शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ५७ टक्के; नागरिकांनी खबरदारी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 00:31 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असला तरी उपचारानंतर ५७ टक्के रुग्ण बरे होत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात हे दिलासादायक चित्र आहे. नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. मुंबई, पुणे, ठाणे, सुरत यासह अन्य ठिकाणांहून १ मे २०२० नंतर जिल्ह्यात ९६ हजार नागरिक आले आहेत. खारपाडा येथील चेकपोस्टवरच त्यांची माहिती घेतली जात आहे. तसेच त्यांचे थर्मल स्कॅनिंगही करण्यात येत आहे.

१० हजार नागरिकांना निरीक्षण कक्षात दाखल केले आहे, तर ८६ हजार नागरिक हे होम क्वारंटाइनमध्ये आहेत. त्यातील बहुतांश नागरिकांनी १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे. १ मे रोजी रायगड जिल्ह्यात १०५ कोरोनाबाधित होते. आता हाच आकडा ८४० च्याही पुढे गेलेला आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात आल्यानंतर बरे होण्याचे प्रमाण हे ५७ टक्के आहे. त्याचप्रमाणे पनवेल महापालिकेचेही प्रमाण ५७ टक्के एवढे आहे.

तब्बल ४८२ रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी गेले आहेत, असे चौधरी यांनी स्पष्ट केले. बाधितांचा वाढता आकडा चिंताजनक असल्याने अलिबाग नेहुली येथील क्रीडा संकुल आणि कुरुळ वसाहतीमधील आरसीएफची शाळा अधिग्रहीत करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांवर या ठिकाणी उपचार होणार आहेत.

विक्रम-मिनीडोरला अटींवर परवानगी

१. रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे आठ हजार विक्रम-मिनीडोर रिक्षा आहेत. त्यावर ६० हजारांहून अधिक कुटुंबांचा चरितार्थ चालतो; मात्र लॉकडाउनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून हा व्यवसाय ठप्प पडला आहे.

२.विक्रम-मिनीडोर चालक-मालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळावी यासाठी संघटनेने मागणी केली होती.

३.चौथ्या लॉकडाउनमुळे नियमांमध्ये शिथिलता आली आहे. त्यानुसार सामाजिक अंतर राखून आणि सहाऐवजी तीन प्रवासी घेऊन विक्रम-मिनीडोर रिक्षाचा व्यवसाय करण्याला मुभा आहे. मात्र संबंधितांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे, असे चौधरी यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड