शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

दुष्ट प्रवृत्तींविरोधात लढा देणार

By admin | Updated: March 24, 2017 01:19 IST

माथाडी कामगार चळवळीमध्ये गुंड प्रवृत्ती वाढल्या आहेत. दुष्ट प्रवृत्तींना शासनाने वेळेत आळा घालावा.

नवी मुंबई : माथाडी कामगार चळवळीमध्ये गुंड प्रवृत्ती वाढल्या आहेत. दुष्ट प्रवृत्तींना शासनाने वेळेत आळा घालावा. चळवळीमध्ये शिरलेल्या प्रवृत्तींविरोधात आवाज उठविणार आहोत. माथाडी कायदा टिकविण्यासाठी व कामगारांच्या हितासाठी लढताना आमचा मुडदा पडला तरी घाबरत नाही, असे मत आमदार नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी नरेंद्र पाटील यांनी चळवळीचा गैरफायदा घेणाऱ्या बोगस संघटना व त्यांच्या स्वयंघोषित नेत्यांवर कडाडून टीका केली. कामगारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी अण्णासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे निर्माण झालेल्या कायद्याचा दुरुपयोग सुरू आहे. अनेक गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती प्रामाणिक कामगारांना त्रास देत आहेत. अशा दुष्ट प्रवृत्तींना शासनाने वेळेत आळा घालावा. कायद्याचा दुरुपयोग करून दहशत निर्माण करणाऱ्यांच्या विरोधात आवाज उठविणार असून, या लढ्यात वेळप्रसंगी आमचा मुडदा पडला तरी घाबरत नाही, असे मत व्यक्त केले. कामगारांची घरे, लेव्हीचा प्रश्न सोडविण्यात यावा. मापाडी कामगारांची थकीत रक्कम मिळावी. माथाडी बोर्डांची रचना करण्यात यावी. बोर्डामध्ये नोकरभरती करताना माथाडींच्या मुलांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी केली. गणेश नाईक यांनीही अण्णासाहेब पाटील यांच्या योगदानामुळे कामगार सुरक्षित असल्याचे मत व्यक्त केले. अण्णासाहेब असते तर देशातील प्रत्येक मंडईमध्ये माथाडी कायद्याची अंमलबजावणी झाली असते, असे मत व्यक्त केले. नवी मुंबईमध्ये कामगारांच्या व प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर कारवाई करण्याचे षड्यंत्र प्रशासनाने आखले असल्याचे मत व्यक्त केले. नाव न घेता आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. माथाडी नेते माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनीही उद्योग टिकविताना कामगारांच्या हिताकडे दुर्लक्ष केले जावू नये, असे मत व्यक्त केले. माथाडी बोर्डांची रचना, घरांचा प्रश्न व इतर काही प्रश्न सोडविण्यासाठी कामगार मंत्र्यांनी वेळ द्यावा. महिन्यातून एक दिवस बैठकीला वेळ दिला व प्रशासनाला योग्य आदेश दिले तरी सर्व प्रश्न तत्काळ सुटतील, असे मत व्यक्त केले.मापाडी कामगारांची थकीत रक्कम देण्याचे शासनाने मान्य केले आहे, पण ती फाईल विविध अधिकाऱ्यांकडे फिरविली जात आहे. कंपन्यांमध्ये माथाडी कायदा लागू होवू नये यासाठी मालक गुंडांचा वापर करत आहेत. आम्ही त्यांना घाबरत नाही. त्यांना वठणीवर आणण्याची आमची ताकद आहे, पण आम्ही कायद्याच्या मार्गाचा अवलंब करत आहोत. आम्ही ठरविले तर राज्यातील अन्नधान्याचा पुरवठा एका दिवसात बंद करू शकतो. एवढी ताकद कामगारांची आहे. पण आंदोलन न करता चर्चेतून प्रश्न सुटावे अशी आमची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)