपादन करण्यापेक्षा त्यांच्याशी वाद वाढविण्याकडेच जास्त वेळ चौगुले व त्यांच्या समर्थकांचा गेला. हे वाद वाढविण्याऐवजी त्यात भर टाकण्याचे काम इतरांनी केले आहे. शिवसेनेमध्ये सगळा सावळा गोंधळ निर्माण झाला असून फूट पडण्याच्या भीतीने कार्यकारिणीच जाहीर केली जात नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.