शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

दिवाळीनिमित्त बाजारात गर्दी;  १५० टन फुलांची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 23:45 IST

एक आठवड्यात ६५० टन सुका मेव्याची आवक

नामदेव मोरे नवी मुंबई : दिवाळीनिमित्त खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. पनवेलसह नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी शेतकरी स्वत: फूलविक्रीसाठी आले आहेत. दोन दिवसांमध्ये तब्बल १५० टन फुलांची या परिसरात विक्री होणार आहे. एक आठवड्यामध्ये मुंबई बाजार समितीमध्ये तब्बल ६५० टन सुका मेव्याचीही विक्री झाली असून, ६० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरामधील सर्व बाजारपेठेमध्ये ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

दिवाळीनिमित्त झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. पुणे व नाशिक जिल्ह्यामधील १०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी स्वत:च या परिसरामधील विविध ठिकाणी फुलांची विक्री सुरू केली आहे. मुंबईमधील मार्केटमध्ये फुले विक्रीसाठी पाठविली, तर त्याला चांगला बाजारभाव मिळत नाही. अनेक वेळा आवक जास्त झाल्यामुळे बाजारभाव पडून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असते. दहा वर्षांपूर्वी मुंबईत फुले विक्रीसाठी गेलेल्या शेतकºयांना चांगला भाव मिळाला नाही, यामुळे काहींनी नवी मुंबईमधील पदपथावर फुलांची विक्री केली व त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून पुणे जिल्ह्यातील घोडेगाव व नाशिकमधील शेतकरी स्वत:च फुलांची विक्री करू लागले आहेत.

सद्यस्थितीमध्ये वाशी, सानपाडा, नेरुळ, पनवेल व इतर ठिकाणी १०० पेक्षा जास्त शेतकरी स्वत:च विक्रेते बनले आहेत. यावर्षी तब्बल १५० टन फुलांची आवक या परिसरामध्ये झाली आहे. ७० ते ८० रुपये किलो दराने झेंडूच्या फुलांची विक्री होत आहे. शेतकºयांना चांगला भाव मिळत असून, ग्राहकांनाही स्वस्त दरामध्ये फुले मिळत असल्यामुळे शेतकरी बाजारपेठेला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.दिवाळीमध्ये मिठाईची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते; परंतु मागील काही दिवसांमध्ये मिठाईसाठी वापरण्यात येणारा मावा व इतर वस्तूंमध्ये भेसळ झाल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. याशिवाय गोड मिठाई शरीराला घातक असल्यामुळे ग्राहकांकडून सुका मेव्याला अधिक पसंती मिळू लागली आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील सहा दिवसांमध्ये रोज सरासरी १०० टन सुका मेव्याची विक्री झाली आहे. तब्बल ६५० टन काजू, बदाम, पिस्ता व आक्रोडची विक्री झाली असून, या माध्यमातून एपीएमसीमध्ये ६० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.बाजार समितीमध्ये बाहेर थेटही मोठ्या प्रमाणात सुका मेव्याची विक्री झाली आहे. एपीएमसी व बाहेरील थेट विक्रीच्या या व्यवसायामधील उलाढाल १०० कोटीपेक्षा जास्त झाल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. पुढील दोन दिवसांमध्येही सुका मेव्याची उलाढाल मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.शेतकºयांमध्ये समाधाननवी मुंबईमधील वाशी व इतर ठिकाणी पुणे जिल्ह्यामधील मोठ्या प्रमाणात शेतकरी फूलविक्री करण्यासाठी आले आहेत. जवळपास दहा वर्षांपासून अनेक शेतकरी नवी मुंबईमध्ये येत असून पदपथावर व्यवसाय करत आहेत. शेतकºयांना महापालिका प्रशासन व नवी मुंबईकरांकडूनही चांगले सहकार्य होत आहे. फुलांच्या थेट विक्रीतून चांगला मोबदला मिळत असल्यामुळे शेतकºयांनीही समाधान व्यक्त केले आहे.आरोग्यविषयी जागरूकताया पूर्वी दिवाळीमध्ये भेट म्हणून मिठाई मोठ्या प्रमाणात दिली जात होती; परंतु मिठाई आरोग्यास घातक असते. २४ तासांमध्ये मिठाई संपविणे आवश्यक असते. मिठाई वेळेत संपली नाही तर ती खराब होण्याची शक्यताही असते. नागरिकांमध्ये आरोग्यविषयी जागरूकता वाढली असल्यामुळे सुका मेव्याला पसंती वाढली असून मिठाईपेक्षा त्याची विक्री मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.

टॅग्स :Diwaliदिवाळी