शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

मुंबई बाजारसमितीला कोरोनाचा विळखा; मसाला मार्केटमधील 7 हॉटेल कर्मचाऱ्यांना लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 16:24 IST

व्यापारी,  माथाडी कामगार,  वाहतूकदार व शहरवासीयांच्या सुरक्षेसाठी बाजार समिती बंद करण्यात यावी अशी मागणी मोठ्याप्रमाणात केली जात आहे

-  नामदेव मोरे

नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला कोरोनाचा विळखा पडू लागला आहे.  आतापर्यंत 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  यामध्ये हाॅटेल मधील 7 कर्मचारी,  एक सुरक्षा रक्षक व चार व्यापा-यांचा समावेश आहे. बाजार पेठेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून बाजार समिती बंद करण्याची मागणी होऊ लागली आहे.  

व्यापारी,  माथाडी कामगार,  वाहतूकदार व शहरवासीयांच्या सुरक्षेसाठी बाजार समिती बंद करण्यात यावी अशी मागणी मोठ्याप्रमाणात केली जात आहे.  भाजीपाला व फळ मार्केट मधील व्यापारी संघटनांनी  यापुर्वीच अशाप्रकारचे पत्र दिले आहे.  परंतु शासनाच्या आदेशामुळे मार्केट सुरू ठेवण्यात आले आहे.  यामुळे मार्केट मधील कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे.  आतापर्यंत धान्य मार्केट,  भाजीपाला व मसाला मार्केट मधील चार व्यापा-यांना कोरोना ची लागण झाली आहे.  मसाला मार्केट मधील एक हाॅटेल मधील तब्बल 7 कर्मचा-यांना कोरोना झाला आहे.  फळ मार्केट मधील सुरक्षा अधिका-याला ही कोरोना ची लागण झाली आहे.       

 रूग्ण वाढू लागल्यामुळे  महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब सोनवणे यांनी मंगळवारी  एपीएमसी पोलीस स्टेशन व तुर्भे विभाग अधिका-यांना पत्र  देवून 14 दिवस पाचही मार्केट बंद करण्याचे आदेश दिले होते. वैद्यकीय अधिका-यांचे पत्र सोशल मिडीयावरून व्हायरल झाले होते. परंतु  सायंकाळी महानगरपालिका आयुक्त,  कोकण आयुक्त, शासनाचे वरिष्ठ अधिकारी यांची बैठक झाल्यानंतर वैद्यकीय आधिका-यांचे पत्र मागे घेण्यात आले  व नवीन आदेश काढण्यात आला आहे.  ज्या ठिकाणी कोरोना रूग्ण आढळला तेवढाच परिसर बंद करून उर्वरीत मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  बुधवारी एपीएमसी मधील पाचही मार्केट सुरू होती.  पाच मार्केट मध्ये 519 वाहनांमधून कृषी माल विक्रीसाठी आला व 768 वाहनांमधून कृषी माल मुंबई व नवी मुंबई मधील किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पोहचविण्यात आला.  भाजीपाल्याचे 326 टेंपो थेट मुंबईत पाठविण्यात आले आहेत.   

12 ते 15 हजार उपस्थिती

बाजार समिती च्या पाच मार्केट मधील गर्दी पुन्हा वाढू लागली आहे.  एपीएमसी च्या पाच मार्केट मध्ये प्रतिदिन 12 ते 15 हजार  नागरिक उपस्थित राहू  लागले आहेत.  भाजीपाला व फळ मार्केट  मध्ये सर्वाधिक गर्दी होत असून सोशल डिस्टंन्सींग नियमांचे उल्लंघन होत आहे.  अनेकजण मास्क चा वापर करत नाहीत.  गर्दीमुळे कोरोना मोठ्याप्रमाणात पसरण्याची भिती बाजार समिती मधील अधिकारी व कर्मचारी व्यक्त करत आहेत.  अनेक व्यापारी ही सुरक्षेच्या मुद्यावरून  चिंता व्यक्त करत आहेत. एपीएमसी सुरू ठेवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली जात आहे. 

महानगरपालिकेने एपीएमसीमधील बंद केलेला परिसर 

  • मसाला मार्केट मधील के वींग मधील 9 ते 16 पर्यंत ची दुकाने  व हाॅटेल बंद करण्यात आले आहे. 
  • भाजीपाला मार्केट मधील ई वींग मधील 889 ते 897 या गाळ्यांमधील व्यापार बंद करण्यात आला आहे.  
  • धान्य मार्केट मधील जी वींग मधील 9 ते 17 पर्यंत चे गाळे सील केले आहेत.
  • फळ मार्केट मधील सुरक्षा अधिका-यास कोरोना झाल्यामुळे सुरक्षा अधिका-याची केबीन बंद केली आहे. 

सुरक्षा अधिका-याचा सर्व मार्केटमध्ये वावर

फळ मार्केट मधील सुरक्षा अधिका-याला कोरोना झाला आहे त्याचा संपूर्ण मार्केट मध्ये मुक्त संचार होता. गत आठवड्यात सुरक्षा  अधिका-याच्या पथकाने  आंबा पिकविण्यासाठी वापरले जात असल्याचे औषध जप्त केले होते. नियम बाह्य काम करणा-यांवर कारवाई केली होती.  अनेकांच्या संपर्कात हा अधिकारी आला असल्यामुळे फक्त सुरक्षा रक्षकांची केबीन बंद केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.   

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबई