शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

CoronaVirus News : एपीएमसीला पडला कोरोनाचा विसर, मास्कसह सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 23:25 IST

नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गर्दीही काही प्रमाणात कारणीभूत आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला पुन्हा कोरोनाचा विसर पडला आहे. सर्वच मार्केटमध्ये मास्कसह सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडविले जात आहेत. प्रादुर्भाव टाळण्यासाठीच्या उपाययोजनांवर केलेला खर्चही व्यर्थ जात आहे.नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गर्दीही काही प्रमाणात कारणीभूत आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे व गर्दी नियंत्रणात न आणल्यामुळे व्यापारी, माथाडी कामगार व बाजार समिती कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली. त्यांच्यामुळे ते वास्तव्य करीत असलेल्या परिसरामध्येही प्रादुर्भाव वाढला होता. बाजार समितीविषयी शहरवासीयांमध्ये असंतोष निर्माण झाल्यानंतर प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या. मार्केटमध्ये येणाºया वाहनांवर व खरेदीसाठी येणाऱ्यांच्या संख्येवरही निर्बंध लावले. मार्केटमध्ये विशेष स्वच्छता मोहीम, निर्जंतुकीकरण, प्रवेशद्वारावर आॅक्सिजन व तापमान तपासणी सुरू केली. परंतु मागील काही दिवसांपासून नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन करण्यास सुरुवात झाली आहे. पाचही मार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. कामगार, व्यापारी, खरेदीदार मास्कचा वापर करीत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. भाजी व फळ मार्केटमधील परिस्थिती सर्वांत जास्त भयावह आहे. दोन्ही मार्केटमध्ये परराज्यातील व रोजंदारीवरील काम करणाºयांची संख्या पुन्हा वाढली आहे. यामधील बहुतांश कामगार मार्केटमध्येच वास्तव्य करीत आहेत. हे कामगार सुरक्षेसाठी काहीच उपाययोजना करीत नसल्याचे निदर्शनास येत आहे. व्यापारीही त्यांच्या निष्काळजीपणाकडे दुर्लक्ष करीत आहेत.बाजार समितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. परंतु निष्काळजीपणामुळे पुन्हा प्रादुर्भाव वाढत आहे. बाजार समितीच्या अनेक अधिकारी व कर्मचाºयांनाही लागण झाली आहे. अनेकांच्या परिवारातील सदस्यांनाही लागण झाली आहे. व्यापारी, कामगार बाजार समिती कर्मचाºयांचाही मृत्यू होऊ लागला आहे. यानंतरही सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रवेशद्वारावरील आॅक्सिजन व तापमान तपासणी केंद्र फक्त नावापुरते शिल्लक राहिले आहे. त्या ठिकाणी कोणीही तपासणीसाठी फिरकताना दिसत नाही. आवक, जावकवरील निर्बंधही उठविले असल्यामुळे मार्केटमध्ये येणाºया - जाणाºयांवर काहीही नियंत्रण राहिलेले नाही. अशीच स्थिती राहिली तर बाजार समितीमध्ये कोरोनाची लाट पुन्हा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.गुटखा विक्रेत्यांनाही अभय : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर बाजार समितीमध्ये फक्त परवाना असणाºयांनाच परवानगी देण्यास सुरुवात झाली. बेकायदेशीरपणे व्यवसाय करणाºयांना मार्केटमधून बाहेर हाकलण्यात आले होते. परंतु काही दिवसांपासून गुटखा, तंबाखू व गांजा विक्रेत्यांनी पुन्हा त्यांचे व्यवसाय सुरू केले आहेत. भाजी व फळ मार्केटमध्ये सर्वांसमक्ष तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू असून बाजार समितीचे सुरक्षारक्षक व इतर अधिकारी, कर्मचारी या माफियांना अभय देऊ लागले आहेत.गर्दी जैसे थे : एप्रिलमध्ये बाजार समितीमधील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या होत्या. परंतु सद्य:स्थितीमध्ये मार्केटमधील गर्दी जैसे थे झाली आहे. भाजी मार्केटमधील पॅसेजमधून सकाळी चालताही येत नाही अशी स्थिती आहे. सोशल डिस्टन्सिंगचे कुठेही पालनहोताना दिसत नाही.बाजार समितीमधील१७ सप्टेंबरची वाहनांच्या आवकचा तपशीलमार्र्केट आवककांदा-बटाटा मार्केट ८७भाजी मार्केट ४५०फळ मार्केट २०९मसाला मार्केट ११०धान्य मार्केट १७५एकूण १०३१

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस