शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

Maharashtra Election 2019 : खडसे, तावडे राष्ट्रवादीच्या संपर्कात, शरद पवार यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 06:00 IST

भाजपचे मंत्री विनोद तावडे, माजी मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शरद पवार यांनी गुरुवारी केला.

ठाणे : भाजपचे मंत्री विनोद तावडे, माजी मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शरद पवार यांनी गुरुवारी केला. भाजपच्या नेत्यांच्या मनातील ही खदखद आजची नसून अनेक महिन्यांची आहे. तेव्हापासून हे सर्व नेते आमच्या संपर्कात असल्याची पुस्ती पवार यांनी जोडली. त्यांच्याबाबत योग्यवेळी निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.ईडीच्या चौकशीत आपले नाव गोवण्याचा प्रयत्न हा केवळ माझा एकट्याचा प्रश्न नसून विरोधकांचा आवाज दाबून टाकण्यासाठी ईडी, सीबीआय यासारख्या यंत्रणांचा वापर करण्यात येत आहे. ईडीच्या या प्रेमप्रकरणानंतर लोकांचा प्रतिसाद वाढला आहे, असे सांगत यावेळी परिवर्तन होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शरद पवार हे गुरुवारी राष्टÑवादीचे मुंब्रा-कळवा मतदारसंघाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ठाण्यात आले होते. त्यावेळी पवार बोलत होते.पवार म्हणाले की, ज्यावेळी सत्ताधारी पक्ष म्हणून लोकांपुढे जाण्यासाठी काहीही मुद्दे नसतात, तेव्हा धार्मिक मुद्दे उपस्थित करून भावनिक आवाहन केले जाते. काश्मीर आणि राम मंदिर हे विधानसभा निवडणुकीचे मुद्दे असू शकत नाहीत. राज्यात बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. मात्र, त्यावर हे सरकार बोलायला तयार नाही. सत्तेचा गैरवापर करून ईडी आणि सीबीआयसारख्या यंत्रणांचा ससेमिरा विरोधकांच्या मागे लावून दिला जात आहे. यात ईडीला मी दोष देणार नाही. ईडीला वरून सूचना आल्याने त्यांनी त्याचे पालन केले.माझ्या ५० वर्षांच्या सामाजिक जीवनात तरुणवर्गाचा इतका उदंड प्रतिसाद मी पहिल्यांदाच अनुभवत असल्याचे सांगत पवार यांनी आव्हाडांचे कौतुक केले. महाराष्ट्रात काढलेल्या दौऱ्यांमध्ये ८० टक्के तरुण मतदार विद्यमान सरकारच्या कारभारावर नाराज असल्यादा दावा त्यांनी केला.अजितदादांच्या नाराजीसंदर्भात विचारले असता पवार म्हणाले की, पवार कुटुंबीय कोणत्याही प्रकारे हवालदिल झाले नव्हते. माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमुळे ते भावुक झाले होते. राजकारणात कोणी कुठे जायचे, हा ज्या त्या लोकांचा अधिकार असतो. मात्र, मतदार फार सुज्ञ असतात. ते त्यांचा अधिकार योग्य पद्धतीने बजावतील, असा टोला पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना लगावला.लपवलेले गुन्हे जाहीर करावेतमुख्यमंंत्र्यांनी आपल्यावरील गुन्हे लपवले असतील, तर ते त्यांनी जाहीर करावेत. जी काही माहिती असेल, ती त्यांनी द्यावी. जनतेची व आयोगाची दिशाभूल करू नये, असे मत पवार यांनी व्यक्त केले. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर अधिक भाष्य करणे अयोग्य असल्याचे सांगितले.गणेश नाईक यांनी सन्मान गमावलाभाजपमध्ये योग्य सन्मान मिळणार नाही, हे माहीत असतानाही गणेश नाईक भाजपमध्ये गेले. त्यामुळे त्यांना आता अपमान भोगावाच लागेल, असा टोला पवार यांनी लगावला.ईडी, सीबीआयचा धाक दाखवून दबाव - कन्हैया कुमारशरद पवारांवर दाखल केलेला गुन्हा म्हणजे विरोधकांवर दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचे उदाहरण आहे, असे उद्गार युवानेते कन्हैया कुमार यांनी काढले. ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून दबाव निर्माण केला जात असतानाच आ. जितेंद्र आव्हाड हे आपल्या समतामूलक विचारधारेवर ठाम आहेत. समतेसाठी, धर्मनिरपेक्षतेसाठी ते लढत आहेत. त्यामुळेच मी त्यांच्या प्रचारासाठी ठाण्यात आलो आहे. यापुढेही त्यांचा प्रचार करणार आहे, असेही कन्हैया कुमार यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारEknath Khadaseएकनाथ खडसेVinod Tawdeविनोद तावडे