शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

Maharashtra Election 2019 : खडसे, तावडे राष्ट्रवादीच्या संपर्कात, शरद पवार यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 06:00 IST

भाजपचे मंत्री विनोद तावडे, माजी मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शरद पवार यांनी गुरुवारी केला.

ठाणे : भाजपचे मंत्री विनोद तावडे, माजी मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शरद पवार यांनी गुरुवारी केला. भाजपच्या नेत्यांच्या मनातील ही खदखद आजची नसून अनेक महिन्यांची आहे. तेव्हापासून हे सर्व नेते आमच्या संपर्कात असल्याची पुस्ती पवार यांनी जोडली. त्यांच्याबाबत योग्यवेळी निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.ईडीच्या चौकशीत आपले नाव गोवण्याचा प्रयत्न हा केवळ माझा एकट्याचा प्रश्न नसून विरोधकांचा आवाज दाबून टाकण्यासाठी ईडी, सीबीआय यासारख्या यंत्रणांचा वापर करण्यात येत आहे. ईडीच्या या प्रेमप्रकरणानंतर लोकांचा प्रतिसाद वाढला आहे, असे सांगत यावेळी परिवर्तन होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शरद पवार हे गुरुवारी राष्टÑवादीचे मुंब्रा-कळवा मतदारसंघाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ठाण्यात आले होते. त्यावेळी पवार बोलत होते.पवार म्हणाले की, ज्यावेळी सत्ताधारी पक्ष म्हणून लोकांपुढे जाण्यासाठी काहीही मुद्दे नसतात, तेव्हा धार्मिक मुद्दे उपस्थित करून भावनिक आवाहन केले जाते. काश्मीर आणि राम मंदिर हे विधानसभा निवडणुकीचे मुद्दे असू शकत नाहीत. राज्यात बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. मात्र, त्यावर हे सरकार बोलायला तयार नाही. सत्तेचा गैरवापर करून ईडी आणि सीबीआयसारख्या यंत्रणांचा ससेमिरा विरोधकांच्या मागे लावून दिला जात आहे. यात ईडीला मी दोष देणार नाही. ईडीला वरून सूचना आल्याने त्यांनी त्याचे पालन केले.माझ्या ५० वर्षांच्या सामाजिक जीवनात तरुणवर्गाचा इतका उदंड प्रतिसाद मी पहिल्यांदाच अनुभवत असल्याचे सांगत पवार यांनी आव्हाडांचे कौतुक केले. महाराष्ट्रात काढलेल्या दौऱ्यांमध्ये ८० टक्के तरुण मतदार विद्यमान सरकारच्या कारभारावर नाराज असल्यादा दावा त्यांनी केला.अजितदादांच्या नाराजीसंदर्भात विचारले असता पवार म्हणाले की, पवार कुटुंबीय कोणत्याही प्रकारे हवालदिल झाले नव्हते. माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमुळे ते भावुक झाले होते. राजकारणात कोणी कुठे जायचे, हा ज्या त्या लोकांचा अधिकार असतो. मात्र, मतदार फार सुज्ञ असतात. ते त्यांचा अधिकार योग्य पद्धतीने बजावतील, असा टोला पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना लगावला.लपवलेले गुन्हे जाहीर करावेतमुख्यमंंत्र्यांनी आपल्यावरील गुन्हे लपवले असतील, तर ते त्यांनी जाहीर करावेत. जी काही माहिती असेल, ती त्यांनी द्यावी. जनतेची व आयोगाची दिशाभूल करू नये, असे मत पवार यांनी व्यक्त केले. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर अधिक भाष्य करणे अयोग्य असल्याचे सांगितले.गणेश नाईक यांनी सन्मान गमावलाभाजपमध्ये योग्य सन्मान मिळणार नाही, हे माहीत असतानाही गणेश नाईक भाजपमध्ये गेले. त्यामुळे त्यांना आता अपमान भोगावाच लागेल, असा टोला पवार यांनी लगावला.ईडी, सीबीआयचा धाक दाखवून दबाव - कन्हैया कुमारशरद पवारांवर दाखल केलेला गुन्हा म्हणजे विरोधकांवर दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचे उदाहरण आहे, असे उद्गार युवानेते कन्हैया कुमार यांनी काढले. ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून दबाव निर्माण केला जात असतानाच आ. जितेंद्र आव्हाड हे आपल्या समतामूलक विचारधारेवर ठाम आहेत. समतेसाठी, धर्मनिरपेक्षतेसाठी ते लढत आहेत. त्यामुळेच मी त्यांच्या प्रचारासाठी ठाण्यात आलो आहे. यापुढेही त्यांचा प्रचार करणार आहे, असेही कन्हैया कुमार यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारEknath Khadaseएकनाथ खडसेVinod Tawdeविनोद तावडे