शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

घुसखोर १०७ जणांची मायदेशी रवानगी, नायजेरियन्ससह बांगलादेशींचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 02:25 IST

भारतात बेकायदेशीररीत्यावास्तव्य करताना आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

नवी मुंबई - पोलिसांनी गतवर्षात तब्बल १०७ जणांची मायदेशी रवानगी केली आहे. त्यामध्ये ३५ नायजेरियन, नऊ युगांडाच्या व्यक्तींसह ५९ बांगलादेशींचा समावेश आहे. भारतात बेकायदेशीररीत्यावास्तव्य करताना आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.बेकायदेशीररीत्या भारतात वास्तव्य करणारी विदेशी नागरिकांची पोलिसांपुढे डोकेदुखी वाढत आहे. त्यांच्याकडून दलालांच्या मदतीने भाडोत्री जागा मिळवून समूहाने वास्तव्य केले जात आहे. त्यापैकी बहुतांश व्यक्तींचा गुन्हेगारी कृत्यात सहभाग असल्याचे वारंवार समोर येत आहे. त्यानुसार मागील दोन वर्षांपासून पोलिसांच्या विशेष शाखेकडून विदेशी नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.याकरिता अनेक ठिकाणी छापेही टाकण्यात आले होते. उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उलवे येथे टाकण्यात आलेल्या अशाच एका छाप्यात मोठ्या प्रमाणात नायजेरियन व्यक्ती आढळून आल्या होत्या. त्यांच्याकडे भारतात प्रवेश केल्याचा अथवा वास्तव्याचा कसलाही पुरावा नव्हता. तर बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिक पनवेलमधील एका कुटुंबीयांचा घरजावई बनल्याचाही प्रकार उघडकीस आला होता.गृहमंत्रालयाला नावे कळविलीसातत्याने घडणाऱ्या अशा घटनांमुळे पोलिसांकडून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यानुसार २०१९ मध्ये वर्षभर राबवण्यात आलेल्या कारवाईत ४८ विदेश नागरिकांना मायदेशी पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये ३५ नायजेरियन, युगांडाचे नऊ जण, सीरियाचा एक व इतर देशातील तिघांचा समावेश आहे.त्याचप्रमाणे ५९ बांगलादेशींनाही परत पाठवण्यात आले आहे. कारवाई झालेल्या या व्यक्ती पुन्हा भारतात येऊ नयेत, याचीही खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आली आहे. त्याकरिता या विदेशी नागरिकांची नावे गृह मंत्रालयाला देऊन त्यांची नावे काळ्या यादीत टाकण्याचे सुचवले आहे. त्यामुळे नवी मुंबईत विदेशी नागरिकांची वाढती घुसखोरी नियंत्रणात येईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई