शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

पावसामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांचीही तारांबळ; मतदानाला फटका?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 12:30 AM

शहरात १२१ मतदान केंद्र मैदानात उभारली

नवी मुंबई : शहरात दोन दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. पावसामुळे मतपेटी मतदान केंद्रावर घेऊन जाताना कर्मचाऱ्यांचीही तारांबळ उडाली. ऐरोलीसह बेलापूरमध्ये १२१ मतदान केंद्र मैदानात उभारण्यात आली आहेत. तेथे पावसाचे पाणी आत येणार नाही, असे तंबू लावले आहेत. तरीही पाऊस जास्त झाला तर मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरामध्ये दोन दिवस सातत्याने पाऊस पडत आहे. रविवारीही दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. नेरुळमधील आगरी कोळी भवनमधून बेलापूर मतदार संघातील कर्मचाºयांना मतपेटी व इतर साहित्यांचे वितरण करण्यात आले. ऐरोली मतदार संघामधील कर्मचाºयांना सरस्वती विद्यालयामधून साहित्य वाटप केले. कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना होतानाही त्यांना तारेवरची कसरत करावी लागली. साहित्य भिजू नये, यासाठी कर्मचाºयांकडून काळजी घेतली जात होती. पाऊस असाच सुरू राहिला तर त्याचा फटका मतदानाला बसण्याची शक्यता आहे.

ऐरोलीमध्ये ५६ व बेलापूरमध्ये ६५ ठिकाणी मैदानामध्ये मतदान केंद्र उभारली आहेत. दिव्यांगांची गैरसोय होऊ नये यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे. मैदानामधील केंद्रांवर मंडप टाकण्यात आला नाही. पावसाचे पाणी आत जाऊ नये याची काळजी घेण्यात आली आहे. पाऊस पडलाच तर मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे निवडणूक विभागासह, सामाजिक कार्यकर्त्यांनीही पाऊस पडला तरी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी काळजी घेण्यात आली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Electionनिवडणूक