शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
4
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
5
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
6
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
7
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
8
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
9
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
10
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
11
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
12
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
13
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
14
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
15
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
16
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
17
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
18
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
19
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
20
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!

पर्यावरणप्रेमी चालकाने रिक्षातच फुलवली बाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 01:39 IST

प्रवाशांनाही प्रोत्साहन : करावेतील रिक्षाचालकाचा स्तुत्य उपक्रम

नवी मुंबई : पर्यावरणाप्रति आपले प्रेम व्यक्त करत करावेतील रिक्षाचालकाने रिक्षातच बाग फुलवली आहे. सुमारे दहा प्रकारच्या वृक्षांची कुंडीत लावगड करून त्याची रिक्षात सजावट केली आहे. त्यामुळे ही रिक्षा प्रवाशांसह निसर्गप्रेमींचे आकर्षण ठरत आहे.

वाढत्या शहरीकरणाचा फटका पर्यावरणाला बसत चालला आहे. इमारती व घरांसाठी वृक्षतोड होत असून, दुकानांसमोर असलेली झाडेही तोडली जात आहेत. याचे परिणाम निसर्गचक्रावर उमटत असून भविष्यात मानवी जीवनावरही त्याचे परिणाम दिसून येणार आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावर वृक्षलागवडीवर भर दिला जात आहे. याचीच दखल घेत नवी मुंबईकरांनाही निसर्गाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करावेतील रिक्षाचालक उमर खान यांच्याकडून होत आहे. हल्ली झाडे लावण्यासाठीही घरापुढे मोकळी जागा शिल्लक ठेवली जात नाही ये. त्यामुळे स्वत:ची रिक्षा घेतल्यावर त्यातच बाग फुलवणार असा त्यांचा संकल्प होता आणि तो त्यांनी काही महिन्यांपूर्वी प्रत्यक्षात साकारलाही आहे. यासाठी त्यांनी तब्बल २२ हजार रुपये खर्चून तशा पद्धतीचे आवश्यक बदल रिक्षात करून घेतले आहेत. त्यानुसार रिक्षात कुंडी ठेवून त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फुले व फळझाडांची लागवड केली आहे. त्यामध्ये गुलाबासह लिंबू, फणस, बटाटा यासह शोभिवंत मनी प्लांट चा समावेश आहे. तर रिक्षाच्या वुडवरही हिरवा गालिचा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे ही हरित रिक्षा प्रवाशांना आकर्षित करत असून, निसर्गप्रेमींचेही लक्ष खेचून घेत आहे. एकीकडे नागरिक दारासमोर असलेले वृक्षही तोडत असताना, दुसरीकडे रिक्षातच बाग फुलवणारा पर्यावरणप्रेमी पाहायला मिळत आहे. त्यांच्याकडून रिक्षात बसणाऱ्या प्रवाशांनाही वृक्षलागवडीचा संदेश दिला जात आहे. जरी मोठे वृक्ष लावण्यासाठी जागा नसली, तरीही खिडकीतल्या जाळीत कुंडीत का होईना; परंतु छोटे-मोठे वृक्ष लावण्याचा सल्ला त्यांच्याकडून दिला जात आहे. यामुळे थोड्याफार जरी प्रवाशांनी वृक्ष संवर्धनावर भर दिली, तरीही बºया प्रमाणात पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.सिमेंटच्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे रिक्षात छोटीशी बाग फुलवण्याचे आपले स्वप्न होते. ते प्रत्यक्षात साकारत वेगवेगळी फुले व फळझाडे कुंडीत लावून रिक्षात बाग तयार केली आहे. यामुळे काही प्रमाणात प्रदूषणाला आळा बसुन प्रवाशांनाही प्रसन्न करण्यास हातभार लागत आहे.- उमर खान, रिक्षाचालक 

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाNavi Mumbaiनवी मुंबई