शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

रेल्वे स्टेशनसह शहरातील सुरक्षेकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 11:23 PM

बंकर झाले उद्ध्वस्त : बंदोबस्तावरील पोलीस मोबाइलमध्ये व्यस्त

नवी मुंबई : मुंबईमधील दहशतवादी हल्ल्यानंतर शासनाने रेल्वे स्टेशनसह सर्व शहरांमधील सुरक्षा व्यवस्था कडक करण्याच्या सूचना केल्या होत्या. हल्ल्याला दहा वर्षे झाल्यानंतरही सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे. रेल्वे स्टेशनमधील बंकर उद्ध्वस्त झाले आहेत. सुरक्षेसाठी तैनात केलेले काही पोलीस कर्मचारी बंदूक बाजूला ठेवून मोबाइलमध्ये व्यस्त असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.

२६/११ च्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये बंदोबस्त वाढविण्यात आला होता. शहरातील सर्व प्रमुख चौक, महामार्ग, शासकीय कार्यालये व रेल्वे स्टेशन परिसरामध्ये शस्त्रधारी जवान तैनात केले होते. साध्या वेशातून पोलीसही तैनात केले आहेत. वास्तविक दहा वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्यानंतरच रेल्वे स्टेशनसह शहरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्याच्या सूचना केल्या होत्या. प्रत्येक रेल्वे स्टेशनमध्ये बंकर तयार केले होते. परंतु देखभाल करण्यासाठी यंत्रणाच नसल्यामुळे बंकरचे कचरा कुंडीत रूपांतर झाले आहे. तंबाखू व गुटखा खाणारे प्रवासी बंकरमध्ये थुंकत आहेत. यामुळे आणीबाणीच्या स्थितीमध्ये त्यांचा वापर करणे शक्य होणार नाही. रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्मवर कॅमेरे बसविले आहेत. परंतु त्यानंतरही अनेक ठिकाणी फेरीवाले थेट रेल्वे स्थानकामध्ये व्यवसाय करत आहेत. परंतु कोणावरही कडक कारवाई होत नाही.

शासकीय कार्यालयांमध्ये ये - जा करणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात नाही. कुठेही बेवारस पडलेल्या वस्तूंकडे एक ते दोन तास झाल्यानंतरही कोणीही लक्ष देत नाही. तिकीट खिडकी व इतर ठिकाणी पडलेल्या बेवारस वस्तूंकडेही नागरिकांकडून दुर्लक्ष होत आहे. सोमवारी शहरामध्ये बंदोबस्तासाठी नियुक्त केलेल्या पोलिसांकडे बंदुका देण्यात आल्या होत्या. परंतु अनेक ठिकाणी हे कर्मचारी बंदुका बाजूला ठेवून मोबाइलवरून गप्पा मारत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाPoliceपोलिस