शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

ताणतणावामुळे मुंबईकर हृदयविकाराच्या उंबरठ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 05:22 IST

बदलती जीवनशैली आणि आहारपद्धती, बदललेल्या सवयी मुंबईकरांच्या स्वास्थ्यासाठी घातक ठरत आहेत. जागतिक हृदय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षण अहवालानुसार यात दहा हजार मुंबईकरांशी संवाद साधण्यात आला, यात मुंबईकरांची कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत असल्याचे दिसून आले आहे.

मुंबई  - बदलती जीवनशैली आणि आहारपद्धती, बदललेल्या सवयी मुंबईकरांच्या स्वास्थ्यासाठी घातक ठरत आहेत. जागतिक हृदय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षण अहवालानुसार यात दहा हजार मुंबईकरांशी संवाद साधण्यात आला, यात मुंबईकरांची कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मुंबईकर हृदयविकाराच्या उंबरठ्यावर असल्याची चिंता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.२०१६ ते २०१८ या काळात एकूण दहा हजार ५९५ जणांची लिपिड प्रोफाइल चाचणी करण्यात आली. त्यांच्यापैकी ६६ टक्के पुरुष होते, तर ३४ टक्के महिला होत्या. त्यांना हृदयविकाराचा धोका कितपत आहे,हे या तपासणीत शोधण्यातआले.या व्यक्तींपैकी ३० टक्क्यांहून अधिक व्यक्तींमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी अधिक होती. त्यांच्यापैकी १८ टक्के पुरुष होते, तर १२ टक्के महिला होत्या. या अभ्यासानुसार ३६-५० या वयोगटातील महिलांना अधिक धोका आहे, म्हणजेच १८ टक्के महिलांना हा धोका जास्त होता तर पुरुषांमध्ये हे प्रमाण दहा टक्के होते.तसेच, पाच हजार ०२४ व्यक्तींची एलडीएल कोलेस्ट्रॉल चाचणी करण्यात आली. ते तुमच्या रक्तवाहिन्यांच्या कडांवर साचते. त्यामुळे गुठळ्या तयार होऊ शकतात. एलडीएलची पातळी जास्त असेल, तर अचानक रक्ताची गुठळी तयार होऊन हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.महत्त्वाचा मुद्दा हा की, ज्या ३२ टक्के महिलांची तपासणी करण्यात आली होती, त्यांच्यापैकी २१ टक्के महिलांमध्ये एलडीएलची कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त होती. याविषयी, हृदयविकारतज्ज्ञ डॉ. प्रतीक सोनी यांनी सांगितले की, हृदयाच्या रक्तवाहिनीचा विकार होण्यासाठी आहार, जीवनशैली, पर्यावरणीय घटक कारणीभूत असतात. अतिरिक्त तणाव, व्यायामाचा अभाव आणि चुकीचा आहार हे घटक कोलेस्ट्रॉलच्या उच्च पातळीपेक्षा हृदयासाठी अधिक घातक असतात.व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली कारणीभूतआजच्या काळात आपल्याला स्वत:साठी म्हणून फार कमी वेळ असतो. तरुण पिढीचे लक्ष त्यांच्या करिअरवर केंद्रित असते, त्यामुळे ते आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे २०-४० या वयोगटात हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. याआधी ४० वर्षांवरील व्यक्तीला हृदयविकार झाल्याचे निदर्शनास येत असे; पण आता व्यायामाचा अभाव आणि बैठ्या जीवनशैलीमुळे आरोग्याला असणारे अपाय वाढले आहेत. कामाचे अतिरिक्त तास, प्रवास आणि तणाव यामुळे रुग्णांना रक्तदाब, मधुमेह, स्थूलपणा, थायरॉइड आणि आरोग्याच्या इतर समस्या निर्माण होतात. दिवसाला केवळ ३० मिनिटे व्यायाम केला तरी रक्तदाब कमी होतो आणि हृदयावरील ताणही कमी होतो. त्याचप्रमाणे त्यामुळे उपयुक्त एचडीएलमध्ये वाढ होते. - डॉ. रोहित शहापूरकर, हदयविकारतज्ज्ञ

टॅग्स :newsबातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स