शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या रिक्षा परवान्यांमुळे डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 23:27 IST

शासनाने परवाने खुले केल्यामुळे शहरातील रिक्षांची संख्या १२ हजारांवरून १७ हजार १७३ झाली आहे.

- योगेश पिंगळेनवी मुंबई : शासनाने परवाने खुले केल्यामुळे शहरातील रिक्षांची संख्या १२ हजारांवरून १७ हजार १७३ झाली आहे. वाहनांची संख्या वाढली; पण स्टँड तेवढेच असल्यामुळे रेल्वेस्थानकासह प्रमुख चौकांमध्ये वाहतूककोंडीत भर पडली आहे. व्यवसायही कमी झाल्यामुळे परवाने बंद करा, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे.सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये रेल्वे व बसनंतर रिक्षा व्यवसायाचा समावेश आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये शहरांतर्गत प्रवास करण्यासाठी हा सर्वाेत्तम पर्याय आहे; परंतु शासनाचे धोरण आणि आरटीओसह वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे रिक्षा व्यवसाय ही समस्या बनू लागली आहे. सप्टेंबर २०१७ पूर्वी मनपा कार्यक्षेत्रामध्ये १२९९० रिक्षा होत्या. शासनाने परवाने खुले केल्यामुळे नवीन रिक्षा घेण्याची स्पर्धा सुरू झाली व सव्वा वर्षामध्ये तब्बल ४१८३ नवीन रिक्षा रोडवर आल्या आहेत. यामुळे या व्यवसायामधील स्पर्धा वाढली आहे. व्यवसाय कमी होऊ लागला आहे. स्टँडवर लांबच लांब रांगा लागू लागल्या आहेत. भाडे मिळविण्यासाठी ताटकळत बसावे लागते आहे. शहरात १६२ स्टँड असून, एवढ्या रिक्षा सामावून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाही. यामुळे दहा रिक्षा उभ्या करण्याची परवानगी असलेल्या स्टँडवर २० ते ३० रिक्षा उभ्या राहू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी पूर्ण रोडवर रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सर्वात गंभीर स्थिती रेल्वेस्थानक परिसरामध्ये आहे. येथील रांगा आटोक्यात कशा आणायच्या? हा प्रश्न सर्वांसमोर पडला आहे. बेशिस्तपणा करणारे काही चालक रांगेचा नियम पाळत नाहीत. हायमारी करून मध्ये घुसत आहेत, यामुळे शाब्दिक चकमक व मारामारीच्या घटनाही होऊ लागल्या आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरातील रिक्षा संघटनांनी परवाने बंद करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी वाशीतील शिवाजी चौकामध्ये उपोषणही केले होते; परंतु यानंतरही अद्याप ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. नवीन परवाने देण्याची प्रक्रिया सुरूच आहे. रिक्षांची वाढती संख्या ही सर्वांसाठीच डोकेदुखी बनत चालली आहे. वाहतूककोंडी, पार्किंगपर्यंत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेकांनी रिक्षा परवाने घेऊन ते चालविण्यासाठी लायसन्स व बॅच नसलेल्या परप्रांतीयांना दिले आहेत. टपोरी मुले रिक्षा चालवत असून ते प्रवाशांबरोबरही उद्धट वर्तन करत आहेत. या बेशिस्तपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे पोलीस व आरटीओ दुर्लक्ष करत असल्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण कसे मिळवायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वेळेत ही समस्या सोडविली नाही तर भविष्यात रिक्षाचालकांमध्ये व प्रवाशांबरोबर वाद वाढून मारामारीचे गंभीर गुन्हे घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.>बेशिस्तपणा वाढलावाशी, सानपाडा, घणसोली, सीवूड व इतर रेल्वेस्थानकासमोर काही रिक्षाचालक रांगेत उभे न राहता रोडवरच वाहने उभी करून भाडे मिळविण्याचा प्रयत्न करतात. यामुळे सकाळी व सायंकाळी वाहतूककोंडी होत असते. वाशीमध्ये रिक्षा संघटनेने प्रयत्न केले आहेत; परंतु यानंतरही अनेक जण घुसखोरी करत असून बेशिस्तपणा करून प्रामाणिक रिक्षाचालकांना बदनाम करणाºयांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.>शहरातील रिक्षा संघटनांनी नवीन रिक्षा परमिट बंद करण्याची मागणी केली आहे. रिक्षाचे नवीन परिमट देण्यासंदर्भात शासनाचे धोरण आहे. संघटनांनी केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने प्रत्येक वेळी शासनस्तरावर कळविण्यात येत आहे.- दशरथ वाघुले,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी>अधिकृत रिक्षा स्टँड वाढविण्याची गरजशहरात रिक्षांचे प्रमाण वाढल्याने अधिकृत रिक्षा स्टँड अपुरे पडू लागले आहेत. नवीन रिक्षा स्टँड निर्मितीसाठी प्रक्रि या राबवावी लागते. स्टँड बनविण्यासाठी आरटीओ अधिकारी, स्थानिक प्राधिकरण, वाहतूक पोलीस आणि स्टँड प्रतिनिधी यांच्या माध्यमातून संयुक्त सर्व्हे केला जातो. वाहतूककोंडी, जागेची उपलब्धता, प्रवाशांची मागणी या गोष्टी सर्व्हेमध्ये तपासल्या जातात. त्यानुसार स्टँडच्या यादीला शासनाकडून मंजुरी घ्यावी लागते. शहरातील सर्वच रिक्षा संघटनांनी आवश्यक असलेल्या रिक्षा स्टँडची एकत्र मागणी करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी रिक्षा संघटनांना केले आहे.>नेरुळ-सीबीडीत सकारात्मक प्रयत्नसीबीडी व नेरुळमध्ये रिक्षा संघटनांनी व काही दक्ष चालकांनी रांगेतच थांबण्याची सर्वांना सक्ती केली आहे. या ठिकाणी बºयापैकी रांगेचा नियम पाळला जात आहे. नेरुळमध्ये हायमारी करणारे काही चालक घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात. संघटनांनी त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला आहे. संघटनेच्या प्रयत्नांना आरटीओ व पोलिसांनी सहकार्य करण्याची गरज आहे.>प्रवाशांशी उद्धट वर्तनरिक्षा परवाने वाढल्यामुळे अनेक परप्रांतीय व इतर टपोरी तरुण रिक्षा चालवू लागले आहेत. घणसोली, नेरुळ, एमआयडीसी व इतर ठिकाणी हे तरुण मनमानीपणे वागत असून प्रामाणिक रिक्षाचालकांनाही उद्धट बोलत आहेत. प्रवाशांशीही भांडणे करत असून मारामारी करण्यापर्यंत त्यांची मजल जाऊ लागली आहे. नेरुळ पश्चिमेला एक प्रामाणिक रिक्षाचालकाला मारहाण केल्याची घटनाही नुकतीच घडली होती.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई