शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

स्वच्छ भारत अभियानावरील खर्च व्यर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 11:33 PM

कचऱ्याचे ढिगारे कायम : नवी मुंबईसह पनवेलमधील खतनिर्मितीचे प्रयोग फसले : लोकसहभाग नाहीच

- नामदेव मोरे 

नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानामध्ये सलग दोन वर्षे नवी मुंबईने राष्ट्रीय पुरस्कार मिळविले. अभियान राबविण्यासाठी प्रत्येक वर्षी करोडो रुपये खर्च केले आहेत, परंतु प्रत्यक्षात स्वच्छता मोहिमांवरील खर्च व्यर्थ जात असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. शहरात कचºयाचे ढिगारे साचले आहेत. कंपोस्ट पीटचा प्रयोग फसला आहे. लोकसहभाग फक्त नावापुरताच असून नागरिक ओला व सुका कचरा वेगळा करण्यातही सहकार्य करत नाही. नवी मुंबईपेक्षा पनवेलमधील स्थिती अत्यंत बिकट आहे.

सानपाडा रेल्वे स्टेशनच्या बाहेर स्वच्छता अभियानाविषयी जनजागृती करण्यासाठी गतवर्षी भिंत रंगवण्यात आली होती. अभियान संपताच जवळील हॉटेलचालकाने त्या फलकाच्या बाजूलाच कचरा टाकण्यास सुरवात केली आहे. कचऱ्याचे ढिगारे उचलण्याकडे पालिका प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. हॉटेलचालकानेही हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत. घनकचरा व्यवस्थापनामध्ये महापालिकेला देशात प्रथम क्रमांक मिळाला आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये शहरातील कचरा वेळेवर उचलला जात नाही. तुर्भे गाव, सानपाडा, घणसोली परिसरामध्ये कचºयाचे ढिगारे पहावयास मिळत आहेत. अभियानाअंतर्गत पालिकेच्या शाळा व उद्यानामध्ये कंपोस्ट पीट तयार करण्यात आले होते. त्या कंपोस्ट पीटचा वापर केला जात नाही. अनेक ठिकाणी फक्त नावापुरते खतनिर्मिती प्रकल्प उभारण्यात आले आहेत. गृहनिर्माण सोसायटीमधील नागरिक ओला व सुका कचरा वेगळा करत नाहीत. एकाच डब्यामध्ये ओला व सुका दोन्ही प्रकारचा कचरा टाकला जात आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नवीन प्रसाधनगृहे उभारण्यात आली आहेत, परंतु देखभाल करण्याची यंत्रणाच निर्माण करण्यात आली नाही.

नवी मुंबईपेक्षा पनवेल परिसरामध्ये स्थिती बिकट आहे. स्वच्छ भारत अभियानासाठी तयार केलेल्या कंपोस्ट पीटचे कचरा कुंडीत रूपांतर झाले आहे. प्रसाधनगृहांचीही दुरवस्था झाली आहे. शहरात कचºयाचे ढिगारे वेळेवर उचलण्यात येत नाहीत. उघड्या वाहनांमधून कचºयाची वाहतूक केली जात आहे. स्वच्छ भारत अभियानावर केलेला सर्व खर्च व्यर्थ झाला आहे. पनवेलमध्ये ओला व सुका कचरा वेगळा केलाच जात नाही. दोन्ही महानगरपालिका स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचा दावा करत आहेत. परंतु प्रत्यक्षात फक्त स्वच्छता अभियानाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय टीम येणार असली की स्वच्छतेवर लक्ष दिले जाते. स्पर्धा संपली की पुन्हा दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पालिकेची मेहनत व्यर्थनवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., घनकचरा व्यवस्थापनाचे उपआयुक्त तुषार पवार व पालिकेचे सर्व अधिकारी स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लोकसहभाग वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रॅली आयोजित केल्या जात आहेत. परंतु प्रत्यक्षात नागरिक या चळवळीमध्ये सहभागीच होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे जिथे स्वच्छतेचा संदेश देणारे फलक लावले आहेत त्याच ठिकाणी कचरा टाकला जात आहे. नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे या मोहिमेमध्ये सहभागी होण्याची आवश्यकता असून यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत काही अधिकारी व कर्मचाºयांनी व्यक्त केले आहे.नवी मुंबईमधील स्वच्छतेची स्थितीकचºयाचे ढिगारे वेळेवर उचलले जात नाहीतस्वच्छतेचा संदेश लिहिलेल्या ठिकाणीच कचरा टाकला जात आहेउद्यान व शाळेतील कंपोस्ट पीटची दुरवस्था झाली आहेओला व सुका कचरा वेगळा करण्याकडे दुर्लक्षअनेक ठिकाणी स्वच्छतागृह बंद अवस्थेमध्ये आहेतस्वच्छतागृहांची देखभाल करण्यासाठी यंत्रणाच नाहीपनवेलमधील सद्यस्थिती पुढीलप्रमाणेकचरा वाहतूक उघड्या वाहनांमधून केली जात आहेकचºयाचे ढिगारे वेळेवर उचलले जात नाहीतसार्वजनिक प्रसाधनगृहांची नियमित साफसफाई केली जात नाहीकचरा वर्गीकरण केले जात नाहीकंपोस्ट पीटचे कचरा कुुंडीत रूपांतर झाले आहे

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानMONEYपैसाNavi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल