शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

वायू वाहिनीसाठी सीआरझेडची परवानगी बंधनकारक

By नारायण जाधव | Updated: November 21, 2022 19:35 IST

२५ लाखांची बँक गॅरंटीही भरा- गेल इंडियाला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: CRZ अर्थात सागर किनारा नियंत्रण प्राधिकरणाच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय 'गेल इंडिया'ने जेएनपीटी ते अलिबाग तालुक्यातील उसरपर्यंतची आपली वायू वाहिनी टाकू नये, अशी अट महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने घातली आहे. शिवाय २५ लाख रुपयांची बँक गॅरंटी देण्यासही मंडळाने आपल्या ३ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या संमती समितीच्या बैठकीत गेल इंडियास सांगितले आहे.

परदेशातून बंदरमार्गे जहाजातून येणाऱ्या आयात वायू वाहून नेण्यासाठी जेएनपीटी ते अलिबाग तालुक्यातील उसर अशी उरण, पेण व अलिबाग व पनवेल या चार तालुक्यांतून ही वायू वाहिनी जाणार आहे. यासाठी खोपटेतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी प्रखर विरोध केला आहे. उरण येथे नुकत्याच झालेल्या सुनावणीदरम्यान ही वायू वाहिनी शेतजमिनीऐवजी रस्त्यालगतच्या जमिनीतून न्यावी, अशीही सूचना शेतकऱ्यांनी केली आहे.

४५ किमी लांब असणार वायू वाहिनी

शेतकऱ्यांची ३० मीटर रुंदीची जमीन यासाठी संपादित करण्यात येणार आहे. सुमारे ४५.४५३ किमी लांबीची ती असणार आहे. १२ डायमीटरची ती असणार आहे. ती एकदा कार्यान्वित झाल्यानंतर शेतकऱ्यांना शेती करताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे.

गेल समोरील अडचणीत वाढ

वायू वाहिनी ज्या मार्गातून जाणार आहे, त्यातील बहुतेक भाग सीआरझेड क्षेत्रात मोडणारा आहे. या संदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ३ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या बैठकीत आला होता. तेव्हा नेमक्या याच मुद्द्यावर मंडळाने बोट ठेवून तो मंजूर करताना मंडळाने गेल इंडियास सीआरझेडची परवानगी आणि २५ लाख रुपयांची बँक गॅरंटी बंधनकारक केली आहे. शेतकऱ्यांचा आधीच जमिनी देण्यास विरोध असताना आता सीआरझेडचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केल्याने गेल इंडिया समोरील अडचणी वाढल्या आहेत.

भूसंपादनानंतर रोजगार नाही

केंद्र सरकारच्या पाइपलाइन कायद्याचा वापर केला जाणार असून, शेतकऱ्यांना बाजारभावाच्या अवघ्या १० टक्के रक्कम मोबदला म्हणून दिली जाणार आहे. त्याचवेळी या जमिनीचा शेतीसाठी वापर करता येणार असल्याचा दावा केला आहे. मात्र, भूसंपादनाच्या बदल्यात या कायद्यात पुनर्वसन म्हणून रोजगार दिला जाणार नसल्याचेही सांगण्यात आले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई