शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

उरण नगरपरिषदेच्या आमसभेत अधिकारी-नागरिकांत खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 03:27 IST

जेएनपीटी सिडको प्रकल्पग्रस्तांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेला साडेबारा टक्के भूखंड वितरणाचा प्रश्न, तालुक्यातील अनेक गावांना जाणविणारी भीषण पाणीटंचाई,

उरण : जेएनपीटी सिडको प्रकल्पग्रस्तांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेला साडेबारा टक्के भूखंड वितरणाचा प्रश्न, तालुक्यातील अनेक गावांना जाणविणारी भीषण पाणीटंचाई, विजेचा सुरू असलेला लपंडाव, उरणकरांसाठी डोकेदुखी ठरू पाहणारी वाहतूककोंडीची समस्या, वाढती बेरोजगारी, जेएनपीटीच्या चौथ्या बंदरातील वादग्रस्त नोकरभरती, रस्ते दुरुस्ती बांधणीत अपयशी वादग्रस्त ठरलेले ठेकेदारांनाच पुन्हा देण्यात येत असलेली कामे, अनधिकृत कंटेनर यार्ड, सातत्याने गैरहजर राहणारे शासकीय अधिकारी आदी अनेक प्रश्नांवर सोमवारी झालेल्या आमसभेत जोरदार चर्चा झाली.

उरण तालुक्यात १९८० पासूनच औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली ती आजतागायत सुरूच आहे. ओएनजीसी, जेएनपीटी, बीपीसीएल, उरण वायू विद्युत केंद्र, सिडको, नौदल शस्त्रागार आदी विविध शासकीय प्रकल्पावर आधारित शेकडो कंपन्या उभारण्यात आल्या आहेत. सिडकोने जेएनपीटी बंदर उभारण्यासाठी व नवी मुंबईच्या निर्मितीसाठी येथील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी संघर्षानंतरही जबरदस्तीने कवडीमोल भावाने संपादन केल्या. शेतकºयांच्या कडव्या संघर्षानंतर प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकºया, विविध प्रकल्पांमध्ये रोजगार, साडेबारा टक्के विकसित भूखंड देण्याची आश्वासने शासनाच्या वतीने देण्यात आली. मात्र शासनाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे अद्याप तरी शक्य झाले नाही.जेएनपीटी कामगार वसाहतीमधील बहुउद्देशीय सभागृहात आ. मनोहर भोईर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आमसभेप्रसंगी उरण पंचायतीचे सभापती नरेश घरत, उपसभापती वैशाली पाटील, राजिप सदस्य विजय भोईर, बाजीराव परदेशी, सदस्या कुंदा ठाकूर, उपसमिती सदस्य दीपक ठाकूर, हिराजी घरत आदी इतर मान्यवरांसह उरण तहसीलदार कल्पना गोडे, गटविकास अधिकारी नीलम गाडे, आदी उपस्थित होते. विजेचा प्रश्न उपस्थित होताच भेडसाविणाºया विजेच्या अनेक प्रश्नांवर नागरिकांनी वीज अधिकाºयांना घेरले. ग्रामीण भागातील गंजलेले विजेचे पोल बदलण्याची मागणी उरणकरांची आहे. शैक्षणिक समस्या, दररोज डोईजड होत चाललेली वाहतुकीची कोंडी, खड्डेमय रस्ते, वाढते अपघात, अनधिकृत कंटेनर यार्ड, तहसील, पोलीस विभागातील बोकाळलेला भ्रष्टाचार, बेरोजगारी, पाणजे गाव आणि रानसई आदिवासी वाडीचाच नव्हे संपूर्ण तालुक्यातील विजेचा प्रश्न, प्रकल्पग्रस्तांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर माजी जि. प. सदस्य वैजनाथ ठाकूर, कृष्णा पाटील, संतोष ठाकूर, संजय ठाकूर, सुरेश पाटील आदी ग्रामस्थांनी आवाज उठवला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcidcoसिडको