शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 07:51 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्यांसह फळांची आवक रोडावली

नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : राज्यातील अतिवृष्टीचा परिणाम कृषी व्यापारावरही झाला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला व फळांच्या आवकेवर मोठा परिणाम झाला आहे. तुटवड्यामुळे हिरव्या मिरचीचे दर दुप्पट झाले असून ते ८० ते १५० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. तसेच मोसंबी व पपईची आवक कमी झाली असून सीताफळाची आवकही ठप्प झाली आहे. शिवाय खराब झालेला कृषीमाल फेकूनही द्यावा लागत आहे.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. फळबागांसह भाजीपालाही वाहून गेला आहे. राज्यात मिरचीचे सर्वाधिक उत्पादन नंदुरबार जिल्ह्यात होते. संपूर्ण जिल्ह्याला पावसाने झोडपले असून शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. याचा परिणाम मुंबईतील पुरवठ्यावरही झाला आहे. गत आठवड्यात रोज सरासरी १५५ टन आवक होत होती. सोमवारी फक्त ६९ टन आवक झाली. होलसेल मार्केटमध्ये भाव २० ते ५० रुपये किलोवरून ४० ते ८० रुपयांवर पोहोचले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये मिरची ८० ते १५० रुपये किलो दराने विकली जात आहे. फ्लाॅवर, बीट, घेवडा, कोबी, ढोबळी मिरचीच्या दरामध्येही वाढ झाली आहे. 

पावसामुळे फळबागांचेही नुकसान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पपईचे प्रचंड नुकसान झाले आहे. गत आठवड्यात रोज १२० ते १५० टन पपईची आवक होत होती. सोमवारी ती ३८ टनावर आली. जालनामधील बागांचे नुकसान झाल्यामुळे मोसंबीची आवकही ३०० ते ३२५ टनावरून ११० टनावर आली आहे. सीताफळाची आवक जवळपास ठप्प झाली आहे. 

फळमार्केटमध्ये पपई, मोसंबी व सीताफळाच्या आवकवर परिणाम झाला आहे. अतिवृष्टीमुळे बागांचे नुकसान झाले असून पुढील काही दिवस आवकवर परिणाम राहील. हिमाचल व काश्मीरच्या सफरचंदची सर्वाधिक आवक होत आहे.संजय पानसरे, संचालक, फळमार्केट 

English
हिंदी सारांश
Web Title : Heavy Rains Rot Crops; Chili Prices Double Due to Shortage

Web Summary : Heavy rains severely impacted Maharashtra's agriculture, damaging crops and disrupting supplies to Mumbai's market. Chili prices doubled, reaching ₹150/kg due to scarcity. Papaya, sweet lime, and custard apple supplies also dwindled, with significant losses reported in Nandurbar and Jalna. Fruit and vegetable prices are expected to remain high.
टॅग्स :Rainपाऊसfruitsफळेvegetableभाज्या