शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

गणरायाचे आगमन होणार खड्ड्यांतूनच!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 2:34 AM

गणरायाचे आगमन दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यानुसार बाप्पाच्या स्वागतासाठी नवी मुंबईकरांची लगबग सुरू झाली आहे.

नवी मुंबई : गणरायाचे आगमन दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यानुसार बाप्पाच्या स्वागतासाठी नवी मुंबईकरांची लगबग सुरू झाली आहे. मात्र, नादुरुस्त रस्त्यांचा ताप भाविकांना जाणवत आहे. गणेशोत्सवाअगोदर शहरातील रस्त्यांची डागडुजी होणे आवश्यक होते; परंतु महापालिकेने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने गणरायाचे स्वागत खड्ड्यांतूनच करण्याची वेळ शहरवासीयांवर ओढावली आहे.शहरातील प्रमुख मार्गासह अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांची कसरत होत आहे. शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या सायन-पनवेल महामार्गाची तर अक्षरश: चाळण झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी या मार्गावरील खड्डे बुजविण्याचा सोपस्कार पूर्ण करण्यात आला; परंतु अवघ्या २४ तासांत या कामाचे पितळ उघडे पडले. महामार्गापेक्षा शहरवासीयांना अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न सतावत आहे. कारण बहुतांशी रस्ते उखडले आहेत. वसाहतीअंतर्गतच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पादचाºयांनाही त्रास होत आहे. वाहनधारकांना तर कसरत करावी लागत आहे. कोपरी सिग्नलपासून ब्ल्यू डायमंड चौकाकडे जाणाºया अंतर्गत रस्त्याची वाताहत झाली आहे. रस्त्याच्या मध्यभागी असलेले मलनि:सारणाच्या चेंबरचे झाकण उखडले आहे. हा संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. विशेष म्हणजे अनेकदा या मार्गावरील पथदिवे बंद असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी सुसाट धावणाºया दुचाकी व रिक्षांच्या अपघाताची शक्यता वाढली आहे. कोपरखैरणेच्या काही भागात मध्यंतरी डांबराचा भराव टाकून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले; परंतु हे कामसुद्धा निकृष्ट दर्जाचे ठरले आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर हे खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत. कोपरखैरणेप्रमाणेच वाशी, घणसोली, ऐरोली, तुर्भे, सानपाडा, नेरूळ व बेलापूर विभागातील अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे गणेशभक्तांची चिंता वाढली आहे. १३ सप्टेंबर रोजी गणेशाचे आगमन होत आहे. त्याधर्तीवर शहरवासीयांची लगबग सुरू झाली आहे; परंतु लाडक्या बाप्पाच्या स्वागतात खड्ड्यांचे विघ्न घोंगावू लागल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.>सार्वजनिक गणेश मंडळांना चिंताशहरात सार्वजनिक गणेशोत्सवाचा वेगळाच थाट असतो. मागील काही वर्षांत आकर्षक व मोठ्या गणेशमूर्तींवर मंडळांनी भर दिला आहे.काही गणेशोत्सवाला ३० ते ४० वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीअगोदर थाटामाटात श्रींची मूर्ती आणली जाते.यावर्षी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे गणेशमूर्ती आणताना मंडळांची तारांबळ उडाली. काही मंडळांच्या गणेशमूर्ती आदल्या दिवशी आणल्या जातात.खडतर रस्त्यातून मंगलमूर्ती आणण्याचे चिंताजनक आव्हान गणेशमंडळांसमोर उभे ठाकले आहे.>लोकप्रतिनिधींची चुप्पीस्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत घनकचरा व्यवस्थापनात देशात अव्वल ठरलेल्या नवी मुंबईत रस्त्यांची समस्या गंभीर बनली आहे. सायन-पनवेल महामार्गाच्या दुरवस्थेचा फटका शहराच्या लौकिकाला बसलाच आहे. यात आता अंतर्गत रस्त्यांच्या समस्येचीही भर पडू लागली आहे. या प्रश्नावर लोकप्रतिनिधींनीही चुप्पी साधल्याने गणेशभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Potholeखड्डेGanpati Festivalगणेशोत्सव