शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

वाढते वायुप्रदूषण चिंताजनक, हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 23:15 IST

माहिती व तंत्रज्ञानाचे शहर म्हणून जागतिक स्तरावर ओळख निर्माण होत असलेल्या नवी मुंबई शहराला वायुप्रदूषणाचा विळखा पडला.

नवी मुंबई : माहिती व तंत्रज्ञानाचे शहर म्हणून जागतिक स्तरावर ओळख निर्माण होत असलेल्या नवी मुंबई शहराला वायुप्रदूषणाचा विळखा पडला. मागील काही दिवसांपासून हवेत धूलिकणांचे प्रमाण अचानक वाढल्याने शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात महापालिकेच्या पर्यावरण सल्लागार समितीच्या अध्यक्षा दिव्या गायकवाड यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्रार केली असून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.हवेतील वाढते प्रदूषण हा जागतिक स्तरावर चिंतेचा विषय बनला आहे. पर्यावरणाचा होत चालला ºहास, शहरीकरणामुळे वाहनांची वाढती संख्या, विविध टप्प्यावर सुरू असलेली विकासकामे आदीमुळे हवेत धुळीचे कण पसरून वायुप्रदूषण होत असल्याचा जागतिक निष्कर्ष आहे. नवी मुंबई हे सुनियोजित शहर म्हणून नावारूपाला येत आहे. शहरात विविध प्रकल्प होऊ घातले आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, जेएनपीटी बंदराचा विस्तार आदीमुळे शहरात वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. नवी मुंबईलगत दोन राष्ट्रीय महामार्ग आहेत, तर सायन-पनवेल महामार्ग आणि ठाणे-बेलापूर हे दोन मार्ग शहराला विभागून जातात. या मार्गावरून दररोज लाखो वाहने जा-ये करतात. तसेच तुर्भे येथील एपीएमसीच्या बाजारपेठेत दररोज हजारो ट्रक व टेम्पो येतात. या सर्वाचा परिणाम म्हणून वायुप्रदूषणात वाढ होत असल्याचा तज्ज्ञांचा निष्कर्ष आहे. वाढत्या वायुप्रदूषणामुळे शहरवासीयांचा आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. खोकला, सर्दी, ताप तसेच श्वसनाचे त्रास होत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे.केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २0११ ते २0१५ या काळात केलेल्या सर्वेक्षणात नवी मुंबई शहर राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर म्हणून जाहीर केले आहे. नवी मुंबईतील हवेत पार्टिक्युलेट मॅटर १0 या प्रदूषित घटकाबरोबरच नायट्रोजन डायआॅक्साईड व कार्बनडाय आॅक्साईडचे प्रमाण निर्धारित पातळीपेक्षा अनेक पटीने अधिक असल्याचे आढळून आले आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास क्रमांक एकचे प्रदुषित शहर म्हणून नवी मुंबईचा समावेश व्हायला वेळ लागणार नाही. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे होते. परंतु अहवाल जाहीर होवून एक वर्ष उलटले तरी संबंधित यंत्रणाकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे दिसून येते. याचा परिणाम म्हणून शहरातील वायुप्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.>एमआयडीसीतील प्रदूषणकारी कारखानेआशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत नवी मुंबईत आहे. औद्योगिक वसाहतीत अनेक कारखाने आहेत. या कारखान्यांमुळे शहराच्या प्रदूषणात भर पडत आहे. अनेक कारखान्यातून रात्रीच्या वेळी हवेत विषारी धूर सोडला जातो. जवळच्या नागरी वस्तींना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. यासंदर्भात रहिवाशांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र थातूरमातूर उत्तर देवून त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखविली जात असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे.धुके आणि धुळीमुळे रहिवासी हैराणशहरातील वाढते प्रदूषण चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेषत: मागील काही दिवसांपासून वायुप्रदूषणात वाढ झाली आहे. हवेतील धुळीचे प्रमाण वाढले आहे. सकाळच्या वातावरणात धुके आणि धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब गंभीर असून यासंदर्भात ठोस उपाययोजना करण्याची मागणी महापालिकेच्या पर्यावरण सल्लागार समितीच्या अध्यक्षा दिव्या गायकवाड यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी अलीकडेच प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी आनंद हर्षवर्धन यांची भेट घेवून चर्चा केली.

टॅग्स :pollutionप्रदूषण