शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: लॉकडाऊनच्या बंदोबस्ताचा ताप, पोलिसांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 00:18 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लावलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळताच, महिन्याभरात पालिकेकडून दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

नवी मुंबई : पालिकेकडून घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पोलिसांना भर पावसात बंदोबस्त करावा लागत असल्याने त्यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. शहरात लॉकडाऊन लावताना त्यामधून एमआयडीसी व एपीएमसी मार्केट वगळण्यात आल्याने त्या ठिकाणी ये-जा करणाऱ्यांची वर्दळ सुरूच आहे. तर इतरही व्यावसायिकांवर पालिकेचा अंकुश नसल्याने नागरिक घराबाहेर निघत असल्याने, त्यांना आवर घालताना पोलिसांची दमछाक होऊ लागली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लावलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळताच, महिन्याभरात पालिकेकडून दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांना पुन्हा बंदोबस्तावर उभे राहण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, या लॉकडाऊनमधून एपीएमसी मार्केट व एमआयडीसी वगळण्यात आली आहे. यामुळे त्या ठिकाणी ये-जा करणाऱ्यांची वर्दळ सुरूच आहे. दरम्यान, शहरात लॉकडाऊन यशस्वी कारण्यासाठीच नवी मुंबईत २२ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. त्या ठिकाणी वाहनांची झाडाझडती घेऊन कारवाया केल्या जात आहेत. मात्र, एमआयडीसी व एपीएमसी सुरूच असल्याने, त्या ठिकाणी ये-जा करणाºयांमुळे बंदोबस्तावरील पोलिसांवर ताण वाढतच आहे. परिणामी, पोलिसांकडून सरसकट कारवाया केल्या जात आहेत. यामध्ये अनेकांची वाहनेही जप्त करण्यात आली आहेत, तर काहींवर गुन्हेही दाखल करण्यात येत आहेत. मात्र, पालिकेच्या आदेशाला न जुमानता, अनेक विभागांमध्ये अर्धे शटर उघडे ठेवून व्यवसाय चालविले जात आहेत. त्यामुळे लॉकडाऊनचे नियोजन फासल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनमध्ये सर्व उद्योग-व्यवसाय बंद ठेवले जाण्याची गरज होती, असेही तज्ज्ञांचे मत आहे, परंतु तसे न करता एपीएमसी व एमआयडीसी सुरूच ठेवल्याने नागरिकांना घराबाहेर निघण्याची संधी मिळत असल्याने लॉकडाऊन अपयशी ठरत असल्याचीही टीका होत आहे. या फसलेल्या लॉकडाऊनचा ताप मात्र पोलिसांना सहन करावा लागत आहे.पावसात उभे राहून बजावत आहेत कर्तव्यएकीकडे पालिकेने नागरिकांना घराबाहेर निघण्यास दिलेली छुपी सूट व पोलिसांना सरसकट कारवाईचे वरिष्ठांकडून मिळालेले आदेश, यामध्ये नागरिक भरडले जात आहेत. पावसात उभे राहून रस्त्यावरून ये-जा करणारी वाहने अडवून त्यांच्याकडे चौकशी करावी लागत आहे.अनोळखी व्यक्तींशी संपर्क येत असल्याने त्यांनाही कोरोनाची भीती सतावत आहे. कोरोनापासून बचाव झाला, तरी साथीच्या आजाराचे अथवा सततच्या बंदोबस्तामुळे इतर दुखणी वाढण्याची भीती आहे. कामानिमित्ताने ये-जा करणाºयांची संख्या आटोक्यात येत नसल्यानेही पोलिसांची दमछाक झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस