शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

दादोजी कोंडदेवांचा ‘तो’ पुतळा पुन्हा लावावा

By admin | Updated: October 28, 2014 22:59 IST

आम्ही किल्ले बनवतो पण कुठल्याही स्पर्धेसाठी नाहीत, तर छ.शिवाजी महाराजांचे कर्तृत्व अजरामर राहून त्यांच्या स्मृती चिरंतन टिकवण्याचा हा प्रांजळ प्रय} आहे.

अनिकेत घमंडी- डोंबिवली 
आम्ही किल्ले बनवतो पण कुठल्याही स्पर्धेसाठी नाहीत, तर छ.शिवाजी महाराजांचे कर्तृत्व अजरामर राहून त्यांच्या स्मृती चिरंतन  टिकवण्याचा हा प्रांजळ प्रय} आहे. आमच्या पिढीर्पयत त्यांचे महान कार्य पोहचल़े परंतु, ते पुढच्या पिढीर्पयत जसेच्या तसे जावे हा उद्देश. याच उद्देशाने संगितावाडीतील आशापुरी इमारतीसह परिसरातील काही युवक दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. 
दरवर्षी किल्ला बनवतांना सामाजिक संदेश देऊन समस्त डोंबिवलीकरांनाही या उपक्रमात सहभागी करुन घेण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवण्यात येतात. त्यासाठीच यंदा ‘गडांचा राजा किल्ले राजगड’ची प्रतिकृती बनविण्यात आली असून पुण्यातील ‘ दादोजी कोंडदेव’ यांचा पुतळा पुन्हा बसविण्यासाठी डोंबिवलीकर इतिहासप्रेमींना आवाहन करण्यात येत आहे.
गड किल्ले संवंर्धनासोबतच इतिहास चिरंतन टिकवण्यासाठी या युवकांनी धडपड मोहीम राबवली आहे. त्याचनिमित्ताने जेथे दादोजीं कोंडदेवांचा पुतळा आहे त्याच ठिकाणी बसविण्यात यावा ही मागणी करण्यासाठी स्वाक्ष:या गोळा करण्याचे धाडस त्यांनी केले असून दिवाळी निमित्ताने त्या मुख्य उद्देशासाठी स्वाक्षरी अभियान राबविण्यात आल्याचे या संकल्पनेचा म्होरक्या व्यवसायाने विद्युत अभियंता अमेय काटदरे याने सांगितले. त्याच्यासोबत कुशल देवळेकर (आय टी), रोहीत गोवेकर (केमी. इंजी.), मंगेश पारधी, मंगेश काटदरे, गोविंद मांजरेकर, प्रथमेश पंडीत, आदीश भगत, अमित देशमुख, आशीष दळवी, कल्पेश शहा, पौर्णिमा टमके, आदिती भगत , गौरी गोवेकर आदींसह अबालवृद्ध या उपक्रमात सहभागी आहेत.
गेल्या वर्षी तोरणा गड केला होता, त्याच दरम्यान या मंडळींनी राजगड स्वारी केली होती. त्यामुळे त्याची प्रतिकृती करण्याचा चंग त्यांनी बांधला होता़  पुढील वर्षासाठीही सिंहगड, विशाल गड, तुंग गड आदींसह अन्य गडकिल्लयांची माहिती गोळा करून त्या ठिकाणापैकी एका ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन त्याची प्रतिकृती निर्माण करण्याचा प्रय} असल्याचे तो सांगतो.
छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण स्वराज्य बघू शकतो, अनुभवू शकतो. मुघल साम्राज्याचा नायनाट करून दिल्लीचे तख्त फोडण्याचा प्रचंड असा इतिहास आपल्या महाराष्ट्राला लाभला आहे. अध्यात्म, गुरुवंदन, मातृभक्ती, संस्कार, परंपरा, संस्कृती, पर स्त्री माते समान, फितुरीला दंड, गद्दाराला शासन यासह सुशासन यांसह सुयोग्य नियोजन आदीचे अनेक दाखले महाराजांचा अभ्यास केल्यास मिळतात. त्यांचा वारसा नेमका आपण जपतो आहोत का? त्यातील एक तरी गोष्ट आपण करतो आहोत का? त्यांच्याकाळी संदेश वहनाच्या कोणत्याची अद्ययावत सुविधा नसतांना, दळणवळणाची साधने नसतांनाही केवळ ‘विश्वास’ या एकमेव धाग्यावर त्यांनी शेकडो युद्धे केली-जिंकली. 
अनेक गड किल्ले काबीज केले. हे सध्याच्या राजकारण्यांना जमते आहे का? तर ते अस्तित्वात आणण्यासाठी सचोटी, पारदर्शक व्यवहार आणि दुस-याचा सन्मान, एकात्म निष्ठा आदी महत्वाची असत़े सध्या मात्र तसे दिसत नाही, आणि ठिकठिकाणी ‘जाणता राजा’च्या पाटय़ा मात्र झळकतांना दिसतात. त्या सर्वानी अंतमरुख होऊन विचार करण्याची वेळ आली असल्याचे प्रचंड उद्वेगाने त्या युवकांनी सांगितले. या सा-याची खंत असून खारीचा वाटा उचलण्यासाठीच या उपक्रमातून जनजागृती करण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे अमेय सांगतो.
 
राजगडावर काय बघाल : पद्मावती माची, सुवेळा माची, संजीवनी माची, बाले किल्ला, पद्मावती तलाव, रामेश्वराचे मंदिर, पाली दरवाजा, सुळे दरवाजा, गुंजवणो, महादरवाजा, सई बाईंची समाधी, राजवाडा, दारु कोठार आदीची माहिती देण्यात आली आहे.
 
राजगडावरच्या महत्वाच्या घटना -  
1647 - छ. शिवाजी महाराजांनी किल्ला बांधला, 
1649 - गडाची डागडुजी, 
11 जुलै 1659 - अफझलखानाला भेटण्यासाठी महाराज प्रतापगडावर, 
5 सप्टें. 1659- सईबाईचा गडावर मृत्यू, 
जुलै 166क् - पन्हाळगडावरुन महाराज राजगडावर, 
1661 - भवानी माता माँ साहेबांना दाखवण्यासाठी गडावर, 1664 - सुरतेची लुट गडावर आणण्यात आली, 
1665 - मुघलांचा गडावर अयशस्वी हल्ला, 
24 फेब्रु.167क् - राजाराम महाराजांचा जन्म, 
1689 - संभाजींच्या वधानंतर मुघलांनी गड जिंकला, 
1818 - गड इंग्रजांच्या ताब्यात.