शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

दहावी - बारावीच्या ऑफलाइन परीक्षेमुळे संभ्रम; कोरोनाने वाढवली पालकांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 11:05 PM

कोरोनाने वाढवली पालकांची चिंता : सुरक्षितता महत्त्वाची , सतर्कता बाळगण्याची गरज

अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : दहावी - बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार, असा निर्णय शिक्षण विभागांकडून घेण्यात आला आहे. ऑनलाइन परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानाची पालकांना असलेली भीती टळली आहे. तर बहुतांश पालकांनी ऑफलाइन घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे स्वागत केले आहे. तर काहींना कोरोनामुळे चिंता लागली आहे. पनवेल परिसरातील कोरोना रुग्ण वाढत असल्याने पालकांची परीक्षाबाबत द्विधा मनस्स्थिती निर्माण झाली आहे.

पनवेल तालुक्यात यावर्षी उशिराने शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनामुळे ऑनलाइन क्लासेस तर शाळा सुरू झाल्यानंतर ऑफलाइन तासिका घेण्यात आल्या आहेत. प्रत्येक शाळांना कोरोना नियमाचे पालन करणे अनिवार्य होते. त्यामुळे तासिकेची विभागणी आणि मर्यादित विद्यार्थी संख्या असल्याने शिक्षकांवर तसेच विद्यार्थांवर अभ्यासक्रमाचे ओझे होते. त्यातूनही शिकवणी पूर्ण करण्यात शिक्षकांकडून प्रयत्न करण्यात आले आहे. सराव परीक्षासुद्धा काही प्रमाणात झाल्या आहेत. 

आता बोर्डाकडून ऑफलाइन परीक्षा घेण्यात येणार, असा निर्णय झाल्यानंतर काही पालकांनी आनंद व्यक्त केला आहे. तर काहींनी चिंता वर्तवली आहे. ऑनलाइन घेऊच नये, असे मत काही पालकांनी व्यक्त केले आहे. दहावी - बारावीचे वर्ष महत्त्वपूर्ण आहे. ऑनलाइनमुळे कॉपी करण्याचे प्रकार घडू शकतात तेव्हा परीक्षा ऑफलाइनच व्हावी, असेही काही पालकांकडून सांगण्यात आले आहे. तर काहींना केंद्रावर योग्य काळजी घेतली जाईल की नाही, ही चिंता सतावत आहे.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षा