शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

ई-टॉयलेट बनले सर्व्हिस सेंटर; वाहने धुण्यासाठी पाण्याचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 23:51 IST

तळवली नाका येथील प्रकार

नवी मुंबई : पालिकेने उभारलेल्या ई-टॉयलेटच्या पाण्याचा वापर वाहने धुण्यासाठी होत असल्याचे दिसून येत आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील तळवली नाका येथे तसेच शहरातील इतरही ठिकाणी हा प्रकार सुरू आहे. मात्र, त्या ठिकाणी उघडपणे पाण्याचा अपव्यय होत असतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

पालिकेच्या वतीने नागरिकांच्या सोयीसाठी जागोजागी ई-टॉयलेट उभारण्यात आले आहेत. त्यापैकी ठाणे-बेलापूर मार्गावरील तळवली नाका येथील ई-टॉयलेटचे सर्व्हिस सेंटरमध्ये रूपांतर झाले आहे. त्या ठिकाणी शौचालयासाठी पुरवण्यात आलेल्या पाण्याची चोरी करून ते वाहने धुण्यासाठी वापरले जात आहे. यानुसार रात्रंदिवस त्या ठिकाणी रिक्षांसह इतर खासगी वाहने धुतली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याकरिता दररोज पालिकेच्या लाखो लीटर पाण्याचा वापर केला जात आहे, याकरिता झोपडपट्टी भागातील लहान मुलांचाही वापर केला जात आहे. विशेष म्हणजे, रहदारीच्या मुख्य मार्गालगतच उघडपणे सुरू असलेल्या या प्रकाराची चाहूल पालिकेच्या अधिकाऱ्यांना लागली नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. एकीकडे शहरात पाणीबचतीचा संदेश दिला जात आहे. वापराविना असलेल्या या ई-टॉयलेटसाठी पुरवण्यात आलेले पाण्याची चोरी होताना दिसू लागली आहे.

अशाच प्रकारे नेरुळ सेक्टर २ येथेही पालिकेच्या जलवाहिनीतून पाण्याची चोरी करून ते वाहने धुण्यासाठी विकले जात असल्याच्याही तक्रारी प्राप्त होत आहेत. संभाजी राजे उद्यानालगत दररोज सकाळी वाहने धुण्यासाठी रांग लागलेली असते. त्यांना पाच रुपयांना एक बादली या दराने चोरीच्या पाण्याची विक्री होत असल्याचे दिसून येत आहे.रहदारीच्या मुख्य रस्त्यावर वाहने धुण्याचा प्रकार उघडपणे सुरू आहे. मात्र याबाबत नवी महापलिकेच्या अधिकाऱ्यांना कल्पना नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी वाहनांचे सर्व्हिस सेंटरच सुरू केल्याचा दिसून येत आहे.शहरात स्वच्छ अभियान अंतर्गत लाखो रुपये खर्चून पालिकेने ई-टॉयलेट उभारले आहेत; परंतु अनेक ठिकाणी ई-टॉयलेटची निगा योग्यप्रकारे राखली जात नसल्याने, त्याचा वापर करण्याकडे नागरिक पाठ फिरवतानाही दिसत आहेत.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका