शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

डम्पिंग ग्राउंडसाठी अपुरी जागा, उरणमध्ये कचरा व्यवस्थापनाची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 00:47 IST

नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये प्रतिदिन तयार होणाऱ्या ११ टन कच-याची विल्हेवाट लावताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

- मधुकर ठाकूरउरण : नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये प्रतिदिन तयार होणाऱ्या ११ टन कच-याची विल्हेवाट लावताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. कचरा व्यवस्थापनासाठी डम्पिंग ग्राउंडची जागा अपुरी पडत आहे. ओला व सुका कचरा वेगळा केला जात असला तरी नागरिकांकडून त्यासाठी फारसे सहकार्य मिळत नाही. रोडवर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढत असून, स्वच्छतेच्या कामात लोकसहभाग वाढविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.उरण नगरपालिकेची स्थापना होऊन १६२ वर्षे झाली आहेत. २.२९ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर शहर वसलेल्या शहराची लोकसंख्या २८ हजारांपेक्षा जास्त झाली आहे. इतर सर्व शहरांप्रमाणे उरण नगरपालिकेलाही कचºयाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. शहरात दररोज ११ टन कचरा जमा होतो. यामध्ये सुका आणि ओल्या कचºयाचा समावेश आहे. कचरा व्यवस्थापनासाठी सिडको, महसूल विभागाकडे नगरपालिकेने डम्पिंगसाठी २ हेक्टर जागेची मागणी केली होती. मात्र, जागाच उपलब्ध नसल्याची कारणे पुढे करीत डम्पिंग ग्राउंडसाठी जागा देण्यास शासकीय विभागाने चालढकलपणा चालविला होता. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर २००७ साली २ हेक्टरऐवजी १ हेक्टर जागा जिल्हाधिकाºयांनी उपलब्ध क रून दिली आहे. मात्र, डम्पिंग ग्राउंडसाठी देण्यात आलेली जागा अपुरी पडत असल्याने उनपला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.दररोज साठणारा ११ टन ओला, सुका कचरा उचलण्याचे काम सध्या तरी ठेकेदारी पद्धतीने केले जात आहे. यासाठी वार्षिक ९१ लाख रुपये खर्ची पडतात. ५० आणि ठेकेदाराचे ४५ सफाई कर्मचारी मिळून शहरातील कचरा उलचण्याचे काम केले जाते. सकाळच्या वेळेत कचरा उचलण्याचे काम करते. तसेच मासळी आणि भाजी मार्केटमध्ये दोन वेळा कचरा उचलला जातो. त्याशिवाय घंटागाडी फिरवून घरोघरी जाऊनही कचरा जमा केला जातो. जमा केलेला कचºयाची वाहतूक कंपार्टमेंट असलेल्या छोट्या गाड्यांनी केली जाते. दररोज जमा होणारा सुका ५.५० टन आणि ओला ५.५० टन असा एकूण ११ टन कचरा जमा करून वेगळा केला जातो. विगतवारी केलेल्या कचºयाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. घरोघरी जाऊन कचरा उचलला जात असला, तरी अनेक नागरिक रोडवर कचरा टाकत आहेत. कचरा वाहतुकीसाठी पालिकेची स्वत:ची वाहने नसल्यामुळे ठेकेदाराच्या मार्फत वाहने पुरविली जात आहेत. स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत केंद्र आणि राज्याच्या मदतीने सात घंटागाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.>बायोगॅस निर्मिती करणारओल्या कचºयातून बायोगॅस निर्मिती करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. यासाठी बायोगॅस प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले असून, लवकरच हे काम पूर्ण केले जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बायोगॅस निर्माण करून त्याचा वापर इतर कारणांसाठी केला जाणार आहे.सद्यस्थितीमध्ये ओल्या कचºयातून खतनिर्मिती केली जात असून तीन रुपये किलो दराने खताची विक्री केली जात आहे. नगरपालिकेचे मख्याधिकारी अवधूत तावडे यांनी सांगितले की, नगरपालिकेने स्वच्छतेच्या कामावर लक्ष दिले असून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत