शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

आरटीईअंतर्गत प्रवेशपत्र वाटपात दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:55 PM

आरटीईअंतर्गत शालेय प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या यादीत पात्र ठरलेल्या पाल्यांना प्रवेशपत्र मिळण्यास विलंब होत आहे.

नवी मुंबई : आरटीईअंतर्गत शालेय प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या यादीत पात्र ठरलेल्या पाल्यांना प्रवेशपत्र मिळण्यास विलंब होत आहे. यामुळे प्रवेशासाठी पात्र ठरूनही प्रक्रियेतील विलंबामुळे अपात्र ठरण्याची चिंता पालकांना सतावत आहे. त्यामुळे संतप्त पालकांनी गुरुवारी वाशीतील सहायता केंद्राबाहेर संताप व्यक्त केला.नुकत्याच पार पडलेल्या आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी घोषित झाली आहे. यामध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची आवश्यक कागदपत्रे आरटीई सहायता केंद्रात जमा केली जात आहेत. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला प्रवेशपत्र मिळाल्यानंतर पुढील प्रक्रियेअंती संबंधित शाळेत त्याचा प्रवेश निश्चित होणार आहे. त्यानुसार वाशीतील पालिकेच्या शाळा क्रमांक २८ मध्ये कागदपत्रे जमा करण्यासाठी पालकांच्या रांगा लागत आहेत. मात्र, आठवड्यापूर्वी ज्यांनी कागदपत्रे जमा केली आहेत, त्यांना प्रवेशपत्र देण्यात विलंब होत आहे. पात्र विद्यार्थ्यांची संख्या तीन हजारांच्या आसपास असून प्रवेशपत्र मात्र प्रतिदिन सुमारे शंभर ते दीडशे विद्यार्थ्यांची दिली जात असल्याचा पालकांचा आरोप आहे. अशातच सलग येणाऱ्या सुट्यांमध्ये कार्यालय बंद असते. त्यामुळे प्रवेशपत्र मिळण्यास होणाºया विलंबामुळे अनेक विद्यार्थी यादीत नंबर लागूनही प्रवेशासाठी अपात्र ठरण्याची चिंता व्यक्त होत आहे.वाशीतील सहायता केंद्राबाहेर मोठ्या संख्येने गर्दी करून पालकांनी असंतोष व्यक्त केला. या वेळी तिथल्या कर्मचाऱ्यांसोबतही काहींचा वाद झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र, केवळ खासगी शाळांच्या फायद्यासाठी प्रवेशपत्र वाटपात विलंब केला जात असल्याचा आरोप नितीन नाईक या पालकांनी व्यक्त केला. प्रशासनाने सर्व विद्यार्थ्यांना लाभ मिळावा या उद्देशाने केंद्र वाढवावेत, अथवा प्रक्रिया गतिशील करावी, अशी मागणी यावेळी पालकांनी केली.अनेकदा त्याठिकाणी चौकशीसाठी गेलेल्या पालकांसोबत संवाद साधण्यात कर्मचारी टाळाटाळ करतात. त्यांच्याकडून सुरक्षा रक्षकामार्फतच पालकांपर्यंत मोघम माहिती पोहचवली जात असल्याचाही पालकांचा आरोप आहे. त्यामुळे आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेतील घोळाचा मनस्ताप पालकांना सहन करावा लागत आहे.