शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
3
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
4
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
5
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
6
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
7
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
8
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
9
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
10
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
11
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
12
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
13
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
14
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
15
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
16
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
17
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
18
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
19
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
20
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप

नवी मुंबई विमानतळाच्या भरावाचे काम अंतिम टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 01:28 IST

९३ टक्के काम पूर्ण : डिसेंबरपूर्वी पहिला टप्पा पूर्ण करण्याचे सिडकोचे उद्दिष्ट

पनवेल : सिडको उभारत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भरावाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्याच्या घडीला युद्धपातळीवर उलवे टेकडी सपाटीकरण व उलवे नदीचा प्रवाह बदलण्याचे काम सुरू आहे. ९३ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती सिडकोकडून प्राप्त झाली आहे. डिसेंबरपूर्वी पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्याचे सिडकोचे उद्दिष्ट असल्याने विमानतळाच्या कामाला गती प्राप्त झाली आहे.

सिडको एक हजार १६० हेक्टरवर १६ हजार कोटी रुपये खर्च करून हे विमानतळ प्रकल्प उभारत आहे. याकरिता येथील दहा गावांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. डिसेंबरची डेडलाइन चुकू नये, म्हणून मोठ्या प्रमाणात कामाला गती देण्यात आली आहे. सध्याच्या घडीला उलवे नदीचा प्रवाह बदलण्याचे कामही वेगाने सुरू आहे. दक्षिणेकडील साडेतीन किलोमीटरच्या धावपट्टीच्या कामाला सुरुवात झाली आहे. खाडीवर उभारण्यात आलेल्या या विमानतळासाठी मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आला आहे. अशा वेळी यंदाचा पावसाळा सिडकोच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. पाण्याचा निचरा कशाप्रकारे होतो याकडेही सिडकोचे लक्ष राहणार आहे. उलवे नदीचा नैसर्गिक प्रवाह या कामासाठी बदलण्यात आलेला आहे. दहा गावांतील जवळपास सर्वच प्रकल्पग्रस्तांचे ८५ टक्के स्थलांतराचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रतांबे यांनी दिली आहे. मागच्या वर्षी विमानतळ परिसरात असलेल्या डुंगी गावात पाणी साचले होते. यावर्षी ठिकठिकाणी पंपाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच मागच्या वर्षी गावात आलेल्या पाण्याचा अभ्यास करून यावर्षी असा प्रकार घडणार नाही. याकडे विशेष लक्ष देण्यात आल्याची माहिती प्रिया रतांबे यांनी दिली.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ