शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

उद्योगांची गाडी रुळावर आणण्यासाठी कसरत सुरू; नुकसान भरून काढण्याचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 12:39 AM

Corona Lockdown Effect on Industry: कामगारांची कमतरता : तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास ११७४ कारखाने आहेत. यामधील अत्यावश्यक सेवेशी संबंधित असणारे ३७० कारखाने लाॅकडाऊनमध्येही सुरू होते.

नामदेव माेरे नवी मुंबई  : ठाणे-बेलापूर व तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कारखाने पुन्हा सुरू होऊ लागले आहेत. सहा  महिन्यांत झालेले प्रचंड आर्थिक नुकसान भरून काढण्याचे आव्हान उद्योजकांसमोर उभे राहिले आहे. कारखाने सुरू करण्याची परवानगी मिळाली असली तरी कामगार उपलब्ध नसल्यामुळे पूर्ण क्षमतेने कारखाने सुरू करण्यात अडथळे निर्माण होत आहेत. 

कोरोनाचा सर्वाधिक फटका औद्योगिक वसाहतींना बसला होता. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास ४५०० कारखाने आहेत. अत्याश्यक सेवा देणारे कारखाने वगळता इतर सर्व उद्योग बंद ठेवण्यात आले होते. महाराष्ट्रातील व इतर राज्यांतील कामगारही त्यांच्या मूळ गावी गेले होते. अद्याप ५० टक्के कामगार कामावर येऊ शकलेले नाहीत. यामध्ये इतर राज्यांतील कामगारांची संख्या मोठी आहे. कामगारच नसल्यामुळे शासनाने परवानगी देऊनही कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू करता येत नाहीत. कामगारांना घेऊन येण्यासाठी रेल्वे सुरू करावी, अशी मागणीही उद्योजकांनी केली आहे. अनेकांनी खासगी बसेसनी कामगारांना घेऊन येण्याची तयारी सुरू केली आहे. 

तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास ११७४ कारखाने आहेत. यामधील अत्यावश्यक सेवेशी संबंधित असणारे ३७० कारखाने लाॅकडाऊनमध्येही सुरू होते. उर्वरित ८०४ कारखान्यांमधील काही कारखाने सुरू  झाले असून, काही सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कामगारांची कमतरता हीच प्रमुख समस्या सध्या मोठ्या प्रमाणात सर्वांसमोर आहे. 

कुठल्या क्षेत्रात उद्योग सुरू ?

नवी मुंबई व तळोजामध्ये लाॅकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा देणारे उद्योग सुरू होते. उत्पादन करणारे कारखाने बंद होते. शासनाने आदेश दिल्यानंतर सर्व कारखाने सुरू होत आहेत. आयटी कंपन्या, सेवा उद्योग व छोटे कारखाने सुरू झाले आहेत

दिवाळीपर्यंत सर्व सुरळीत होईल 

औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखाने सहा महिने बंद होेते. बंद कारखाने सुरू करताना कामगारांची कमतरता सर्वांनाच जाणवू लागली आहे. याशिवाय कारखान्यांची देखभाल-दुरुस्ती, कच्चा माल व इतर काही समस्या आहेत. हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी अजून एक महिन्याचा कालावधी लागेल. 

तळोजामध्ये  50000कोटींचा फटका बसला

नवी मुंबईमधील ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहत व तळोजा औद्योगिक वसाहतीमधील  अनेक कारखाने लाॅकडाऊनच्या काळात बंद होेते. सहा महिन्यांत तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये ५० हजार कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. नवी मुंबईमध्ये यापेक्षाही जास्त व्यवहार ठप्प झाले असण्याची शक्यता आहे.

ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास मनुष्यबळाची कमतरता हे कारण प्रमुख आहे. गावी गेलेल्या कामगारांना परत  आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परराज्यातील कामगारांना आणण्यासाठी वाहतुकीची समस्या जाणवत आहे. - के. आर. गोपी, अध्यक्ष, टीटीसी एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन (टीएमआयए)

तळोजातील अत्यावश्यक सेवा देणारे उद्योग लाॅकडाऊनमध्येही सुरू होते. उर्वरित कारखाने सुरू करण्यासही परवानगी मिळाली आहे. कामगार व इतर काही अडचणींमुळे पूर्ण क्षमतेने कारखाने सुरू होत नाहीत. पुढील एक महिन्यात सर्व व्यवहार सुरू होऊ शकतील. - सतीश शेट्टी, अध्यक्ष, तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन (टीआयए)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या