शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

टोलनाक्यावरील वसुली थांबवण्याची मागणी; सुविधांचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 23:43 IST

ऐरोली - मुलुंड मार्गाची खड्ड्यांमुळे झाली चाळण

नवी मुंबई : ऐरोली-मुलुंड मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असल्याने त्याठिकाणावरून ये-जा करणाऱ्या वाहनांचे नुकसान होत आहे. यानंतरही सुरू असलेली टोलची वसुली थांबवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. रस्त्यावर सुविधांऐवजी गैरसोयीच मिळत असतानाही टोल का भरायचा, असा प्रश्नही त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.

मुंबईला जोडणाºया नवी मुंबईतील दोन्ही मार्गाची सध्या चाळण झाल्याचे पहायला मिळत आहे. वाशी टोलनाक्यासह ऐरोलीच्या टोलनाकालगतच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून मार्ग काढत वाहने चालवावी लागत आहेत. याचा नाहक त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. छोट्या-मोठ्या खड्ड्यांमध्ये कार अथवा दुचाकी आदळून त्यांचे नुकसान होत आहे. तर या मार्गाने नियमित प्रवास करणाºया अनेकांच्या वाहनांचे टायर चिरणे, एक्सल तुटणे असे प्रकार सुरुच आहेत. याचा आर्थिक फटका संबंधित वाहन मालकांना बसत आहे. त्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडलेले असतानाही, सुरु असलेल्या टोल वसुलीबाबत संताप व्यक्त होत आहे. परंतु टोल ठेकेदार कंपनीकडे यासंदर्भात प्रवाशांनी तक्रार केल्यास, पावसामुळे खड्डे पडत असल्याची कारणे सांगितली जात आहेत. त्यामुळे नागरिकांकडून अधिकच संताप व्यक्त होत आहे.कामानिमित्ताने मुंबईत जाण्यासाठी ऐरोली टोलनाका मार्गाचा वापर करावा लागतो. खड्ड्यांमुळे कारचे मोठे नुकसान होत आहे. टायरला भेगा पडत असून, हादºयाने एक्सेल तुटत आहेत. याचा आर्थिक फटका बसतो आहे. त्यामुळे खड्डे बुजवले जात नाहीत तोपर्यंत टोलची वसुली थांबवण्यात यावी. - किरण पाटील, प्रवासी

टॅग्स :tollplazaटोलनाका