शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ताणतणावामुळे मुंबईकर हृदयविकाराच्या उंबरठ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 05:22 IST

बदलती जीवनशैली आणि आहारपद्धती, बदललेल्या सवयी मुंबईकरांच्या स्वास्थ्यासाठी घातक ठरत आहेत. जागतिक हृदय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षण अहवालानुसार यात दहा हजार मुंबईकरांशी संवाद साधण्यात आला, यात मुंबईकरांची कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत असल्याचे दिसून आले आहे.

मुंबई  - बदलती जीवनशैली आणि आहारपद्धती, बदललेल्या सवयी मुंबईकरांच्या स्वास्थ्यासाठी घातक ठरत आहेत. जागतिक हृदय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षण अहवालानुसार यात दहा हजार मुंबईकरांशी संवाद साधण्यात आला, यात मुंबईकरांची कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मुंबईकर हृदयविकाराच्या उंबरठ्यावर असल्याची चिंता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.२०१६ ते २०१८ या काळात एकूण दहा हजार ५९५ जणांची लिपिड प्रोफाइल चाचणी करण्यात आली. त्यांच्यापैकी ६६ टक्के पुरुष होते, तर ३४ टक्के महिला होत्या. त्यांना हृदयविकाराचा धोका कितपत आहे,हे या तपासणीत शोधण्यातआले.या व्यक्तींपैकी ३० टक्क्यांहून अधिक व्यक्तींमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी अधिक होती. त्यांच्यापैकी १८ टक्के पुरुष होते, तर १२ टक्के महिला होत्या. या अभ्यासानुसार ३६-५० या वयोगटातील महिलांना अधिक धोका आहे, म्हणजेच १८ टक्के महिलांना हा धोका जास्त होता तर पुरुषांमध्ये हे प्रमाण दहा टक्के होते.तसेच, पाच हजार ०२४ व्यक्तींची एलडीएल कोलेस्ट्रॉल चाचणी करण्यात आली. ते तुमच्या रक्तवाहिन्यांच्या कडांवर साचते. त्यामुळे गुठळ्या तयार होऊ शकतात. एलडीएलची पातळी जास्त असेल, तर अचानक रक्ताची गुठळी तयार होऊन हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.महत्त्वाचा मुद्दा हा की, ज्या ३२ टक्के महिलांची तपासणी करण्यात आली होती, त्यांच्यापैकी २१ टक्के महिलांमध्ये एलडीएलची कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त होती. याविषयी, हृदयविकारतज्ज्ञ डॉ. प्रतीक सोनी यांनी सांगितले की, हृदयाच्या रक्तवाहिनीचा विकार होण्यासाठी आहार, जीवनशैली, पर्यावरणीय घटक कारणीभूत असतात. अतिरिक्त तणाव, व्यायामाचा अभाव आणि चुकीचा आहार हे घटक कोलेस्ट्रॉलच्या उच्च पातळीपेक्षा हृदयासाठी अधिक घातक असतात.व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली कारणीभूतआजच्या काळात आपल्याला स्वत:साठी म्हणून फार कमी वेळ असतो. तरुण पिढीचे लक्ष त्यांच्या करिअरवर केंद्रित असते, त्यामुळे ते आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे २०-४० या वयोगटात हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. याआधी ४० वर्षांवरील व्यक्तीला हृदयविकार झाल्याचे निदर्शनास येत असे; पण आता व्यायामाचा अभाव आणि बैठ्या जीवनशैलीमुळे आरोग्याला असणारे अपाय वाढले आहेत. कामाचे अतिरिक्त तास, प्रवास आणि तणाव यामुळे रुग्णांना रक्तदाब, मधुमेह, स्थूलपणा, थायरॉइड आणि आरोग्याच्या इतर समस्या निर्माण होतात. दिवसाला केवळ ३० मिनिटे व्यायाम केला तरी रक्तदाब कमी होतो आणि हृदयावरील ताणही कमी होतो. त्याचप्रमाणे त्यामुळे उपयुक्त एचडीएलमध्ये वाढ होते. - डॉ. रोहित शहापूरकर, हदयविकारतज्ज्ञ

टॅग्स :newsबातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स