शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर मालवाहतुकीमुळे अपघातांना निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 05:27 IST

शहरातून मालवाहतूक करणाऱ्या वाहनांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. दगड, माती, विटा तसेच रेती यांची बंदिस्त वाहनातून वाहतूक होणे आवश्यक आहे.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : शहरातून मालवाहतूक करणाऱ्या वाहनांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. दगड, माती, विटा तसेच रेती यांची बंदिस्त वाहनातून वाहतूक होणे आवश्यक आहे. मात्र उघड्या डम्परमधून सर्रास वाहतूक होत असतानाही त्यावर कारवाईकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.सायन-पनवेल मार्गावर मागील काही दिवसांपासून मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या संख्येत कमालीची भर पडली आहे. या वाहनांमधून उलवे अथवा लगतच्या परिसरातून मुंबईच्या दिशेने दगड, खडी, माती, वाळू तसेच विटा नेल्या जातात. मात्र बांधकामासाठी लागणाºया या मालाची वाहतूक करताना संबंधित ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांकडून पुरेशी खबरदारी घेतली जात नाही. यामुळे सायन- पनवेल मार्गावर अपघातांना निमंत्रण मिळत असून जागोजागी मृत्यूचे सापळे तयार झाले आहेत. त्यात सर्वाधिक धोका दुचाकीस्वारांना निर्माण होत आहे. माती, रेती अथवा दगड यांची वाहतूक बंदिस्त वाहनातून अथवा त्यावर आवरण टाकून करणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र तसे होत नसल्याचे सायन-पनवेल मार्गावर दिसून येत आहे. मालवाहतूक करणारे हे डम्पर निष्काळजीपणे अती वेगात पळवले जात असल्याने अपघातांचा धोका निर्माण होत आहे.सायन-पनवेल मार्गाची अनेकदा डागडुजी झाल्याने ठिकठिकाणी चढ-उतार तयार झाले आहेत. त्याठिकाणी भरधाव डम्पर आपटून त्यामधील खडी, रेती उडून रस्त्यावर जागोजागी सांडत आहे. यामुळे मार्गालगत सर्वत्र रेतीचे थर साचलेले दिसतात. शिवाय डम्परमधून उडणाºया खडी अथवा मातीमुळे पाठीमागून येणाºया दुचाकीस्वारांच्या डोळ्यात धूळफेक होते. याच प्रकारामुळे शहरातील धूलिकणांमध्ये वाढ होत असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र उघड्या डम्परमधून दगडांची वाहतूक होत असताना, एखादा दगड उडून रस्त्यावर पडल्यास पाठीमागून येणाºया वाहनांचा गंभीर अपघात घडू शकतो.बहुतांश डम्परमध्ये उघड्यावर मालवाहतूक करण्यास त्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल भरला जातो. या अवस्थेत डम्पर वेगात पळवले जात असल्याने रस्त्यांची जलद गतीने झीज होत आहे. त्याच कारणाने पामबीच मार्गावर डम्परसारख्या जड वाहनांना पालिकेने बंदी घातलेली आहे. यानंतरही रहदारीच्या दृष्टीने शहरातील महत्त्वाच्या मार्गावर नियमांची पायमल्ली करून उघड्यावर मालवाहतूक करणाºया डम्पर चालकांवर कारवाई होत नसल्याने वाहतूक पोलिसांसह आरटीओच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त होत आहे.नवी मुंबईतून मुंबईकडे बांधकाम साहित्याची वाहतूक करताना संबंधित ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना पनवेल, नवी मुंबई व मुंबई आरटीओच्या कार्यक्षेत्रातून जावे लागते. त्यामुळे ओव्हरलोड मालवाहतूक तसेच उघड्यावर मालवाहतूक करणाºया डम्पर चालकांवर तीनपैकी एकातरी ठिकाणी कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र तसे होत नसल्याने तिथल्या संपूर्ण यंत्रणेच्याच कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.तीन दिवसांपूर्वी एनआरआय पोलीस ठाण्यात एका डम्पर चालक व मालकाविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. त्या डम्परमध्ये क्षमतेपेक्षा सुमारे १४ हजार किलो जास्त माल भरलेला होता. शिवाय माल बंदिस्त न करताच त्याची वाहतूक केली जात होती. अशा प्रकारच्या कारवायांमध्ये सातत्य राहिल्यास बांधकामाच्या साहित्याच्या वाहतुकीला शिस्त लागू शकेल. मात्र किल्ले जंक्शन येथूनच मोठ्या प्रमाणात इतरही डम्परमधून उघड्यावर मालाची वाहतूक होत असतानाही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.मुंबई परिसरात कोट्यवधीची विकासकामे सुरू असून त्यासाठी लागणारे बांधकाम साहित्य नवी मुंबईच्या पनवेल, उलवे परिसरातून नेले जाते. त्याकरिता मुंबईला जोडणारा सायन-पनवेल एकमेव मार्ग असल्याने दिवस-रात्र जड अवजड वाहनांची रहदारी सुरू असते. मात्र अनेकदा मुंबईत जड वाहनांना निश्चित वेळीच प्रवेश दिला जातो. त्यामुळे वाशी टोलनाक्यापूर्वी अथवा सानपाडा, उरण फाटा यासह ठिकठिकाणी रस्त्यालगत कित्येक तास उभी केली जातात. यामुळे रहदारीला अडथळा होऊन अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. 

टॅग्स :AccidentअपघातNavi Mumbaiनवी मुंबई