शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

ग्रीन कॉरिडोरमध्ये आधुनिकतेची गरज

By admin | Updated: September 12, 2015 01:05 IST

शिवसेनेच्या प्रयत्नाने वाशी टोलनाक्यावर रुग्णवाहिकेसाठी ग्रीन कॉरिडोर बनवण्यात आला आहे. वाहतूक कोंडीदरम्यान रुग्णवाहिकेला प्राधान्य मिळावे यासाठी ही संकल्पना

- सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबईशिवसेनेच्या प्रयत्नाने वाशी टोलनाक्यावर रुग्णवाहिकेसाठी ग्रीन कॉरिडोर बनवण्यात आला आहे. वाहतूक कोंडीदरम्यान रुग्णवाहिकेला प्राधान्य मिळावे यासाठी ही संकल्पना राबवण्यात आलेली आहे. परंतु मानवरहित या यंत्रणेत आधुनिकता आणण्याची गरज सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे. शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून वाशी टोलनाक्यावर रुग्णवाहिकांसाठी ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला आहे. रुग्णांना घेवून जाणाऱ्या रुग्णवाहिकांची टोलनाक्यावर वाहतूक कोंडीत अडवणूक होवू नये याकरिता शिवसेनेने एम.एस.आर.डी.सी. कडे हा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल मिळताच ३० आॅगस्ट रोजी त्याची सुरवात करण्यात आली. ही संकल्पना राज्यात इतरही टोलनाक्यावर देखील राबवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. परंतु वाशी टोलनाक्यावरील ग्रीन कॉरिडोरच्या संकल्पनेबाबत सर्वसामान्यांना अनेक प्रश्न सतावत आहेत. ही यंत्रणा राबवण्यासाठी खाजगी ठेकेदारामार्फत कामगार नेमलेले आहेत. टोलनाक्यालगत उभारलेल्या टॉवरवर उभा कर्मचारी येणाऱ्या रुग्णवाहिकेवर नजर ठेवून असतो. यादरम्यान टोलकडे येणारी रुग्णवाहिका दिसताच तो झेंडा दाखवून टॉवरखाली उभ्या असलेल्या दुसऱ्या कर्मचाऱ्याला इशारा करतो. त्यावेळी राखीव लेन खुली करून रुग्णवाहिकेला पुढे पाठवले जाते. वाशी टोलनाक्यावरून प्रत्येक तासाला ५ ते ६ रुग्णवाहिका मुंबईकडे जातात.टॉवरवरचा कर्मचारी आठ तासांच्या ड्युटीमध्ये केवळ रुग्णवाहिकेवर नजर ठेवून असतो. अशावेळी ऊन, वारा, पावसासह प्रदूषणाचा सामना करत कर्तव्य बजावणाऱ्या या कामगाराकडून त्रुटी होण्याची देखील शक्यता नाकारता येणार नाही. यामुळे सदर यंत्रणेत तंत्रज्ञानाचा वापर होण्याची गरज व्यक्त होत आहे. टोलनाक्यापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर सिग्नल आहेत. त्याठिकाणी अद्ययावत स्वयंचलित सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास येणाऱ्या रुग्णवाहिकेची माहिती टोलनाक्यावर कंट्रोलरूमला मिळू शकते. त्यानुसार तिथला कर्मचारी आवश्यकतेनुसार रुग्णवाहिकेसाठी लेन खुली करू शकतो. यामुळे कर्मचाऱ्याचा टॉवरवर उभे राहण्याचाही त्रास टळू शकतो.टोलनाक्यापेक्षा शहरातील काही रस्ते व सिग्नलवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते. त्याठिकाणी अडकलेल्या रुग्णवाहिकेलाही पुढे जाण्यासाठी सहज मार्ग मिळत नाही. याकडे मात्र कोणाचेही लक्ष गेलेले नाही. अशा ठिकाणी वाहतूक कोंडीमधून रुग्णवाहिकेचा मार्ग कसा मोकळा करता येईल यावर उपाययोजनेची गरज आहे. ठाणे - बेलापूर मार्गावर तुर्भे स्टोअर, वाशी सेक्टर ९, कोपरखैरणे डिमार्ट ते सेक्टर १५ नाका, नेरुळ सेक्टर १०, शिरवणे गाव यासह अशी अनेक ठिकाणे आहेत. त्याठिकाणी वाहतूक कोंडीमध्ये रुग्णवाहिका अडकल्याचे हमखास पहायला मिळते.रुग्णवाहिकेसाठी कायमस्वरूपी ग्रीन कॉरिडोर ही संकल्पना चांगली आहे. परंतु टोलनाक्यापेक्षा शहरातील काही मार्गावर वाहतूक कोंडी अधिक असते. त्यामधून रुग्णवाहिका कशी सोडवता येईल यावरही अंमलबजावणी आवश्यक आहे.- राकेश सावंत, नागरिक