शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

निष्काळजीपणामुळे जुळ्या मुलांचा मृत्यू

By admin | Updated: June 29, 2017 03:05 IST

पालिका रुग्णालयामधील एनआयसीयू युनिट बंद असल्याने तळवलीमधील नवजात जुळ्या मुलांचा मृत्यू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पालिका रुग्णालयामधील एनआयसीयू युनिट बंद असल्याने तळवलीमधील नवजात जुळ्या मुलांचा मृत्यू झाला आहे. पालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. अर्थसंकल्पात आरोग्यासाठी करोडो रुपयांची तरतूद असतानाही योग्य कामांवर खर्च केला जात नसून, निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये केली आहे. नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागावर प्रत्येक वर्षी करोडो रुपये खर्च करत आहे; परंतु शहरवासीयांना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. पालिका रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्याने नाईलाजाने नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे. ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेचे तीव्र पडसाद बुधवारी स्थायी समितीच्या सभागृहामध्ये उमटले. तळवलीमधील एका महिलेला जुळी मुले झाली. मुलांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना एनआयसीयू युनिटमध्ये हलविणे आवश्यक होते; पण पालिकेच्या रुग्णालयातील युनिट बंद असल्याने नाईलाजाने मुलांना पीकेसी रुग्णालयात भरती करावे लागले. चार दिवसांनी मुलांचा मृत्यू झाला. सर्वसाधारणसभा व स्थायी समितीने आरोग्य विभागासाठीच्या खर्चामध्ये कधीच हात आखडता घेतलेला नाही. यानंतरही एनआयसीयू युनिट सक्षम का करण्यात येत नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नामदेव भगत यांनीही आरोग्य विभागाच्या कामकाजावर आक्षेप घेतले. चौथ्या मजल्यावर डॉक्टरांमध्ये प्रचंड राजकारण सुरू आहे. एकमेकांविरोधात कटकारस्थान करण्यामध्ये अधिकारी व्यस्त असून, दुसरीकडे नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. गटबाजी सोडून नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक देवीदास हांडे-पाटील यांनीही प्रशासन जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याची टीका केली. आरोग्य समितीचे सभापती असताना, एनआयसीयू युनिटसाठी तातडीने उपकरणे खरेदी करण्याची मागणी केली होती. यापूर्वी आयुक्त दिनेश वाघमारे यांनीही तातडीने एनआयसीयू युनिटसाठी उपकरणे खरेदी करण्यासाठीचे आदेश दिले होते; परंतु प्रशासनाने ते खरेदी केले नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. खासगी रुग्णालयांना लाभ पोहोचविण्यासाठी पालिका प्रशासन झटत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. आरोग्य विभागात जोरदार राजकारण सुरू आहे. नवी मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणे थांबविले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अशोक गुरखे यांनीही चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्या, अशी अपेक्षा व्यक्त केली.