शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

घुसखोर १०७ जणांची मायदेशी रवानगी, नायजेरियन्ससह बांगलादेशींचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 02:25 IST

भारतात बेकायदेशीररीत्यावास्तव्य करताना आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

नवी मुंबई - पोलिसांनी गतवर्षात तब्बल १०७ जणांची मायदेशी रवानगी केली आहे. त्यामध्ये ३५ नायजेरियन, नऊ युगांडाच्या व्यक्तींसह ५९ बांगलादेशींचा समावेश आहे. भारतात बेकायदेशीररीत्यावास्तव्य करताना आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.बेकायदेशीररीत्या भारतात वास्तव्य करणारी विदेशी नागरिकांची पोलिसांपुढे डोकेदुखी वाढत आहे. त्यांच्याकडून दलालांच्या मदतीने भाडोत्री जागा मिळवून समूहाने वास्तव्य केले जात आहे. त्यापैकी बहुतांश व्यक्तींचा गुन्हेगारी कृत्यात सहभाग असल्याचे वारंवार समोर येत आहे. त्यानुसार मागील दोन वर्षांपासून पोलिसांच्या विशेष शाखेकडून विदेशी नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.याकरिता अनेक ठिकाणी छापेही टाकण्यात आले होते. उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उलवे येथे टाकण्यात आलेल्या अशाच एका छाप्यात मोठ्या प्रमाणात नायजेरियन व्यक्ती आढळून आल्या होत्या. त्यांच्याकडे भारतात प्रवेश केल्याचा अथवा वास्तव्याचा कसलाही पुरावा नव्हता. तर बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिक पनवेलमधील एका कुटुंबीयांचा घरजावई बनल्याचाही प्रकार उघडकीस आला होता.गृहमंत्रालयाला नावे कळविलीसातत्याने घडणाऱ्या अशा घटनांमुळे पोलिसांकडून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यानुसार २०१९ मध्ये वर्षभर राबवण्यात आलेल्या कारवाईत ४८ विदेश नागरिकांना मायदेशी पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये ३५ नायजेरियन, युगांडाचे नऊ जण, सीरियाचा एक व इतर देशातील तिघांचा समावेश आहे.त्याचप्रमाणे ५९ बांगलादेशींनाही परत पाठवण्यात आले आहे. कारवाई झालेल्या या व्यक्ती पुन्हा भारतात येऊ नयेत, याचीही खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आली आहे. त्याकरिता या विदेशी नागरिकांची नावे गृह मंत्रालयाला देऊन त्यांची नावे काळ्या यादीत टाकण्याचे सुचवले आहे. त्यामुळे नवी मुंबईत विदेशी नागरिकांची वाढती घुसखोरी नियंत्रणात येईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई