शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

दुष्ट प्रवृत्तींविरोधात लढा देणार

By admin | Updated: March 24, 2017 01:19 IST

माथाडी कामगार चळवळीमध्ये गुंड प्रवृत्ती वाढल्या आहेत. दुष्ट प्रवृत्तींना शासनाने वेळेत आळा घालावा.

नवी मुंबई : माथाडी कामगार चळवळीमध्ये गुंड प्रवृत्ती वाढल्या आहेत. दुष्ट प्रवृत्तींना शासनाने वेळेत आळा घालावा. चळवळीमध्ये शिरलेल्या प्रवृत्तींविरोधात आवाज उठविणार आहोत. माथाडी कायदा टिकविण्यासाठी व कामगारांच्या हितासाठी लढताना आमचा मुडदा पडला तरी घाबरत नाही, असे मत आमदार नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी नरेंद्र पाटील यांनी चळवळीचा गैरफायदा घेणाऱ्या बोगस संघटना व त्यांच्या स्वयंघोषित नेत्यांवर कडाडून टीका केली. कामगारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी अण्णासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे निर्माण झालेल्या कायद्याचा दुरुपयोग सुरू आहे. अनेक गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती प्रामाणिक कामगारांना त्रास देत आहेत. अशा दुष्ट प्रवृत्तींना शासनाने वेळेत आळा घालावा. कायद्याचा दुरुपयोग करून दहशत निर्माण करणाऱ्यांच्या विरोधात आवाज उठविणार असून, या लढ्यात वेळप्रसंगी आमचा मुडदा पडला तरी घाबरत नाही, असे मत व्यक्त केले. कामगारांची घरे, लेव्हीचा प्रश्न सोडविण्यात यावा. मापाडी कामगारांची थकीत रक्कम मिळावी. माथाडी बोर्डांची रचना करण्यात यावी. बोर्डामध्ये नोकरभरती करताना माथाडींच्या मुलांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी केली. गणेश नाईक यांनीही अण्णासाहेब पाटील यांच्या योगदानामुळे कामगार सुरक्षित असल्याचे मत व्यक्त केले. अण्णासाहेब असते तर देशातील प्रत्येक मंडईमध्ये माथाडी कायद्याची अंमलबजावणी झाली असते, असे मत व्यक्त केले. नवी मुंबईमध्ये कामगारांच्या व प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर कारवाई करण्याचे षड्यंत्र प्रशासनाने आखले असल्याचे मत व्यक्त केले. नाव न घेता आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. माथाडी नेते माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनीही उद्योग टिकविताना कामगारांच्या हिताकडे दुर्लक्ष केले जावू नये, असे मत व्यक्त केले. माथाडी बोर्डांची रचना, घरांचा प्रश्न व इतर काही प्रश्न सोडविण्यासाठी कामगार मंत्र्यांनी वेळ द्यावा. महिन्यातून एक दिवस बैठकीला वेळ दिला व प्रशासनाला योग्य आदेश दिले तरी सर्व प्रश्न तत्काळ सुटतील, असे मत व्यक्त केले.मापाडी कामगारांची थकीत रक्कम देण्याचे शासनाने मान्य केले आहे, पण ती फाईल विविध अधिकाऱ्यांकडे फिरविली जात आहे. कंपन्यांमध्ये माथाडी कायदा लागू होवू नये यासाठी मालक गुंडांचा वापर करत आहेत. आम्ही त्यांना घाबरत नाही. त्यांना वठणीवर आणण्याची आमची ताकद आहे, पण आम्ही कायद्याच्या मार्गाचा अवलंब करत आहोत. आम्ही ठरविले तर राज्यातील अन्नधान्याचा पुरवठा एका दिवसात बंद करू शकतो. एवढी ताकद कामगारांची आहे. पण आंदोलन न करता चर्चेतून प्रश्न सुटावे अशी आमची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)