शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
4
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
7
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
10
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
11
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
12
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
13
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
14
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
15
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
16
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
17
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
18
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
19
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

टोलनाक्यावरील वसुली थांबवण्याची मागणी; सुविधांचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 23:43 IST

ऐरोली - मुलुंड मार्गाची खड्ड्यांमुळे झाली चाळण

नवी मुंबई : ऐरोली-मुलुंड मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असल्याने त्याठिकाणावरून ये-जा करणाऱ्या वाहनांचे नुकसान होत आहे. यानंतरही सुरू असलेली टोलची वसुली थांबवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. रस्त्यावर सुविधांऐवजी गैरसोयीच मिळत असतानाही टोल का भरायचा, असा प्रश्नही त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.

मुंबईला जोडणाºया नवी मुंबईतील दोन्ही मार्गाची सध्या चाळण झाल्याचे पहायला मिळत आहे. वाशी टोलनाक्यासह ऐरोलीच्या टोलनाकालगतच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून मार्ग काढत वाहने चालवावी लागत आहेत. याचा नाहक त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. छोट्या-मोठ्या खड्ड्यांमध्ये कार अथवा दुचाकी आदळून त्यांचे नुकसान होत आहे. तर या मार्गाने नियमित प्रवास करणाºया अनेकांच्या वाहनांचे टायर चिरणे, एक्सल तुटणे असे प्रकार सुरुच आहेत. याचा आर्थिक फटका संबंधित वाहन मालकांना बसत आहे. त्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडलेले असतानाही, सुरु असलेल्या टोल वसुलीबाबत संताप व्यक्त होत आहे. परंतु टोल ठेकेदार कंपनीकडे यासंदर्भात प्रवाशांनी तक्रार केल्यास, पावसामुळे खड्डे पडत असल्याची कारणे सांगितली जात आहेत. त्यामुळे नागरिकांकडून अधिकच संताप व्यक्त होत आहे.कामानिमित्ताने मुंबईत जाण्यासाठी ऐरोली टोलनाका मार्गाचा वापर करावा लागतो. खड्ड्यांमुळे कारचे मोठे नुकसान होत आहे. टायरला भेगा पडत असून, हादºयाने एक्सेल तुटत आहेत. याचा आर्थिक फटका बसतो आहे. त्यामुळे खड्डे बुजवले जात नाहीत तोपर्यंत टोलची वसुली थांबवण्यात यावी. - किरण पाटील, प्रवासी

टॅग्स :tollplazaटोलनाका