शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

वायुप्रदूषणामुळे आरोग्य समस्यांमध्ये वाढ, औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांची हलगर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 1:54 AM

नवी मुंबई : सल्फरडाय आॅक्साइड, नायट्रोजन आॅक्साइड आणि पार्टिक्युलेस मॅटर अर्थात धूलिकणांचे प्रमाण वाढत चाललेय.

नवी मुंबई : सल्फरडाय आॅक्साइड, नायट्रोजन आॅक्साइड आणि पार्टिक्युलेस मॅटर अर्थात धूलिकणांचे प्रमाण वाढत चाललेय. या घटकांचे नवी मुंबईतील प्रमाणही वाढत चालले आहे. यामध्ये तुर्भे, कोपरखैरणे, रबाळे, महापे या परिसरात वायुप्रदूषणाची समस्या वाढली आहे. सकाळी कडक ऊन आणि रात्री गार वारे अशा वातावरणात झालेल्या बदलामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. सुका खोकला आणि रक्तदाब असे विकार नागरिकांमध्ये बळावत आहेत. उन्हाळा आणि पावसाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात प्रदूषण वाढल्याने आजारांचे प्रमाण वाढले आहे.नवी मुंबईतून तीन राष्ट्रीय महामार्ग जात असून, या महामार्गावर डिझेलवर चालणाºया मोठ्या गाड्यांची ये-जा चालू असते, तसेच बेलापूर-तळोजा मेट्रोचे काम सुरू असल्याने धुळीचे प्रदूषण वाढले आहे. नवी मुंबईच्या जवळच असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विभागातील अनेक कंपन्यांद्वारे सोडलेल्या दूषित धुरामुळेही प्रदूषण वाढत आहे. नवी मुंबईत सध्या सकाळच्या वेळी हवेत धुके दिसते, त्यात वाहनांचा धूर मिसळून ‘स्मॉग’ तयार झालेला दिसतो आहे. हा नागरी आरोग्यास अत्यंत घातक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.सकाळच्या वेळी शाळेत जाणारी मुले आणि कार्यालयात जाणारे कर्मचारी यांच्यासाठी ‘स्मॉग’चा सर्वाधिक धोका असतो. या व्यतिरिक्त ज्या वृद्ध व्यक्तींची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत झालेली असते, अशा वेळी हिवाळ्यात अथ्रायटिस, अस्थमा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग यासारख्या समस्या उद्भवतात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वायुप्रदूषणाची नोंद घेण्याकरिता नवी मुंबईत वाशी येथील रहिवासी परिसर, ऐरोलीतील गावठाण परिसर, नेरुळमधील रहिवासी परिसर, रबाळे येथील औद्योगिक विभाग, तसेच महापे येथील औद्योगिक विभागातात हवेच्या पातळीची विशेष नोंद घेतली जाते.गेल्या महिन्याभरातील ही नोंद पाहता यामध्ये कमालीची वाढ झाल्याचे दिसून येते. औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या प्रदूषणामुळे कोपरखैरणे तसेच तुर्भे परिसरातही प्रदूषणाची समस्या वाढली आहे.पावसाळा आणि उन्हाळ्याच्या तुलनेत यंदाच्या हिवाळ्यात रुग्णांच्या संख्येत दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. यातील बहुतांश रु ग्णांना श्वसनासंबंधीच्या विकारांनी ग्रासले आहेत. हवेतील विषारी वायूमुळे शहरातील आरोग्य धोक्यात आले आहे. हवेच्या प्रदूषणामुळे रुग्णाच्या साध्या खोकल्याचे रूपांतर गंभीर खोकल्यामध्ये होते. प्राणवायू शरीरात घेण्याची फुप्फुसाची क्षमता वेगाने कमी होते. त्यामुळे शरीरातील प्रत्येक पेशींना मिळणाºया प्राणवायूचे प्रमाण कमी होते. त्यातून अंगदुखी, अस्वस्थपणा, थकवा वाढतो, कार्यक्षमता कमी होते. हवेतील दूषित घटक श्वासातून रक्तात मिसळल्यामुळे मूत्रपिंडावर परिणाम होण्याचा धोकाही असतो. - डॉ. समीर बन्सल, श्वसनविकारतज्ज्ञ.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpollutionप्रदूषण