शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

निवडणूक प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 11:33 PM

रॅलीसह सभांचे आयोजन : जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न; शहरातील बंदोबस्तात वाढ

नवी मुंबई : निवडणुकीच्या प्रचारासाठी शनिवारी शेवटचा दिवस आहे. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांनी रॅली व सभांचे आयोजन केले आहे. शेवटच्या दिवशी प्रचार सुरळीत व्हावा व प्रचाराची मुदत संपल्यानंतर आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी निवडणूक विभाग व पोलिसांनीही जय्यत तयारी केली आहे.

ऐरोली, बेलापूर, पनवेल व उरण मतदारसंघामध्ये निवडणूक जाहीर झाल्यापासून ते प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावली. शेवटच्या दिवशी नेरुळमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा आयोजित केली आहे. ऐरोलीमध्ये भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी मनसेवर नाव न घेता सडकून टीका केली होती. प्रांतवादाच्या नावाखाली उत्तर भारतीय नागरिकांना मारहाण करणाऱ्यांचे राजकीय अस्तित्व संपविण्याची भाषा वापरण्यात आली होती. यामुळे नेरुळमधील सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसे वगळता इतर कोणत्याही उमेदवारांनी शेवटच्या दिवशी सभांचे आयोजन केलेले नाही. रॅली काढून प्रचाराचा समारोप करण्यात येणार आहे. नवी मुंबईमधील प्रत्येक प्रभागामध्ये रॅली काढण्याचे व घरोघरी जाऊन प्रचार करण्याच्या सूचना उमदेवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. निवडणुकीतील जाहीरनामा प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

नवी मुंबईमध्ये प्रचारादरम्यान अद्याप कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. घणसोलीमध्ये एक ठिकाणी साडेअकरा लाख रुपयांची रोकड सापडली होती. इतर कुठेही पैसे सापडलेले नाहीत. निवडणूक विभागाने भरारी व दक्षता पथके तयार केल्यामुळे अनुचित प्रकार घडलेला नाही. उमेदवारांनीही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा स्वत: काय केले व काय करणार? यावर भर दिला आहे. यामुळे पोलिसांचा त्रास कमी झाल्याचे पाहावयास मिळाले. पनवेल व उरण तालुक्यामध्ये काही ठिकाणी तणावाचे वातावरण आहे. शिरढोणमध्ये झालेल्या भांडणामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे या परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागणार आहे. दोन्ही परिमंडळ परिसरामध्ये बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शेवटच्या दिवशी विविध पक्षांचे पदाधिकारी समोरा-समोर येऊन अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.पोलिसांची जय्यत तयारीपोलीस प्रशासनाने बंदोबस्तासाठी जय्यत तयार केली आहे. शेवटच्या दिवशीच्या प्रचार रॅली व सभांच्या ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सायंकाळी ५ नंतर कुठेही प्रचार सुरू राहणार नाही. आचारसंहितेचा भंग होणार नाही, यासाठी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना हद्दपार करण्यात आले आहे. अवैधपणे मद्यविक्री करणाºयांवरही कारवाई करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेतली जात आहे.

एपीएमसीवर सर्वांचे लक्षमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला निवडणूक काळात सर्वाधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेना व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी येथे हजेरी लावली आहे. राष्ट्रवादी काँगे्रसनेही बाजार समितीवर लक्ष केंद्रित केले होते. प्रमुख चारही माथाडी संघटनांनी राष्ट्रवादी व काँग्रेसची साथ सोडून भाजपला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीचा प्रचार करणाºयांवर कारवाई करण्यात आली आहे. यामुळे माथाडी संघटनेमध्ये नाराजीनाट्य सुरू झाले असून, या निवडणुकीमध्ये पुन्हा एपीएमसी केंद्रस्थानी असल्याचे पाहावयास मिळाले.

उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच्या सभानवी मुंबईमध्ये उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी अनेक नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजपप्रवेशाच्या दिवशी व माथाडी मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. माथाडी मेळाव्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते. राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार, अमोल कोल्हे, दिलीप वळसे-पाटील, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे यांनी उपस्थिती लावली होती.प्रचारासाठी उपस्थित नेतेखारघरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी सभा घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐरोलीमध्ये रॅलीचे आयोजन केले होते. बेलापूरमधील भाजप उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँगे्रसचे अमोल मिटकरी यांची सभा घेण्यात आली. भाजपचे खासदार मनोज तिवारी यांचीही सभा घेण्यात आली असून, शनिवारी राज ठाकरे यांची सभा होत आहे. भाजपचे साताराचे उमेदवार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनीही सभेचे आयोजन केले होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019belapur-acबेलापूरairoli-acऐरोली